AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crop Insurance | पीक विम्यासाठी कृषी विभागाची अजब अट; शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

Crop Insurance | तीन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हरभरा पिकाची पेरणी झाली तरच १ रुपयांत पिक विम्याचा लाभ देण्यात येईल, असा अजब फतवा कृषी विभागाने काढला आहे. कृषी विभागाच्या या दादागिरीने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पीक विम्यासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांना वेठीला धरत असल्याचा शेतकऱ्यांनी दावा केला आहे.

Crop Insurance | पीक विम्यासाठी कृषी विभागाची अजब अट; शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट
| Updated on: Dec 22, 2023 | 9:10 AM
Share

जितेंद्र बैसाणे, प्रतिनिधी, नंदुरबार | 22 डिसेंबर 2023 : राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयांत पिक विमा देण्याचा मोठा गाजावाजा केला. पण नंदुरबार जिल्ह्यात या योजनेचे खरे स्वरुप समोर आले आहे. रब्बी हंगामात 3 हजार हेक्टरवर हरभरा पिकाचा पेरा झाला तरच पीक विम्याचा लाभ देण्याची अजब अट कृषी खात्याने घातली आहे. ज्या तालुक्यांनी 3 हजार हेक्टरवर हरभरा पिकाची लागवड केली आहे. त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना एक रुपयां पीक विमा देण्याचा फतवा कृषी विभागाने काढला आहे. यामुळे पीक विम्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाती परत फिरावे लागले आहे. या अजब फतव्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पिका विम्यासाठी शासन शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

6 हजार हेक्टर क्षेत्रावर हरभरा

नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळी परिस्थतीमुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. ज्या बागायतदार शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे. त्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात हरभरा पिकाची पेरणी केली आहे. संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात 6 हजार हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाची पेरणी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यात ही पेरणी होणार आहे. जिल्ह्यातील कुठल्याही एका तालुक्यात तीन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी होणार नसल्याचे स्पष्ट आहे. कृषी विभागाच्या नवीन फतव्यामुळे जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा मिळणार नाही. शासनाच्या या धोरणावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अंमलबजावणीत खोडा

कृषी विभागाच्या या अजब फतव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. शेतकऱ्यांवर ही जबरदस्ती असल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांनी सूचना करण्याऐवजी थेट अट घातल्याने संतापाची लाट पसरली आहे. नंदुरबार जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागातील शेतकरी सरकारने घालून दिलेल्या पेरणी क्षेत्राच्या अटीमुळे 1 रुपयात पिक विम्यापासून वंचित राहतील. सरकार घोषणा करते. मात्र अमलबजावणी कडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी केला आहे.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?