AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावच्या केळीचा जगभरात डंका, भारत केळी उत्पादनात अग्रेसर, वर्षभरात 619 कोटींची निर्यात

केळीच्या उत्पादनात (Banana Production) भारत अव्वल क्रमांकावर आहे.आता हळूहळू तो केळी निर्यातीमध्ये इतर देशांशी स्पर्धा करत आहे. Jalgaon banana exported to Dubai

जळगावच्या केळीचा जगभरात डंका, भारत केळी उत्पादनात अग्रेसर, वर्षभरात 619 कोटींची निर्यात
जळगाव केळी
| Edited By: | Updated on: Jun 16, 2021 | 8:51 PM
Share

जळगाव: केळीच्या उत्पादनात (Banana Production) भारत अव्वल क्रमांकावर आहे.आता हळूहळू तो केळी निर्यातीमध्ये इतर देशांशी स्पर्धा करत आहे. भारताकडून भौगोलिक सांकेतांक (जीआय टॅग) प्रमाणित कृषी उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यात येत आहे. भारतीय केळी फायबर आणि खनिजांनी समृद्ध आहेत. महाराष्ट्रातील जळगाव केळीची दुबईमध्ये निर्यात करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील तांदुळवाडी गावच्या प्रगतीशील शेतकऱ्यांकडून 22 मेट्रीक टन जीआय टॅग प्रमाणित जळगाव केळी निर्यात करण्यात आली आहेत. (Jalgaon banana GI certified produced by Tandulwadi Farmers exported to Dubai)

जळगाव केळीला 2016 मध्ये जीआय टॅग

जळगाव केळीला 2016 मध्ये जीआय प्रमाणपत्र मिळाले, जे निसारगर्ज कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) जळगाव येथे नोंदवले गेले आहे. जागतिक स्तरावरील कृषी पद्धती आणि नियमांचा वापर केल्यामुळे भारतातील केळीची निर्यात वेगाने वाढत आहे.

भारताची केळी निर्यात वाढली

भारताच्या केळी निर्यातीचं प्रमाण आणि मूल्य गेल्या काही दिवसांमध्ये वाढलं आहे. 2018-19 मध्ये 1.34 लाख मेट्रिक टन केळी निर्यात झाली. ज्याची किंमत 413 कोटी रुपये होती. 2019-20 मध्ये 660 कोटी रुपयांची निर्यात करण्यात आली. त्यावर्षी 1.95 लाख मेट्रिक टन केळी निर्यात झाली . 2020-21 (एप्रिल 2020-फेब्रुवारी 2021) मध्ये भारताने 619 कोटी रुपयांच्या 1.91 लाख टन केळीची निर्यात केली आहे.

सर्वात मोठा केळी उत्पादक

भारत जगात केळीचा सर्वात मोठे उत्पादक आहे. जगातील एकूण केळी उत्पादनापैकी सुमारे 25 टक्के उत्पादन भारतात होते. देशातील केळी उत्पादनात आंध्र प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्र, केरळ, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये 70 टक्क्यांहून अधिक उत्पादन होते.

कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (आपेडा) शेती माल निर्यातीसाठी मदत करते. निर्यातदारांना त्यांच्या योजनेच्या पायाभूत सुविधा, गुणवत्ता विकास आणि बाजारपेठ विकास या घटकांच्या अंतर्गत सहाय्य करुन कृषी व प्रक्रिया केलेल्या खाद्य उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याचं काम आपेडा करुन केलं जातं. आपेडा आंतरराष्ट्रीय खरेदीदार-विक्रेत्यांच्या बैठका, शेती आणि प्रक्रिया केलेल्या खाद्य उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आयात देशांसह ऑनलाईन व्यापार मेळावे देखील आयोजित करते.

भारतात केळी सर्व हंगामात उपलब्ध असते. केळी बरेच पौष्टिक पदार्थ आढळत असल्यानं केळीची मागणी बाजारात कायम असते. केळीचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात केले जाते. याशिवाय कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, गुजरात आणि आसाममध्येही केळीची बरीच निर्मिती केली जाते.

संबंधित बातम्या

अमेरिकेच्या कृषी विभागाचा भारतातील राज्य सरकारसोबतचा पहिला करार महाराष्ट्राच्या कृषी मंत्रालयाशी, कराराचा नेमका फायदा काय?

ऊसाला गाजर दाखवलं!, पारंपारिक शेतीला फाटा, गाजराच्या शेतीतून भरघोस नफा, गावाचा जिल्ह्यात गाजावाजा

Jalgaon banana GI certified produced by Tandulwadi Farmers exported to Dubai

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.