AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केवळ पिक विमा भरुनच नाही तर नुकसान भरपाईसाठी करावी लागणार ‘ही प्रक्रिया’

निसर्गाच्या लहरीपणामुळे सबंध (Kharif Hnagam) खरिप हंगाम धोक्यात आला आहे. ऐन शेवटच्या टप्प्यात खरिप असतानाच (Marathwada) मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र अतिवृष्टी झाली होती. यामुळे आता पिक विमा भरणारे शेतकरी हे नुकसानभरपाईच्या प्रतिक्षेत आहेत. परंतु, या भरपाईसाठी पिकाच्या नुकसानीनंतर अवघ्या 72 तासाच्या आतमध्ये 'क्रॉप इंशुरंन्स' या ऍप झालेल्या नुकसानीची माहिती भरणे बंधनकारक राहणार आहे.

केवळ पिक विमा भरुनच नाही तर नुकसान भरपाईसाठी करावी लागणार 'ही प्रक्रिया'
शेतकऱ्याचे संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Sep 08, 2021 | 7:52 PM
Share

लातुर : निसर्गाच्या लहरीपणामुळे सबंध (Kharif Hnagam) खरिप हंगाम धोक्यात आला आहे. ऐन शेवटच्या टप्प्यात खरिप असतानाच (Marathwada) मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र अतिवृष्टी झाली होती. यामुळे आता पिक विमा भरणारे शेतकरी हे नुकसानभरपाईच्या प्रतिक्षेत आहेत. परंतु, या भरपाईसाठी पिकाच्या नुकसानीनंतर अवघ्या 72 तासाच्या आतमध्ये ‘क्रॉप इंशुरंन्स’ या ऍप झालेल्या नुकसानीची माहिती भरणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान झाले असेल तर नोंद करणे आवश्यक आहे. खरिप हंगामात सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा झाला आहे. पेरणी होताच काही शेतकऱ्यांनी विम्यापोटी काही रक्कम कंपनीला अदाही केली आहे. मात्र, दरवर्षी यामधून नुकसानच होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पाठही फिरवली होती. शिवाय गतवर्षीही विमा कंपनीलाच अधिकचा फायदा झाला होता. विम्याच्या माध्यमातून तब्बल 10 हजार कोटींहुन अधिकचा फायदा हा कंपनीलक झाला होता. असे असतानाही केवळ विमा रक्कम अदा केली अन् नुकसान भरपाई मिळाली असे नाही. तर नुकसान भरपाई पदरात पाडून घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान झाल्यानंतर अवघ्या 72 तासामध्ये झालेल्या पिक नुकसानीची माहिती द्यावी लागणार आहे. यानंतर ऑनलाईन तक्रारीची दखल घेऊन विमा कंपनीचे कर्मचारी हे पिक पाहणीसाठी बांधावर येणार आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरी ही रक्कम पडणार आहे. Farmer do Online complaint crop kharif required for compensation

अशी आहे प्रक्रिया…

पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनीच ‘क्रॉप इंशुरंन्स’ या ऑपवर माहिती भरता येणार आहे. यामध्ये पिक पेरा किती क्षेत्रावर झाला आहे. पेरणी केलेल्या पिकांची नावे, पिकाचे क्षेत्र, शेतकऱ्याचे नाव, गट नंबर, शेतकऱ्याचे नाव आदी बाबींचा समावेश करावा लागणार आहे.

किचकट प्रक्रिया, तालु्क्याला एकच कर्मचारी

शेतकऱ्यांनी पिक विमा भरला की कृषी अधिकारी हे दुर्लक्ष करतात तर विमा कंपनीचा तालु्क्याच्या ठिकाणी एकच कर्मचारी नेमण्यात आला आहे. सर्व शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी शक्य़ नसल्याने हा मार्ग कंपनीच्या माध्यमातून काढण्यात आला आहे. परंतू, या तांत्रिक बाबींची माहिती शेतकऱ्यांना नाही. शिवाय कोणी मार्गदर्शन करायलाही नसल्याने ही माहिती भरावी कशी असा सवाल उपस्थित होत आहे.

गतवर्षीही शेतकऱ्यांचे नुकसानच

गतवर्षीही खरिपाच्या अंतिम टप्प्यात पावसाची अवकृपा झाली होती. ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता अशा शेतकऱ्यांना मदतीची प्रतिक्षा होती. परंतु, अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईनद्वारे तक्रार नोंदिवली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर विमा कंपनी ही फायद्यात राहिली होती. (Farmer do Online complaint crop kharif required for compensation)

संबंधित इतर बातम्या : 

आता दोन कोटी शेतकऱ्यांचा होणार नाही ‘सन्मान’, राज्यांची कारवाई

रब्बी हंगामासाठी अनुदानावर बियाणं मिळवायचंय, कृषी विभागाचं अर्ज करण्याचं आवाहन

शेतकऱ्यांसाठी खूशखबर, केंद्र सरकारकडून रब्बी हंगामाची MSP जाहीर, ‘इथे’ पाहा संपूर्ण यादी

(Farmer do Online complaint crop kharif required for compensation)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...