AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांचे शहाणपण : रान रिकामे राहिले तरी चालेल, पण फरदड उत्पादन नको रे बाबा, काय आहे फरदड पीक?

फरदड कापसाचे उत्पादन हे धोक्याचेच आहे. केवळ काही रकमेसाठी याचे उत्पादन म्हणजे आगामी हंगामातील पिकांचेही नुकसानच. अशा प्रकारे अनेक वेळा कृषी विभागाने सांगूनही शेतरकऱ्यांनी फरदड कापसावर भर दिला होता. मात्र, वातावरणातील बदल आणि कापसाचे घटत असलेले दर यामुळे त्रासलेल्या शेतकऱ्यांनी अखेर फरदड मोडून इतर पिकांचा पर्याय शोधला आहे.

शेतकऱ्यांचे शहाणपण : रान रिकामे राहिले तरी चालेल, पण फरदड उत्पादन नको रे बाबा, काय आहे फरदड पीक?
यंदा वातावरणातील बदलामुळे कापसाच्या उत्पादकतेमध्ये घट झाल्याचा अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Dec 26, 2021 | 3:43 PM
Share

जळगाव : फरदड (Cotton crop) कापसाचे उत्पादन हे धोक्याचेच आहे. केवळ काही रकमेसाठी याचे उत्पादन म्हणजे आगामी हंगामातील पिकांचेही नुकसानच. अशा प्रकारे अनेक वेळा कृषी विभागाने सांगूनही शेतरकऱ्यांनी फरदड कापसावर भर दिला होता. मात्र, वातावरणातील बदल आणि कापसाचे घटत असलेले दर यामुळे त्रासलेल्या शेतकऱ्यांनी अखेर फरदड मोडून इतर पिकांचा पर्याय शोधला आहे. बोंडापेक्षा बोंडअळीचाच अधिकचा प्रकोप होत असल्याने बोंडेही उमलत नव्हती. शिवाय (loss of agriculture sector) रिकामे क्षेत्र राहिल्याने नुकसान होणार ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षातत आल्याने आता वेगळा पर्याय शोधला जात आहे. फरदड कापसाच्या क्षेत्रावर शेतकरी आता बाजरी, गव्हाचे उत्पादन घेत आहेत.

प्रयत्न करुनही फरदड नाही बहरले

कापूस वेचणी झाल्यानंतर अधिकच्या उत्पादनाच्या दृष्टीने नोव्हेंबरनंतरही कापूस वावरातच ठेऊन शेतकऱ्यांना उत्पादनाची अपेक्षा होती. शिवाय यंदा हंगामाच्या सुरवातीला चांगला दरही होता. त्यामुळे पुन्हा पेरणी करुन अधिकचा खर्च करण्यापेक्षा फरदड कापूसच वावरात ठेऊन उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, वातावरणातील बदलामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव हा वाढतच असल्याने अखेर फरदडची मोडणी करण्याचा निर्णय खानदेशातील शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. शिवाय या पीकामुळे शेतजमिनीचेही नुकसान होणार होते. याबाबत कृषी विभागाने वेळोवेळी मार्गदर्शनही केले होते. मात्र, गेल्या महिन्याभरापासून शेतकऱ्यांनी कापूस हा शेतातच ठेवला होता. पण नुकसान लक्षात आल्यानंतर मोडणी सुरु झाली आहे.

आता काय पर्याय ?

केवळ खानदेशामध्ये 9 लाख हेक्टरावर कापसाची लागवड केली जाते. यंदा उत्पादनात मोठी घट झाल्याने हंगामाच्या सुरवातीला कापसाला 9 हजार रुपये क्विंटलपर्यंत दर मिळाले होते. पण आता कापसाचे दरही घसरले आहेत. शिवाय बोंडअळीचा प्रादुर्भाव दिवसागणिस वाढत असल्याने भविष्यात शेतजमिन ही नापिकी होण्याचा धोका आहे. त्यामुळे त्याची काढणी करुन या क्षेत्रावर बाजरी किंवा गव्हाचे उत्पादन घेतले जात आहे. यंदा गव्हासाठी पोषक वातावरण मानले जात असून मूबलक प्रमाणात पाणीही आहे. उत्पादनवाढीच्या अनुशंगाने शेतकऱ्यांनी फरदडची मोडणी केली आहे.

फरदड कापसामुळे काय होते?

सध्या वातावरणातील बदलामुळे कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच कापूस शेतामध्ये कायम ठेवला तर अळीचा प्रादुर्भाव हा वाढणारच आहे. एवढेच नाही तर फरदड कापसाचा शेत जमिनीवरही परिणाम होत असतो. आगामी वर्षात उगवण क्षमतेवर त्याचा परिणाम होतो. तर आता रब्बी हंगामातील पिकांची उगवण झाली आहे. या फरदड कापसावरील बोंडअळीचा प्रादुर्भाव इतर पिकांवर होण्याचा धोका आहे. त्यामुळे तात्पूरत्या फायद्यासाठी शेतकऱ्यांनी आगामी हंगामातील आणि शेतजमिनीचे नुकसान करुन घेऊ नये असा सल्ला कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या :

Nashik | वाढत्या थंडीने हुडहुडी शेतकऱ्यांना का द्राक्षांना ; बागांमध्ये का पेटत आहेत शेकोट्या? वाचा सविस्तर

शेतकऱ्यांनो पुढे धोका आहे | हरभऱ्याचे क्षेत्र वाढले पण दराचे काय, अधिकच्या दराला सरकारच्या निर्णयाचा अडसर

Nashik | 153 दिवसांचे आंदोलन अन् साध्य काय झाले आंदोलनकर्त्यांचे निलंबन, काय आहे नेमका प्रकार ?

Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच