AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकात्मिक शेतीमध्ये उत्पादनात वाढ अन् शेतकऱ्यांचाही फायदा

शेती व्यवसयात काळाच्या ओघात अमूलाग्र बदल होत आहे. उत्पादन वाढीसाठी एक ना अनेक पर्याय हे खुले केले जात आहे. त्यामुळे शेती व्यवसाय हा आता तोट्याचा राहिला नसून ज्या शेतकऱ्यांनी अत्याधुनिकतेची कास धरली आहे त्यांच्या उत्पादनात तर वाढ झालीच आहे पण एकात्मिक शेती पध्दतीमुळे शेतीचा आणि शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास झालेला आहे.

एकात्मिक शेतीमध्ये उत्पादनात वाढ अन् शेतकऱ्यांचाही फायदा
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Oct 16, 2021 | 6:30 PM
Share

मुंबई : शेती व्यवसयात काळाच्या ओघात अमूलाग्र बदल होत आहे. (Change in agricultural system) उत्पादन वाढीसाठी एक ना अनेक पर्याय हे खुले केले जात आहे. त्यामुळे शेती व्यवसाय हा आता तोट्याचा राहिला नसून ज्या शेतकऱ्यांनी अत्याधुनिकतेची कास धरली आहे त्यांच्या उत्पादनात तर वाढ झालीच आहे पण एकात्मिक शेती पध्दतीमुळे शेतीचा आणि शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास झालेला आहे. (integrated farming system) एकात्मिक शेती पध्दत आता रुजत असून नवनविन प्रयोगांचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

अनेक शेतकरी हे एकत्र येत विविध पीकाचे उत्पादन घेऊन त्याला बाजारपेठ मिळेपर्यंत एकत्रीत शेती करुन लाखोंची कमाई करीत आहेत. त्यामुळे एकात्मिक शेती म्हणजे काय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा कसा विकास झाला आहे ते आपण पाहणार आहोत.. पारंपारिक पध्दतीने शेती करणारे शेतकरी हे सुरुवातीला नवीन मॉडेल स्वीकारण्यास टाळाटाळ करतात, परंतु नफा कमावण्यास सुरुवात झाली की यामध्येच वेगवेगळे उपक्रम करतात. अशाच प्रकारचे एक मॉडेल आहे एकात्मिक शेती. मोठ्या संख्येने शेतकरी हे शेत जमिन दत्तक घेतात आणि उत्पादनात वाढ करीत आहेत.

एकात्मिक शेती म्हणजे काय?

एकात्मिक शेती ही लहान-मोठे शेतकरी एकत्र य़ेऊन केली जाणारी अत्याधुनिक शेती पध्दत आहे. शिवाय मोठे शेतकरीही या प्रणालीद्वारे शेती करून नफा कमवू शकतात. एकात्मिक कृषी व्यवस्थेचे मुख्य उद्दीष्ट शेतजमिनीच्या प्रत्येक भागाचा योग्य वापर करणे हा आहे. यामध्ये शेतकरी हे एकाच वेळी वेगवेगळी पिके, फुले, भाज्या, गुरांचे संगोपन, फळउत्पादन, मधमाशीपालन, मत्स्यपालन इत्यादी करू शकता. यातून केवळ उत्पादन वाढविणे हाच उद्देश आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या संसाधनांचा पूर्ण वापर करुन उत्पादन कसे वाढवता येईल यावर लक्ष केंद्रीत केले जाते. खर्च कमी आणि उत्पादकता अधिक हाच उद्देश या एकात्मिक शेती पध्दतीचा आहे. एकात्मिक कृषी व्यवस्था पर्यावरणपूरक असून शेतीची खतशक्तीही वाढवते.

एकात्मिक शेतीचा फायदा काय?

– उत्पादकता वाढते. – शेतकरी अधिकाधिक नफा कमावतात. – शेतीच्या कामांचा खर्च कमी करतो. – शेताची खत क्षमता वाढते. – संरचनांचा संपूर्ण वापर होतो. – जोखीम कमी असते. – रोजगाराच्या संधी निर्माण होतात.

एकात्मिक शेता नेमकी कशी केली जाते?

झारखंडची राजधानी रांची जिल्ह्यात एका गावात शेतकरी एकात्मिक शेती करत आहेत. ते पाच एकर जमिनीवर धानासह फुले आणि भाजीपाला पिके घेत आहेत. याशिवाय येथे मासे शेती, कुक्कुटपालन, शेळी पालन आणि दूधही तयार केले जात आहे. येथील शेतकरी सांगतात की, ते गरजू शेतकऱ्यांना कृषी अवजारेही भाड्याने देतात. त्यातूनही त्यांना उत्पन्नही मिळत राहते. शेतकऱ्याच्या मते पाच एकर जमिनीवर अनेक पिके, फुले, भाज्या आणि पशुसंवर्धन असे व्यवसाय केले जात आहेत.

शिवाय जनावरांच्या चाऱ्याची कमतरता नाही आणि त्यांच्या शेणापासून कंपोस्ट खत तयार केले जाते. त्यामुळे लागवडीचा खर्च कमी होतो. वेगवेगळ्या पिकांच्या पेरणीमुळे शेताची खतशक्ती वाढते आणि उत्पन्नही वाढते. एकात्मिक शेती पध्दतीमुळे दरवर्षी पाच एकरात 8 लाखाचे उत्पन्न मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. (Increase in production due to integrated farming system and development of farmers also)

संबंधित बातम्या :

पहिला दिवस ढगाळ वातावरणाचा, कांद्याची काळजी घ्या अन्यथा वांदाच…

कापूस उत्पादकांना अधिकच्या दराची संधी, दिवाळी पर्यंत करावी लागणार प्रतीक्षा

भाजीपाला उत्पादन वाढवण्यासाठी ‘स्टॅकिंग’ पध्दत ; उत्पादन अधिक नुकसान कमी

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक