AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतातल्या पाण्यात लोटांगण आंदोलन, अद्याप पंचनामे होत नसल्याने गंगापूरच्या शेतकऱ्यांचा संताप

औरंगाबाद: मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे (Heavy rain in Marathwada) शेतीला चांगलाच फटका बसला आहे. अनेक ठिकाणची उभी पिकं पाण्यात गेली आहेत. पावसाला उघडीप मिळून चार दिवस झाले तरी शेतातील साठलेलं पाणी हटलं नाही. मेहनतीने वाढवलेल्या पिकांचे हे हाल पाहून शेतकऱ्यांची घोर निराशा होत आहे. त्यातच चार दिवस उलटूनही सरकारकडून कुणी अधिकारी वा विमा कंपन्यांचे (crop […]

शेतातल्या पाण्यात लोटांगण आंदोलन, अद्याप पंचनामे होत नसल्याने गंगापूरच्या शेतकऱ्यांचा संताप
| Edited By: | Updated on: Oct 01, 2021 | 12:26 PM
Share

औरंगाबाद: मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे (Heavy rain in Marathwada) शेतीला चांगलाच फटका बसला आहे. अनेक ठिकाणची उभी पिकं पाण्यात गेली आहेत. पावसाला उघडीप मिळून चार दिवस झाले तरी शेतातील साठलेलं पाणी हटलं नाही. मेहनतीने वाढवलेल्या पिकांचे हे हाल पाहून शेतकऱ्यांची घोर निराशा होत आहे. त्यातच चार दिवस उलटूनही सरकारकडून कुणी अधिकारी वा विमा कंपन्यांचे (crop insurance company) अधिकारी शेतात पंचनामे करण्यासाठी न आल्याने शेतकरी संतप्त आहेत. गंगापूर तालुक्यातील (Gangapur, Aurangabad) धामोरी गावातील शेतकऱ्यांनी हा राग व्यक्त करण्यासाठी शेतातील साचलेल्या पाण्यात लोटांगण आंदोलन केले.

साचलेल्या पाण्यात शेतकऱ्यांनी घातले लोटांगण

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचेही अतिवृष्टीतील पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. पिकांची नुकसान भरपाई होण्यासाठी गंगापूर तालुक्यातील धामोरी गावातील शेतकऱ्यांनी लोटांगण आंदोलन केले. पावसाने उघडीप देऊन चार दिवस झाले तरी येथील शेतकऱ्यांच्या शेतात अद्याप साचलेलं पाणी तसंच आहे. त्यामुळे या तळ्यात शेतकऱ्यांनी लोटांगण आंदोलन केलं. पिकविमा कंपन्या आणि सरकारकडून पंचनामे होत नसल्याची तक्रार त्यांनी यावेळी केली.

फुलंब्रीत बंधारा फुटल्याने पिकांचे नुकसान

फुलंब्री तालुक्यात गिरीजा नदीपात्राला मोठा पूर आल्याने शेवता परिसरातील केटीवेअर एका बाजूने फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील मका वाहून गेला आहे. केटीवेअरमधील सर्वच पाणी वाहून जात असल्याने खरिपाच्या पाठोपाठ रब्बीचे पिकही धोक्यात सापडले आहे. शेवता परिसरातील गिरीजा नदीपात्रालगतच्या शेतजमिनींना या घटनेचा मोठा फटका बसला आहे. केटीवेअर फुटल्याने आता रब्बीच्या हंगामातील सिंचन क्षमताही कमी होणार आहे. त्यामुळे केटीवेअरची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात 2,254 कोटींचे नुकसान

गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात 25 लाख 98 हजार 213 हेक्टरचे नुकसान झाले आहे. हा आकडा 30 लाख हेक्टरपर्यंत जाऊ शकतो. शेतकऱ्यांना भरपाईपोटी 1796 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. मराठवाड्यात 30 सप्टेंबरपर्यंत 1020 मिमी म्हणजेच अपेक्षित सरासरीच्या 150 टक्के पाऊस झाला आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे खरीपाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीला फटका बसलेल्या शेतकऱ्यांची संख्या दररोज वाढत आहे. आठ ते दहा दिवसांपूर्वी पंधरा ते वीस लाख हेक्टरचे नुकसान झाले, असे दिसत होते. सध्या हा आकडा 25 लाखांवर गेला असून पुढील काही दिवसात तो तीस लाख हेक्टरपर्यंत जाण्याचा अंदाज महसूल विभागाच्या अहवालात म्हटले आहे.

इतर बातम्या- 

जनावरांच्या गोठ्यासाठी राज्य सरकारचे हजारोंचे अनुदान, असा करा अर्ज 

शेतकऱ्यांना दिलासा : ‘ई-पिक पाहणी’च्या माध्यमातून पिक नोंदणीसाठी मुदत वाढली 

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.