AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Unseasonable Rain : आंबा हंगामाचा शेवटही अवकाळीनेच, उन्हाळी पिकांवरही अवकृपाच

गेल्या महिन्याभरापासून अवकाळीने उसंत घेतली होती. त्यामुळे सर्वकाही सुरळीत होईल अशी आशा शेतकऱ्यांना असतानाच पुन्हा अवकाळीने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव, तामसा येथे बुधवारी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. जवळपास अर्धा तास वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने आंबागळ झाली.

Unseasonable Rain : आंबा हंगामाचा शेवटही अवकाळीनेच, उन्हाळी पिकांवरही अवकृपाच
अवकाळीमुळे नांदेड जिल्ह्यामध्ये आंबा पिकाचे नुकसान झाले आहे.
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: May 05, 2022 | 9:42 AM
Share

नांदेड : सबंध वर्षभर निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम काय असतो याचा प्रत्यय प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांना आला आहे. पावसामुळे खरिपातील उत्पादनात घट झाली तर सर्वाधिक नुकसान हे फळबागांचे झाले होते. आता (Mango Orchard) आंबा पिक अंतिम टप्प्यात असताना (Marathwada) मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यामध्ये (Unseasonable Rain) अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे आंबा उत्पादकांच्या आशा मावळल्या आहेत. यापुर्वी कडाक्याच्या उन्हामुळे आंबा बागा करपल्याच्या घटना घडल्या होत्या तर आता पावसामुळे फळगळ झाली आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे वर्षाचे नियोजन बिघडले आहे. एवढेच नाही तर आता उन्हाळी पिकांनाही याचा फटका बसला आहे. 15 दिवसांनी काढणी कामे सुरु होणार असतानाच झालेल्या पावसामुळे सोयाबीन, भुईमूगच्या उत्पादनात घट होण्याच धोका आहे.

वादळी-वाऱ्यासह पावसाची हजेरी

गेल्या महिन्याभरापासून अवकाळीने उसंत घेतली होती. त्यामुळे सर्वकाही सुरळीत होईल अशी आशा शेतकऱ्यांना असतानाच पुन्हा अवकाळीने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव, तामसा येथे बुधवारी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. जवळपास अर्धा तास वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने आंबागळ झाली. यापुर्वीच उन्हामुळे आंब्याचे नुकसान झाले होते तर आता पावसामुळे अधिकचे नुकसान झाले आहे.

उन्हाळी पीके अंतिम टप्प्यात

उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने यंदा प्रथमच उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन सोयाबीन, भुईमूग, राजमा या पिकांची लागवड केली होती. संपूर्ण हंगामात पाण्याची उपलब्धता असल्याने पिकेही बहरात होती. त्यामुळे उत्पादनात वाढ होईल असा आशावाद शेतकऱ्यांना होता. पण हंगामाच्या अंतिम टप्प्यात अवकाळीमुळे पुन्हा उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. खरीप हंगामात ज्याप्रमाणे सोयाबीनचे नुकसान झाले तीच अवस्था आता उन्हाळी हंगामात झाली आहे. शेतकरी उत्पादन वाढीसाठी एक ना अनेक प्रयत्न करीत आहे पण त्याला अवकाळीचा अडसर हा ठरलेलाच आहे.

शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?

सध्या उन्हाळी हंगामातील पिके ही अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे सोयाबीन पिवळे पडल्यास त्याची काढणी करुन सुरक्षित ठिकाणी साठवणूक ही गरजेची आहे. तर भुईमूगाला अद्याप वेळ असल्याने अवकाळी पावसाचा त्याच्यावर परिणाम होणार नाही.तर दुसरीकडे या अवकाळी पावसामुळे शेती मशागतीची कामे करणे सोईस्कर होणार आहे. या दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांना शेती मशागतीची कामे उरकून घेण्याचा सल्ला कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी दिला आहे.

Follow Us
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा इशारा; तुमच्या नसानसात...
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील बडा नेता हे काय बोलून गेला? थेट मुख्यमंत्री...
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट रेल्वे रुळावरच... पहा व्हिडीओ
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!