AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय सांगता ? मजुरांच्या भूमिकेत अवतरले पोलीस ; 2 एकरातील कापूस वेचणी करुन बळीराजाला मदतीचा हात

. वाऱ्यामुळे पांढऱ्या सोन्याचे नुकसान अन् शेतकऱ्यांचे हाल हे पोलीसांनी पाहवले नाहीत. त्यामुळे किसानच्या मदतीला जवान धावून आले आणि त्यांनी चक्क 2 एकरातील कापूस वेचणी केली. एवढेच नाही तर कापसाच्या सुरक्षित ठिकाणी साठवणूकीसाठाही मदतही केली. गडचिरोली जिल्ह्यातील रेगुंठा पोलीस ठाण्यातील अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी हे चौकटीच्या बाहेर जाऊन केलेल्या कामाचे सोशल मिडियात मोठे कौतुक होत आहे.

काय सांगता ? मजुरांच्या भूमिकेत अवतरले पोलीस ; 2 एकरातील कापूस वेचणी करुन बळीराजाला मदतीचा हात
निसर्गाच्या लहरीपणामुळे कापसाचे नुकसान होत असल्याने रेगुंठा पोलीस ठाण्याच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनीच शेतकऱ्याला कापूस वेचणी करुन दिली
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Dec 04, 2021 | 8:01 AM
Share

गडचिरोली : सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकूटीला आला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरकावून घेतला असतानाच मजूंराअभावी गडचिरोली जिल्ह्यात (Cotton picking) कापूस वेचणीही रखडलेली आहे. वाऱ्यामुळे (Cotton Damaged) पांढऱ्या सोन्याचे नुकसान अन् शेतकऱ्यांचे हाल हे (gadchiroli Police) पोलीसांनी पाहवले नाहीत. त्यामुळे किसानच्या मदतीला जवान धावून आले आणि त्यांनी चक्क 2 एकरातील कापूस वेचणी केली. एवढेच नाही तर कापसाच्या सुरक्षित ठिकाणी साठवणूकीसाठाही मदतही केली. गडचिरोली जिल्ह्यातील रेगुंठा पोलीस ठाण्यातील अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी हे चौकटीच्या बाहेर जाऊन केलेल्या कामाचे सोशल मिडियात मोठे कौतुक होत आहे.

यंदा लांबलेल्या पावसामुळे कापूस वेचणी रखडलेली आहे. यातच मजुरांची टंचाई निर्माण झाल्याने वेचणीला आलेल्या कापसाची देखील तोडणी शेतकरी करु शकत नाही. यामध्ये वातावरणातील बदलामुळे कापसाचे नुकसान होत आहे. हीच अडचण लक्षात घेऊन हतबल शेतकऱ्याला पोलीसांनी मदतीचा हात दिलेला आहे.

14 पोलीस कर्मचारी अन् 2 एकरातील कापूस वेचणी

शेती व्यवसयात गटाने काम केले तरच उत्पादनात वाढ होणार आहे. मात्र, आजही गावातील शेतकरी एकवटलेले नाहीत पण याचे महत्व रेगुंठा पोलीस ठाण्यातील कर्मचारी अधिकारी यांना कळलेले आहे. सध्या वातावरणातील बदलामुळे कापसाचे नुकसान होत आहे. वाऱ्यामुळे पांढरे सोने अस्ताव्यस्त होत असताना शेतकऱ्याचे हाल पाहवले नाहीत म्हणून रेगुंठा पोलीस ठाण्यातील 14 अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्याच्या बांधावर आले आणि एका दिवसामध्ये त्यांनी 2 एकरामध्ये 3 ते 4 क्विंटल कापसाची वेचणी केली आहे.

कापूस वेचणीला 20 रुपये किलो मजुरी

खरीप हंगामातील कापसाचे पिक आता अंतिम टप्प्यात आहे. नोव्हेंबर अखेरीसच कापूस वेचणी अंतिम टप्प्यात असते. पण यंदा पाऊस लांबल्याने शेती कामे रखडलेली आहेत. यात कापूस वेचणीसाठी मजुर मिळत नाहीत अशी अवस्था झालेली आहे. प्रति 1 किलो कापूस वेचणीसाठी 20 रुपये मजुरी देऊनही मजुर मिळत नाहीत अशी अवस्था झालेली आहे. त्यामुळे पांढऱ्या सोन्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. उत्पादनावर अधिकचा खर्च करुनही त्याच्या विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सोशल मिडीयावर कौतुकाचा वर्षाव

पोलीसांच्या अभिनव उपक्रमाचे कौतुक हे सोशल मिडियावर हे होतच असते. पण शेतकऱ्याला करण्यात आलेल्या मदतीमुळे किसानच्या मदतीला जवान, जय जवान, जय किसान अशा पध्दतीने नेटकरी व्यक्त झाले आहेत. केवळ कापूस वेचणीच नाही तर वेचलेला कापूस पुन्हा पोत्यामध्ये भरुन सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी पोलीसांनी शेतकऱ्याला मदत केलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

संबंधित बातम्या :

रेशीम उद्योगाचे महत्व, ‘असा’ घ्या योजनेचा लाभ..!

अवकाळी पावसाने कांदा उत्पादक हवालदिल; रब्बी पिकांवरही बुरशीजन्य आजार

ऊस गाळप हंगाम मध्यावर, ऊसतोड कामगारांचा विकास मात्र कागदावरच

Follow Us
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम.

आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम

Surya Gochar : या 4 राशींसाठी शुभ ठरणार सूर्य गोचर, धनलाभ होणार.

Surya Gochar : या 4 राशींसाठी शुभ ठरणार सूर्य गोचर, धनलाभ होणार

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा.

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा