AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोयबीनचे दर घटूनही का वाढत आहे आवक ? सोयाबीनच्या दराचा भरवासाच राहिला नाही

मध्यंतरी आठ दिवसासाठी दर स्थिर राहिले होते पण पुन्हा घसरण ही कायम आहे. (Latur Market) आता चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला 5100 तर सर्वसाधारण 4800 चा दर मिळत आहे. दर घटूनही आवक मात्र वाढत आहे. (Reduction in soyabean prices) भविष्यातील दराबाबतही शेतकऱ्यांना आता आशा राहिलेली नसल्यानेच मिळेल त्या दरात सोयाबीनची विक्री केली जात आहे.

सोयबीनचे दर घटूनही का वाढत आहे आवक ? सोयाबीनच्या दराचा भरवासाच राहिला नाही
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Oct 16, 2021 | 2:38 PM
Share

लातूर : हंगामाच्या सुरवातीला 11 हजार क्विटंलचा विक्रमी दर सोयाबीनला (Soyabean Market) मिळालेला होता. मात्र, त्यानंतर सुरु झालेली उतरती कळा आजही कायम आहे. गेल्या महिन्याभरात एकदाही सोयाबीनने उचल खाल्लेली नाही. मध्यंतरी आठ दिवसासाठी दर स्थिर राहिले होते पण पुन्हा घसरण ही कायम आहे. (Latur Market) आता चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला 5100 तर सर्वसाधारण 4800 चा दर मिळत आहे. दर घटूनही आवक मात्र वाढत आहे. (Reduction in soyabean prices) भविष्यातील दराबाबतही शेतकऱ्यांना आता आशा राहिलेली नसल्यानेच मिळेल त्या दरात सोयाबीनची विक्री केली जात आहे. शनिवारी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 20 हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक आवक झाली होती.

हंगामाच्या सुरवातीला जो दर सोयाबीनला होता तो आज निम्म्यापेक्षाही कमी झाला आहे. किमान 6 हजारावर का होईना दर स्थिर होतील अशी आशा शेतकऱ्यांना होती पण तसे चित्र बाजारपेठेत नाही. पावसाने झालेले नुकसान, केंद्र सरकारचे धोरण या सर्वांचा परिणाम हा सोयाबीनच्या दरावर झाला आहे. आता पर्यंच सोयाबीनची काढणी-मळणी ही कामे रखडलेली होती. पण गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीनची मळणी झाली की थेट बाजारात आणले जात आहे.

सणासुदीत शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. यातच खरीपातील कोणतेच उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी हे पडलेले नाही. शिवाय खरीपातील पीके जोपासण्यात अधिकचा खर्च होऊनही चार पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. आता दर दिवसेंदिवस घटत आहेत. भविष्यात हीच स्थिती राहिली तर जास्तीचे नुकसान होईल म्हणून पडेल त्या दरात सोयाबीनची विक्री करण्याचा निर्णय शेतकरी घेत आहेत.

शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री करावी की साठवणूक

सोयाबीनची काढणी कामे आता अंतिम टप्प्यात आहेत. शिवाय पावसामुळे सोयाबीनच्या दर्जावरही परिणाम झालेला आहे. अशा परस्थितीमध्ये चांगला दर मिळेपर्यंत सोयाबीनची साठवणूक करावी का लागलीच विक्री करावी याबाबत शेतकऱ्यांच्या मनात द्वीधा स्थिती आहे. सोयाबीनची विक्रीच शेतकऱ्यांच्या फायद्याची राहणार असल्याचे मत व्यापारी व्यक्त करीत आहेत. कारण भविष्यात यापेक्षा अधिकची आवक तर होणारच आहे पण सोयापेंड आणि दिवसेंदिवस खाद्यतेलावरील कमी केले जात असलेले आयातशुल्क यामुळे भविष्यात यापेक्षा दर कमी होतील असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 5 हजाराचा दर मिळत असून याच दरात विक्री केली तर भविष्यातील संकट टळणार आहे.

खळ्यावरील सोयाबीन थेट बाजारात

सध्या पावसाने उघडीप दिल्याने काढणी आणि मळणी ही दोन्हीही कामे उरकून घेण्यावर शेतकऱ्यांनी भर दिलेला आहे. पावसामुळे सोयाबीन हे डागाळलेले आहे. त्याचा दर्जाही खालावलेला आहे. त्यामुळे साठवणूक केली तरी त्याला बुरशी लागून खराबी होणार शिवाय यापेक्षा कमी दराने भविष्यात विक्री करण्याची नामुष्की आली तर काय ? हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे. त्यामुळे खळ्यावक मळणी झाली की सोयाबीन थेट बाजारात दाखल केले जात आहे.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. शनिवारी लाल तूर- 6188 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6375 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6100 रुपये क्विंटल, जानकी चना 4950 रुपये क्विंटल, विजय चणा 5050, चना मिल 4850, सोयाबीन 5400, चमकी मूग 7100, मिल मूग 6250 तर उडीदाचा दर 7200 एवढा राहिला होता. (Despite the decline in soyabean prices, the emphasis on the sale of farmers is, what are the reasons?)

संबंधित बातम्या :

ऊस कारखानेच करीत आहेत एकरकमी ‘एफआरपी’ ची घोषणा, काय आहे पडद्यामागची गोष्ट ?

जगातली सर्वात तिखट मिरची, तीन तुकडे खाल्ले तर ‘जागतिक रेकॉर्ड’ अन् चार खाल्ले तर ‘गिनीज वर्ल्ड’ रेकॉर्डमध्ये नोंद

लाल कांदा तळपलाः नाशिकमध्ये क्विंटलमागे 5151 रुपयांचा भाव; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशेची झुळुक!

Follow Us
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही...

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..

अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?.

अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा.

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा