AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hapus Mango : फळांच्या राजाची जपानमध्येही दमदार ‘एंट्री’, केशरच्या मागणीतही वाढ

फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याचे सर्वाधिक उत्पादन हे महाराष्ट्रात आणि त्यापाठोपाठ गुजरातमधील जुनागढ येथे आहे. सर्वाधिक महागड्या आणि चवीला गोड असणाऱ्या हापूसचे व्यसन आता अमेरिकापाठोपाठ आता जपानमधील नागरिकांनाही लागले आहे. अॅग्रीकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रॉडक्टस् एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट अॅथॉरिटीने (अपेडा) मुंबईहून अल्फान्सो आणि केशर आंब्याची जपानला निर्यात केली जात आहे.

Hapus Mango : फळांच्या राजाची जपानमध्येही दमदार 'एंट्री', केशरच्या मागणीतही वाढ
हापूस आंब्याची आवक घटली आहे.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Mar 30, 2022 | 5:30 AM
Share

मुंबई : फळांचा राजा असलेल्या (Hapus Mango) हापूस आंब्याचे सर्वाधिक उत्पादन हे महाराष्ट्रात आणि त्यापाठोपाठ गुजरातमधील जुनागढ येथे आहे. सर्वाधिक महागड्या आणि चवीला गोड असणाऱ्या हापूसचे व्यसन आता अमेरिकापाठोपाठ आता (Japan) जपानमधील नागरिकांनाही लागले आहे. अॅग्रीकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रॉडक्टस् एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट अॅथॉरिटीने (अपेडा) मुंबईहून अल्फान्सो आणि केशर आंब्याची जपानला निर्यात केली जात आहे. हंगामातील (Mango Export) निर्यातीची पहिली खेप नुकतीच पोहचली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त टोकियो येथे एक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील विविध स्टॉलमध्ये आंब्याचे प्रदर्शन केले जाणार आहे. दरवर्षी देशातून 400 कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला जातो. यामध्ये जपानचे योगदान खूपच कमी आहे. देशातून आंब्याची सर्वाधिक निर्यात ही संयुक्त अरब अमिरातीमध्ये होते. याशिवाय इंग्लंड, अमेरिका, सौदी अरेबिया, हाँगकाँग, इटली आणि स्वित्झर्लंड इत्यादी देशांतही आंब्याची निर्यात केली जाते. येथून दशहरी, चौसा, लमे, अल्फान्सो या आंब्यांना भरपूर मागणी आहे.

अपेडा कसा काम करतो?

देशातून शेतीमालाची निर्यात केली जावे यासाठी अपेडा अर्थात अॅग्रीकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रॉडक्टस् एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट अॅथॉरिटी ही काम करीत आहे. यासाठी व्हर्च्युअल ट्रेड फेअर आयोजित करण्यासाठी व्हर्च्युअल पोर्टल विकसित करणे, शेतकरी कनेक्ट पोर्टल, ई-ऑफिसेस, क्षैतिज ट्रेसॅबिलिटी सिस्टम, खरेदीदार-विक्रेता भेट, रिव्हर्स खरेदीदार-विक्रेता भेट, उत्पादन विशिष्ट मोहिम या माध्यमातून निर्यात प्रोत्साहन उपक्रम राबवले जातात. एवढेच नाही तर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि राज्यातून शेतीमालाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी अपेडा राज्य सरकारबरोबर काम करीत आहे. भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील एक वैधानिक संस्था, अपेडा ही भारतीय कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न निर्यातीला चालना देणारी नोडल एजन्सी आहे. बागायती, फुलशेती, प्रक्रिया केलेले अन्न, कुक्कुटपालन उत्पादने, दुग्धशाळा आणि बरेच काही निर्यात सोपी करण्यासाठी ही काम करीत आहे.

हापूसला आणि केशरला भौगोलिक मानांकन

महाराष्ट्र राज्यात हापूसचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तर केसर महाराष्ट्रात आणि जुनागड गुजरातमध्ये अधिकचे उत्पादन होते. हापूस आंबा हा कोकण विभागाच्या अर्थकारणाचा मुख्य आधार आहे. रत्नागिरी, आणि रायगड येथेही याचे उत्पादन घेतले जाते. कर्नाटक आणि गुजरातमध्येही याचे पीक घेतले जाते. परंतु, सर्वात मोठे आंबा निर्यातदार राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे. हापूस हा किलोऐवजी डझनभरात विकला जातो. यंदाच्या हंगामात दीड ते दोन हजार रुपये डझनचा भाव आहे. हापूस हा त्याच्या विशिष्ट चवीसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील हापूस आणि केसर आंब्याचा भौगोलिक मानांकन मिळालेले आहे.

संबंधित बातम्या :

Lasalgoan : शेतकऱ्यांकडूनच कांदा मार्केट बंद, बाजार समिती प्रशासनही हतबल, नेमके कारण काय ?

Central Government: पेरणीपासून ते बाजारपेठेपर्यंत सर्व सुविधा एकाच ठिकाणी, केंद्र सरकारचा काय आहे Mega plan?

Latur Market : सोयाबीन दराचा पुन्हा चढता आलेख, शेतकऱ्यांसमोरील समस्या मात्र कायम..!

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं