AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

fish farming : शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ अन् दुहेरी उद्देशही साध्य, व्यवस्थापनावरच मत्स्यशेतीचे भवितव्य

शेती व्यवसयातून केवळ मुख्य पिकांचेच उत्पादन घेणे हा उद्देश राहिलेला नाही. काळाच्या ओघात शेतीचे स्वरुप बदलत आहे. पाणीटंचाई भासू नये म्हणून आता शेततळे जणूकाही अनिवार्यच झाले आहे असे चित्र आहे. शेततळ्याची गरज आणि याच गरजेतून उपलब्ध झालेले व्यवसाय शेतकऱ्यांना एक उभारी देणारे आहेत. त्यापैकीच मत्स्यव्यवसाय एक आहे. शेततळ्याची उभारणी केल्यानंत मत्स्यशेतीसाठी वेगळे असे काही करावे लागत नाही. शेततळयाचा वापर मत्स्य शेतीसाठी करता येतो.

fish farming : शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ अन् दुहेरी उद्देशही साध्य, व्यवस्थापनावरच मत्स्यशेतीचे भवितव्य
मत्स्यशेती Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Mar 22, 2022 | 5:02 AM
Share

मुंबई : शेती व्यवसयातून केवळ मुख्य पिकांचेच उत्पादन घेणे हा उद्देश राहिलेला नाही. काळाच्या ओघात शेतीचे स्वरुप बदलत आहे. पाणीटंचाई भासू नये म्हणून आता शेततळे जणूकाही अनिवार्यच झाले आहे असे चित्र आहे. (farm Ponds) शेततळ्याची गरज आणि याच गरजेतून उपलब्ध झालेले व्यवसाय शेतकऱ्यांना एक उभारी देणारे आहेत. त्यापैकीच (fisheries) मत्स्यव्यवसाय एक आहे. शेततळ्याची उभारणी केल्यानंत  (Fish Farming) मत्स्यशेतीसाठी वेगळे असे काही करावे लागत नाही. शेततळयाचा वापर मत्स्य शेतीसाठी करता येतो.मत्स्यशेती म्हणजे तलावामध्ये कृत्रिमरित्या नैसर्गिक वातावरणात केल्या गेलेली माशांची पैदास होय.ही माशांची पैदाससाठी त्यासदृष्य स्थिती निर्माण केल्या जातात. मत्स्यपालन गोड्या पाण्यातील शेततळे मध्ये केले जाते त्यामध्ये प्रामुख्याने कटला, रोहू, मृगळ या भारतीय प्रमुख कार्य माशांचे चंदेरा, गवत्या, सायनस या माशांचा संवर्धनासाठी उपयोग केला जातो.

अशी करा मत्स्य व्यवसयाची सुरवात

खत व्यवस्थापनानंतरच मत्स्य संवर्धन करणे शक्य होणार आहे. या प्रक्रियेनंतर 15 दिवसांनी तलावात मत्स्य संवर्धन करता येऊ शकते. यासाठी साधारण 10 से.मी आकाराचे छोटे मासे प्रति हेक्टरी 5 हजार याप्रमाणे संवर्धनासाठी तलावात सोडावे लागणार आहेत. बाजारात उपलब्ध असलेल्या मत्स्य बीजांच्या प्रजाती तसेच भौगोलिक आणि वातावरणीय स्थिती यांचा विचार करता 3 ते 4 किंवा 6 प्रकारच्या माश्यांचे एकत्र संवर्धन करता येणे शक्य आहे.

मत्स्यपालनाचा असा हा फायदा

मत्स्यसंवर्धनाचा काळ हा 10 महिन्याचा असतो. दरम्यानच्या कालावधीत योग्य जोपासणा झाली तर माशाची वाढ ही 1 किलोपेक्षा अधिक होते. यामध्ये सर्वाध महत्वाची बाब म्हणजे शेततळ्यामध्ये बारमाही पाणी असणे गरजेचे असते. एवढेच नाही मत्स्यबीज हे चांगल्या दर्जाचे असणे गरजेचे आहे. सर्वकाही नियोजनबध्द झाले तर वर्षभराचा कालावधीत भरपूर नफा कमावता येतो. या व्यवसयामुळे शेततळ्यात पाणी कसे राहिल याची काळजी घेतली जाते त्यामुळे बारमाही शेततळ्यात पाणीही राहते.

या गोष्टीची घ्यावी लागणार काळजी

मत्स्यपालन करताना लहान बाबींचीही काळजी घेणे गरजेचे आहे. यामध्ये शेततळ्यासाठी पायऱ्या करणे महत्वाचे आहे जेणे करुन मासे काढणे सहज शक्य होणार आहे. याशिवाय तळ्यामध्ये खेकडे, वाम, बेडूक असे भक्षक प्राणी आतमध्ये येणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. प्लास्टिक कागद असणाऱ्या शेततळ्यामध्ये माशांची विष्ठा, माशांचे खाद्य त्याचे विघटन होत नाही. त्यामुळे पाणी लवकर खराब होते ते बदलण्याची सोय करावी लागणार आहे. पावसाळ्यामध्ये शेततळे भरून जातात, अशा वेळी शेततळी ओव्हरफ्लो होऊन मासे वाहून जाणार नाहीत याकडे लक्ष द्यावे लागणार आहे तर शेततळ्याचा कागद फाटला जाणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Paddy Growers : धान उत्पादकांना बोनस की प्रति एकर मदत..! नियमितता साधण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांचा मधला मार्ग

Watermelon : कोरोनाचा प्रादुर्भाव नाही पण परिणाम कायम, भंडाऱ्यातून कलिंगडच गायब..!

Process Industry: प्रक्रिया उद्योगातून लातूरात सोयाबीनचे मार्केट वाढणार, शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळणार

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.