AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकात्मिक शेतीमध्ये उत्पादनात वाढ अन् शेतकऱ्यांचाही फायदा

शेती व्यवसयात काळाच्या ओघात अमूलाग्र बदल होत आहे. उत्पादन वाढीसाठी एक ना अनेक पर्याय हे खुले केले जात आहे. त्यामुळे शेती व्यवसाय हा आता तोट्याचा राहिला नसून ज्या शेतकऱ्यांनी अत्याधुनिकतेची कास धरली आहे त्यांच्या उत्पादनात तर वाढ झालीच आहे पण एकात्मिक शेती पध्दतीमुळे शेतीचा आणि शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास झालेला आहे.

एकात्मिक शेतीमध्ये उत्पादनात वाढ अन् शेतकऱ्यांचाही फायदा
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Oct 16, 2021 | 6:30 PM
Share

मुंबई : शेती व्यवसयात काळाच्या ओघात अमूलाग्र बदल होत आहे. (Change in agricultural system) उत्पादन वाढीसाठी एक ना अनेक पर्याय हे खुले केले जात आहे. त्यामुळे शेती व्यवसाय हा आता तोट्याचा राहिला नसून ज्या शेतकऱ्यांनी अत्याधुनिकतेची कास धरली आहे त्यांच्या उत्पादनात तर वाढ झालीच आहे पण एकात्मिक शेती पध्दतीमुळे शेतीचा आणि शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास झालेला आहे. (integrated farming system) एकात्मिक शेती पध्दत आता रुजत असून नवनविन प्रयोगांचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

अनेक शेतकरी हे एकत्र येत विविध पीकाचे उत्पादन घेऊन त्याला बाजारपेठ मिळेपर्यंत एकत्रीत शेती करुन लाखोंची कमाई करीत आहेत. त्यामुळे एकात्मिक शेती म्हणजे काय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा कसा विकास झाला आहे ते आपण पाहणार आहोत.. पारंपारिक पध्दतीने शेती करणारे शेतकरी हे सुरुवातीला नवीन मॉडेल स्वीकारण्यास टाळाटाळ करतात, परंतु नफा कमावण्यास सुरुवात झाली की यामध्येच वेगवेगळे उपक्रम करतात. अशाच प्रकारचे एक मॉडेल आहे एकात्मिक शेती. मोठ्या संख्येने शेतकरी हे शेत जमिन दत्तक घेतात आणि उत्पादनात वाढ करीत आहेत.

एकात्मिक शेती म्हणजे काय?

एकात्मिक शेती ही लहान-मोठे शेतकरी एकत्र य़ेऊन केली जाणारी अत्याधुनिक शेती पध्दत आहे. शिवाय मोठे शेतकरीही या प्रणालीद्वारे शेती करून नफा कमवू शकतात. एकात्मिक कृषी व्यवस्थेचे मुख्य उद्दीष्ट शेतजमिनीच्या प्रत्येक भागाचा योग्य वापर करणे हा आहे. यामध्ये शेतकरी हे एकाच वेळी वेगवेगळी पिके, फुले, भाज्या, गुरांचे संगोपन, फळउत्पादन, मधमाशीपालन, मत्स्यपालन इत्यादी करू शकता. यातून केवळ उत्पादन वाढविणे हाच उद्देश आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या संसाधनांचा पूर्ण वापर करुन उत्पादन कसे वाढवता येईल यावर लक्ष केंद्रीत केले जाते. खर्च कमी आणि उत्पादकता अधिक हाच उद्देश या एकात्मिक शेती पध्दतीचा आहे. एकात्मिक कृषी व्यवस्था पर्यावरणपूरक असून शेतीची खतशक्तीही वाढवते.

एकात्मिक शेतीचा फायदा काय?

– उत्पादकता वाढते. – शेतकरी अधिकाधिक नफा कमावतात. – शेतीच्या कामांचा खर्च कमी करतो. – शेताची खत क्षमता वाढते. – संरचनांचा संपूर्ण वापर होतो. – जोखीम कमी असते. – रोजगाराच्या संधी निर्माण होतात.

एकात्मिक शेता नेमकी कशी केली जाते?

झारखंडची राजधानी रांची जिल्ह्यात एका गावात शेतकरी एकात्मिक शेती करत आहेत. ते पाच एकर जमिनीवर धानासह फुले आणि भाजीपाला पिके घेत आहेत. याशिवाय येथे मासे शेती, कुक्कुटपालन, शेळी पालन आणि दूधही तयार केले जात आहे. येथील शेतकरी सांगतात की, ते गरजू शेतकऱ्यांना कृषी अवजारेही भाड्याने देतात. त्यातूनही त्यांना उत्पन्नही मिळत राहते. शेतकऱ्याच्या मते पाच एकर जमिनीवर अनेक पिके, फुले, भाज्या आणि पशुसंवर्धन असे व्यवसाय केले जात आहेत.

शिवाय जनावरांच्या चाऱ्याची कमतरता नाही आणि त्यांच्या शेणापासून कंपोस्ट खत तयार केले जाते. त्यामुळे लागवडीचा खर्च कमी होतो. वेगवेगळ्या पिकांच्या पेरणीमुळे शेताची खतशक्ती वाढते आणि उत्पन्नही वाढते. एकात्मिक शेती पध्दतीमुळे दरवर्षी पाच एकरात 8 लाखाचे उत्पन्न मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. (Increase in production due to integrated farming system and development of farmers also)

संबंधित बातम्या :

पहिला दिवस ढगाळ वातावरणाचा, कांद्याची काळजी घ्या अन्यथा वांदाच…

कापूस उत्पादकांना अधिकच्या दराची संधी, दिवाळी पर्यंत करावी लागणार प्रतीक्षा

भाजीपाला उत्पादन वाढवण्यासाठी ‘स्टॅकिंग’ पध्दत ; उत्पादन अधिक नुकसान कमी

Follow Us
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?.

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?

Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन….

Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन…