AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agriculture news : मुख्यमंत्र्यांची घोषणा पोकळ ठरणार का ?, दोन महिने उलटूनही जीआर नाही

कृषिपंपांना 12 तास वीजपुरवठा करण्याची घोषणा फोल ठरत असून रात्री होणाऱ्या वीज पुरवठ्याने भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत.

Agriculture news : मुख्यमंत्र्यांची घोषणा पोकळ ठरणार का ?, दोन महिने उलटूनही जीआर नाही
Farmer bonus issueImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Feb 11, 2023 | 9:27 AM
Share

शाहिद पठाण, गोंदिया : धान्य उत्पादक शेतकऱ्यांना (FARMER) हेक्टरी पंधरा हजार रुपये बोनस देण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKNATH SHINDE) यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात (Winter session) केली होती. त्या घोषणेला दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी यासंदर्भातील जीआर अद्याप निघालेला नाही. तर महिनाभरापासून धानाचे 600 कोटी रुपयांचे चुकारे थकल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. ना बोनस, ना चुकारे केवळ आश्वासनाचे पोवाडे असं चित्र पाहायला मिळत आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून शासनाकडून प्रतिक्विंटल बोनस दिला जातो. मात्र यावर्षी राज्य सरकारने धानाला प्रतिक्विंटल बोनसऐवजी हेक्टरी 15 हजार रुपये बोनसची घोषणा केली.

शासनाने दोन हेक्टरपर्यंतची मर्यादा निश्चित केली. ही घोषणा करून आता दोन महिन्यांचा कालावधी लोटला पण अद्यापही यासंदर्भात जीआर काढलेला नाही. त्यामुळे अद्यापही बोनस जमा करण्याची अथवा बोनससाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्यासुद्धा निश्चित करण्यात आली नाही. त्यामुळे पूर्व विदर्भातील पाच त सहा लाखांवर शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून बोनसची घोषणा पोकळ आश्वासन ठरणार नाही ना अशी शंका आता शेतकरी घेऊ लागले आहेत.

मालेगाव जनावरांचेही केले जातेय थंडीपासून संरक्षण

मालेगावमधील ग्रामीण भागात सध्या थंडीचा कडाका जाणवत असून नाशिकच्या चांदवड येथील बैलांची खरेदी विक्री करणाऱ्या एका मध्यप्रदेशातील व्यापाऱ्याने बैलांना थंडी वाजू नये म्हणून प्रत्येक बैलाच्या अंगावर ‘बारदान’ टाकत थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. भगवान राठोड असे या व्यापाऱ्याचे नाव असून सायंकाळी बैलांना चारापाणी केल्या नंतर प्रत्येक बैलाच्या अंगावर थंडी वाजू नये म्हणून बारदान टाकत बैलांचा थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. राठोड यांच्याकडे तब्बल 50 बैलांची संख्या असून याकामी त्यांचे कुटुंबीय देखील त्यांना मदत करतात.

रात्रीच्या वीज पुरवठ्याने तुमसर तालुक्यातिल शेतकरी त्रस्त

कृषिपंपांना 12 तास वीजपुरवठा करण्याची घोषणा फोल ठरत असून रात्री होणाऱ्या वीज पुरवठ्याने भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत. सोरणा, लंजेरा, पिटेसूर, लोहारा आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड केली जाते. परंतु 1 फेब्रुवारीपासून रात्री वीजपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, परिसरात वाघाचा संचार असल्याने रात्री शेतात जाणे धोकादायक आहे. भाजीपाला पिकाचे सिंचन कसे करावे, असा प्रश्न आहे.

Follow Us
‘स्कूल ठीक करो’ मोहिमे अंतर्गत CJP पदाधिकारी आणि दादा भुसे यांची भेट
मंत्री दादा भुसे आणि कॉकरोच जनता पार्टीची भेट
OBC आश्रमशाळांना इशारा; मूलभूत सुविधा न दिल्यास मान्यता रद्द
राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट