AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजीपाला उत्पादन वाढवण्यासाठी ‘स्टॅकिंग’ पध्दत ; उत्पादन अधिक नुकसान कमी

'स्टॅकिंग' यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन तर वाढतच आहे शिवाय नुकसानही कमी होत आहे. 'स्टॅकिंग' ही पध्दत जरी वेगळी वाटत असली तरी कोणत्याही शेतकऱ्यांसाठी सोपी पध्दत आहे. नेमके 'स्टॅकिंग' म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय याची माहिती आपण घेऊ...

भाजीपाला उत्पादन वाढवण्यासाठी 'स्टॅकिंग' पध्दत ; उत्पादन अधिक नुकसान कमी
भाजीपाल्याची अशा स्टॅकिंग पद्धतीने लागवड केल्यास उत्पादन वाढणार आहे
| Edited By: | Updated on: Oct 16, 2021 | 3:51 PM
Share

मुंबई : (Farming) शेती व्यवसयात नव-नवे प्रयोग राबवले जात आहे. अत्याधिनिक पध्दतीमुळे उत्पादनात तर वाढ होतेच पण वेळेची बचत आणि नुकसानही कमी होत आहे. काळाच्या ओघात कमी मनुष्यबळात अधिकचे काम हा उद्देश महत्वाचा आहे. केवळ मुख्य पीकांसाठीच नाही तर आता भाजीपाल्यासाठीही ही प्रणाली वापरली जात आहे. (vegetable production) ‘स्टॅकिंग’ यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन तर वाढतच आहे शिवाय नुकसानही कमी होत आहे. ‘स्टॅकिंग’ ही पध्दत जरी वेगळी वाटत असली तरी कोणत्याही शेतकऱ्यांसाठी सोपी पध्दत आहे. नेमके ‘स्टॅकिंग’ म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय याची माहिती आपण घेऊ…

मुख्य पीकाबरोबर जर भाजीपाल्याची लागवड केली जात असली तर अशा शेतकऱ्यांसाठी ही पध्दत उपयोगी ठरणार आहे. यातून शेतकऱ्याचे उत्पन्न नक्की वाढेल. ही पध्दत वेगळी वाटत असली तरी आपल्याकडील शेतकऱ्यांसाठी सहज शक्य आहे.

स्टॅकिंग पद्धत काय आहे?

‘स्टॅकिंग’ पद्धतीत बांबूचा वापर करून वायर आणि दोरीचे जाळे तयार केले जाते. यावर वनस्पतींच्या वेली पसरवल्या जातात. या पध्दतीचा अवलंब करुन शेतकरी वांगी, टोमॅटो, मिरचीसह भोपळ्याची लागवड करु शकतात. बऱ्याच गावातील शेतकरी स्टॅकिंग पद्धतीने शेती यशस्वीरित्या करत आहेत. या पद्धतीमुळे पिके सुरक्षित राहतात. एका विशिष्ट अंतारावर ही भाजीपाला सुरक्षित शिवाय किडीचा प्रादुर्भाव नसल्याने उत्पादनात वाढ होते. वेळेत बाजारपेठेत माल दाखल झाल्यावर योग्य दरही मिळतो.

स्टॅकिंग पद्धत अवलंबण्याची पद्धत

‘स्टॅकिंग’ या पध्दतीने जर भाज्यांची लागवड करायची असेल तर प्रथम बांबूचे 10 फुट उंच लाकूड हे 10 फुटाच्या अंतरावर बांधाला गाडावेत. 10 बाय 10 फुटावर हे बांबू गाडावे लागणार आहेत. त्यानंतर या बांबूच्या लाकडावर 2-2 फुट उंचीवर तार बांधावी लागणार आहे. त्यानंतर वेलींना किंवा झाडांना सुतळीच्या मदतीने त्या तारांवर बांधावे लागणार आहे. जेनेकरुन वेली किंवा झाडे त्या बाजूने वाढतील. याप्रमाणे झाडांची उंचीही 8 फूट होत असते आणि त्यानंतर झाडे मजबूत होत उत्पन्न अधिक देतात.

स्टॅकिंग पद्धतीचा फायदा

या पिकांच्या झाडांना आधार मिळाल्याने हे झाडे खाली वाकत नाहीत. यामुळे पद्धतीच्या मदतीने टोमॅटो, वांगे, मिरची, सडण्यापासून वाचू शकते. वेली फळ भाज्यांचा अधिक भार सहन करु शकत नाहीत. त्यामुळे या पद्धतीमुळे वेलींना आधार मिळतो. जर फळ भाज्या खाली ओलाव्यात पडून राहतील तर त्या सडून जात असतात. परंतु या पद्धतीमुळे तो धोका टळतो. यासह फळ भाज्यांच्या वजनामुळे झाडे वेली तुटून जात असतात. पण स्टॅकिंगमुळे मात्र हाही धोका टळत असतो. (Now adopt stacking method to increase vegetable production; Beneficial method to farmers)

संबंधित बातम्या :

सोयबीनचे दर घटूनही का वाढत आहे आवक ? सोयाबीनच्या दराचा भरवासाच राहिला नाही

ऊस कारखानेच करीत आहेत एकरकमी ‘एफआरपी’ ची घोषणा, काय आहे पडद्यामागची गोष्ट ?

जगातली सर्वात तिखट मिरची, तीन तुकडे खाल्ले तर ‘जागतिक रेकॉर्ड’ अन् चार खाल्ले तर ‘गिनीज वर्ल्ड’ रेकॉर्डमध्ये नोंद

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.