AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जुलै महिन्यात पावसाचं प्रमाण किती राहणार? भारतीय हवामान विभागानं काय सांगितलं?

भारतीय हवामान विभागानं शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती जाहीर केली आहे. हवामान विभागानं जुलै महिन्यात नैऋत्य मान्सूनचा पाऊस सामान्य राहिलं, असा अंदाज वर्तवला आहे.

जुलै महिन्यात पावसाचं प्रमाण किती राहणार? भारतीय हवामान विभागानं काय सांगितलं?
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jul 01, 2021 | 7:36 PM
Share

नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागानं शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती जाहीर केली आहे. हवामान विभागानं जुलै महिन्यात नैऋत्य मान्सूनचा पाऊस सामान्य राहिलं, असा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाचे महानिदेशक मृत्यूंजय महापात्रा यांनी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमी पाऊस होईल, मात्र दुसऱ्या आठवड्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Imd predicted monsoon to be normal in month of july imd rain updates )

देशात शेतकरी खरिप हंगामाच्या पेरण्या करण्यामध्ये व्यस्त आहेत. एका अंदाजानुसार 20 कोटी शेतकरी खरिप हंगामात धान, सोयाबीन, कापूस, मका, मूग, भूईमूग, ऊस, उडीद आणि तूर या पिकांची लागवड करत आहेत. खरिप हंगामातील शेती प्रामुख्यानं मान्सूनच्या पावसावर अवंलंबून असते. मान्सून सामान्य राहिल्यास शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो. खरिपातील पिकांना पाणी द्यावं लागत नाही.

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यात मान्सून सामान्य राहिल. भारतीय हवामान विभाग ऑगस्ट महिन्याचा अंदाज जुलै महिन्याच्या शेवटी किंवा 1 ऑगस्टला जारी करेल. नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनचा पाऊस हरियाणा, पंजाब दिल्ली, पश्चिम राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील काही भागात अद्यापही पोहोचलेला नाही. या भागात मान्सून पोहोचण्यासाठी अनुकूल परिस्थिती नाही.

8 जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार

भारतात मान्सूनचा पाऊस दोन दिवस उशिरा दाखल झाला. त्यानंतर मान्सूननं गती पकडली होती. पुढील 7 ते 10 दिवसात मान्सून देशातील विविध भागात पोहोचला. यानंतर मान्सूनचा जोर ओसरला. हवामान विभागाच्या माहितीनुसार 8 जुलैपासून बंगालच्या खाडीवरुन येणारं वारं सक्रिय होईल. त्यामुळे देशात मान्सून 8 जुलैनंतर सक्रिय होईल.

30 जून पर्यंतचे राज्यातले पावसाचे चित्र

राज्यात मान्सून सक्रिय झाल्यापासून सातारा, कोल्हापूर, मुंबई, जालना, परभणीमध्ये सर्वाथिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. तर सर्वात कमी पाऊस अकोला, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये झाला आहे. तर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पुणे, सांगली,पालघर, औरंगाबाद, बीड, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर मध्ये नियमित सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झालीय. तर, नाशिक, अहमदनगर, बुलडाणा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, गडचिरोली, गोंदियामध्ये देखील समाधानकारक पाऊस झाला आहे.

इतर बातम्या:

कृष्णा साखर कारखान्यावर कुणाची सत्ता? शेतकऱ्यांचा कौल कुणाला? प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण

चाळीसगावमधील भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, आई, वडील आणि बहिण गमावलेला चिमुरडा गंभीर जखमी

Imd predicted monsoon to be normal in month of july imd rain updates

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.