AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buldhana : ऐकावे ते नवलच, अधिकारीच विकतात शेतकऱ्यांच्या जमिनी, शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

शेतामधला बांध कोरला तरी जीवघेणी भांडणे होतात. पण बुलडाण्यातील प्रकार ऐकल्यानंतर तुम्हीही चक्रावून जाताल. कारण येथील महसूल विभागातील अधिकाऱ्यांनीच शेतकऱ्यांच्या शेत जमिनी परस्पर विकल्याचा आरोप केला जातोय. एवढेच नाही तर या अदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी परत देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्यासह पीडित आदिवासी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून आमरण उपोषणाला बसले आहेत.

Buldhana : ऐकावे ते नवलच, अधिकारीच विकतात शेतकऱ्यांच्या जमिनी, शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
अदिवासी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी परत द्याव्यात या मागणीसाठी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे उपोषण सुरु आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 29, 2022 | 9:30 AM
Share

बुलडाणा : शेतामधला बांध कोरला तरी जीवघेणी भांडणे होतात. पण (Buldhana) बुलडाण्यातील प्रकार ऐकल्यानंतर तुम्हीही चक्रावून जाताल. कारण येथील (Revenue Department) महसूल विभागातील अधिकाऱ्यांनीच शेतकऱ्यांच्या शेत जमिनी परस्पर विकल्याचा आरोप केला जातोय. एवढेच नाही तर या अदिवासी शेतकऱ्यांच्या (Farm Land) जमिनी परत देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्यासह पीडित आदिवासी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत हे अधिकारी परस्परच कागदपत्रावर खाडाखोड करुन संबंधित लोकांना जमिनीचा हावाला देत आहेत. हा प्रकार आता समोर आला असून शेतकऱ्यांनी थेट आमरण उपोषणाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे यावर काय तोडगा काढला जाणार हे पहावे लागणार आहे.

शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा

अदिवासी भागातील शेतकऱ्यांना कागदांचा खेळ लक्षात येत नाही. याचाच फायदा महसूलच्या अधिकाऱ्यांनी घेऊन या शेतकऱ्यांच्या जमिनी परस्पर विकल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे आपल्या शेतजमिनी विकल्याची माहितीही या शेतकऱ्यांना नव्हती. जमिन कसायला गेल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे संग्रामपूर तालुक्यातील चिचारी येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. कागदपत्रांवर खडाखोड करुन हा प्रताप महसूलच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

काय आहेत मागण्या ?

काही लोकांना जमिनी देण्यासाठी महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी सहकार्य केले असून आदिवासी लोकांना त्यांच्या जमिनी परत द्याव्या, तसेच या माफियांवर कारवाई करण्यात यावी, या मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रशांत डिक्कर यांनी पीडित शेतकऱ्यांना सोबत घेऊन मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा,अन्यथा जिल्हाभरात स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा प्रशांत डिक्कर यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा

संग्रामपूर तालुक्यातील चिचारी येथील शेतकऱ्याच्या शेतजमिनीवर काही लोकांनी कब्जा केला आहे. हा सर्व प्रकार शेतकरी जमिन कसायला गेल्यानंतर समोर आला आहे. यासंबंधी शेतकऱ्यांनी स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांना सांगितल्यानंतर आता आंदोलन उभारण्यात आले आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

संबंधित बातम्या :

Russia Ukraine युद्धामुळे खाद्य तेलाचे दर वाढले, भंडारा जिल्ह्यात करडई तेलाचा वापर वाढला

Watermelon : मुख्य पिकांपेक्षा हंगामी कलिंगडातून उत्पन्न, विक्रमी दराने सुरुवात, मिटला शेतकऱ्यांचा वनवास

FCI : गव्हालाही हमीभावाचा ‘आधार’, पंजाबला सर्वाधिक कोटा, केंद्र सरकारचे काय आहे धोरण?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.