AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur Market : हमीभाव केंद्र सुरु होताच तुरीच्या बाजारभावात मोठे बदल, सोयाबीन दर मात्र, स्थिरच

तुरीचे हमीभाव केंद्र सुरु होण्यापूर्वी कधी दर हे 6 हजारपेक्षा अधिकचे झाले नव्हते मात्र, आता तुरीच्या बाजारभावात मोठे फरक आढळून येत आहेत. तुरीला हमीभाव केंद्रावर 6 हजार 300 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. असे असताना बाजारभावातील दर वाढल्याने हमीभाव केंद्राकडे शेतकरी आता पाठ फिरवत आहेत.

Latur Market : हमीभाव केंद्र सुरु होताच तुरीच्या बाजारभावात मोठे बदल, सोयाबीन दर मात्र, स्थिरच
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jan 10, 2022 | 3:39 PM
Share

लातूर : (Toor Guarantee Centre) तुरीचे हमीभाव केंद्र सुरु होण्यापूर्वी कधी दर हे 6 हजारपेक्षा अधिकचे झाले नव्हते मात्र, आता तुरीच्या बाजारभावात मोठे फरक आढळून येत आहेत. तुरीला हमीभाव केंद्रावर 6 हजार 300 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. असे असताना बाजारभावातील दर वाढल्याने हमीभाव केंद्राकडे (Farmer) शेतकरी आता पाठ फिरवत आहेत. केंद्र सुरु होण्यापूर्वी कधी दर हे 6 हजारापेक्षा जास्त झालेच नाहीत. पण (Traders) व्यापाऱ्यांनी आपली भूमिका बदल्याने हे फरक दिसून येत आहेत. दुसरीकडे (Soybean Rate) सोयाबीनचे दर गेल्या आठ दिवसांपासून स्थिरच आहेत. शिवाय आवक ही वाढत असून शेतकरी आता साठणूकीतला मालाची विक्री करीत आहेत.

तुरीच्या दरामध्ये असा बदल

खरीप हंगामातील शेवटच्या टप्प्यात असलेल्या तूरीची बाजारपेठेत आवक सुरु झाली आहे. हंगामाच्या सुरवातीला तुरीचे दर हे 5 हजार 700 ते 5 हजार 900 च्या दरम्यानच होते. मात्र, राज्यात हमीभाव केंद्र ही सुरुच झालेले नव्हते. नाफेडने हमीभाव केंद्रावर तुरीला 6 हजार 300 चा दर ठरवेलेला आहे. मात्र, 1 जानेवारी रोजी राज्यात 186 ठिकाणी हमीभाव केंद्र ही सुरु झाली आहेत. त्यापूर्वी कधीही तूरीचे दर हे वाढलेले नव्हते. या आठ दिवासाच्या कालावधीमध्ये बाजारातील तूरीच्या दराने हमीभाव दराचा टप्पा ओलंडला आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी केंद्राकडे पाठ फिरवून व्यापाऱ्यांकडे विक्री करीत आहेत.

सोयाबीन दर अन् आवकही स्थिरच

डिसेंबर महिन्यात सोयाबीनच्या दरात मोठे फेरबदल झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांकडील साठवलेल्या सोयाबीनचे काय होणार हा प्रश्न कायम होता. मात्र, नववर्षात सोयाबीन, कापूस दरामध्ये चांगलीच सुधारणा झालेली आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित नाही पण दरात वाढ होऊन सोयाबीन हे 6 हजार 350 रुपयांवर स्थिरावलेले आहे. सोयाबीनचे दर स्थिर झाल्यापासून आवकही वाढली आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 ते 20 हजार पोत्यांची आवक सुरु आहे. साठवणूकीतल्या सोयाबीनची विक्री होत असली तरी ती टप्प्याटप्प्याने होत आहे.

खरिपातील तीन्हीही पिकांच्या दरात वाढ

सध्या खरिपातील सोयाबीन, तूर आणि कापसाची मोठ्या प्रमाणात आवक सुरु आहे. हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनला केवळ 4 हजार 400 रुपये दर होता तर कापसाची एन्ट्री ही दमदारच झाली होती. मध्यंतरी केवळ कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम झाला होता. यंदा दरात घसरण झाली की, विक्रीपेक्षा साठवणूकीवरच शेतकऱ्यांनी भर दिला होता. त्यामुळे अंतिम टप्प्यात या दोन्हीही पिकांच्या किंमती वाढल्या आहेत. तर आता तूरीची आवक सुरु झाली असून 5 हजार 800 वरील दर आता 6 हजार 600 पर्यंत गेले आहेत. त्यामुळे हंगामाचा शेवट हा गोड होताना दिसत आहे.

संबंधित बातम्या :

Onion : सोलापूरच्या बाजारपेठेत कांद्याची विक्रमी आवक अन् दरात घसरण, नेमके कशामुळे बिघडले भावाचे गणित?

Success Story : 10 एकरातील ‘पिंक’ पेरुच्या लागवडीने उजाडली 25 लाखाच्या उत्पन्नाची ‘गुलाबी’ पहाट ; लॉकडाऊनचा असा हा सदउपयोग

खरिपातील सोयाबीनचा असा झाला उपयोग, शेतकऱ्यांना मिळाले नाही उत्पन्न पण मार्गी लागला जनावरांच्या..

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.