AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकर्‍यांवर अस्मानी संकट; ढगाळ वातावरणामुळे ज्वारीसह इतर पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

Cloudy Weather Impact : जळगाव जिल्ह्यात सततच्या ढगाळ वातावरणामुळे ज्वारी पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. इतर ही पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकाचं नुकसान होण्याची भीती आहे.

शेतकर्‍यांवर अस्मानी संकट; ढगाळ वातावरणामुळे ज्वारीसह इतर पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव
Cloudy Weather
| Updated on: Jan 18, 2025 | 11:57 AM
Share

जळगाव जिल्ह्यात सततच्या ढगाळ वातावरणामुळे ज्वारी पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे.पिकांसाठी पोषक थंडी नसल्याने तसेच सतत ढगाळ वातावरण असल्याने ज्वारी पिकावर मावा तसेच किडीचा प्रादुर्भाव होत असल्याने पिकांची पाने सुकून पिवळी पडत आहेत. इतर ही पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकाचं नुकसान होण्याची भीती आहे. तर दुसरीकडे रोजंदारीपेक्षा जादा रोजंदारी देऊनही मजूर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.

शेतकरी संकटात

आधीच अवकाळी पावसामुळे झालेला नुकसान त्यातच आता रोगांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.. चार एकर मध्ये दरवर्षी 120 ते 25 क्विंटल ज्वारीचे उत्पन्न होतं. मात्र यंदा रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे लागवडीचाही खर्च देखील की निघतो की नाही याची चिंता शेतकर्‍यांना सतावत आहे.

इतर पिके सुद्धा धोक्यात

रोगांचा प्रादुर्भाव होऊन होत असलेल्या नुकसानाकडेही शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे ज्वारी बरोबरच हरभरा, गहू , मका या पिकांवर सुद्धा रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. तर रोजंदारीपेक्षा जादा रोजंदारी देऊनही मजूर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.

मजूर मिळत नसल्याने कामं खोळंबली

जळगाव जिल्ह्यात ग्रामीण भागात तूर कापण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी आता नव्या अडचणीत सापडला आहे. शेतात तुरीच्या झाडाला मोठ्या प्रमाणावर शेंगा लागल्या आहेत, मात्र तूर कापण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकर्‍याची मोठी अडचण झाली आहे. ठरलेल्या रोजंदारीपेक्षा जादा रोजंदारी देऊनही मजूर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.

तालुक्यातील परिसरातील गावांमध्ये मजुरांचा शोध घेण्यासाठी पायपीट करण्याची वेळ शेतकर्‍यावर आली आहे. महिनाभर प्रतीक्षा तसे शोधा शोध करूनही मजूर न मिळाल्याने शेतकर्‍यावर स्वत:च तूर कापणी करण्याची वेळ आली आहे. एकंदरीतच नुकसान त्यातच पाहिजे तसे पैसे खर्च करूनही मजूर मिळत नसल्यामुळे शेतकर्‍यांसमोर संकट उभे राहिले आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.