AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भारताच्या निर्णयामुळे ट्रम्प यांना मोठा झटका, थेट इराणने मानले भारताचे आभार, तोंडभरून कौतुक

एकीकडे अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराणचं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे इराणने आता भारताचे आभार मानले आहेत.

मोठी बातमी! भारताच्या निर्णयामुळे ट्रम्प यांना मोठा झटका, थेट इराणने मानले भारताचे आभार, तोंडभरून कौतुक
S. jaishankarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 09, 2026 | 3:58 PM
Share

मध्य पूर्वेत सध्या युद्धामुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे. अमेरिका, इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा 10 वा दिवस आहे. युद्ध पुढील काही दिवस असंच सुरू राहण्याचे संकेत मिळत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. इराणने एकही अट न ठेवता शरण यावं अशी मागणी त्यांनी केली होती, इराणने ट्रम्प यांची ही मागणी धुडकावून लावली आहे. त्यामुळे चिडलेल्या अमेरिकेनं आता इराणवर हल्ले वाढवले आहेत, दुसरीकडे इस्त्रायलकडून देखील इराणवर हल्ले सुरूच आहेत, आता अमेरिकेकडून इराणचे तेलसाठे लक्ष्य करण्यात येत आहेत. यामध्ये इराणचं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे इराणने देखील अमेरिका आणि इस्त्रायलला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. इराणने केलेल्या हल्ल्यांमध्ये अमेरिकेचं देखील मोठं नुकसान झालं आहे.

या युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे भारताच्या इराणसंदर्भातील धोरणांवरून विरोधकांकडून सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू असतानाच आता इराणने थेट भारताचे आभार मानले आहेत. भारतामधून इराणकडे परतणाऱ्या इराणच्या एका युद्धनौकेवर अमेरिकेच्या पाणीबुडीने हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये ही युद्धनौका बुडाली. या युद्धनौकेमधील 87 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान त्यानंतर लगेचच इराणकडून त्यांची दुसरी एक युद्धनौका IRIS लवनला भारताच्या कोची बंदरात डॉक करण्याची परवानगी इराणकडून मागण्यात आली होती. भारतानं इराणाला त्यांची युद्धनौका IRIS लवनला कोची बंदरात डॉक करण्याची परवानगी दिली, त्यामुळे इराणने भारताचे आभार मानले आहेत.

भारताने परवानगी दिल्यामुळे इराणने भारताचे आभार मानले आहेत, भारताचं हे पाऊल मानवतावादी असल्याचं इराणने म्हटलं आहे. याबाबत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत माहिती दिली. याबाबत माहिती देताना जयशंकर यांनी म्हटलं की सध्या इराणमध्ये परिस्थिती बिघडली आहे, त्यामुळे इराणसोबत उच्चस्तरीय संपर्क ठेवणे कठीण बनलं आहे. परंतु उपलब्ध माध्यमांद्वारे इराणसोबत भारताचा राजनैतिक संवाद सुरू आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी 20 फेब्रुवारी रोजी आणि त्यानंतर युद्ध सुरू झाल्यानंतर 5 मार्च रोजी इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांच्यासोबत बोलणं झालं होतं, त्यानंतर आपण त्यांच्या जहाजांना कोची बंदारात डॉक करण्याची परवानगी देखील दिली. त्यावर प्रतिक्रिया देताना इराणने भारताचे आभार मानले असून, भारताचा हा मानवतावादी दृष्टीकोण असल्याचं इराणने म्हटलं आहे, अशी माहिती एस. जयशंकर यांनी दिली आहे. दरम्यान भारतानं घेतलेली ही भूमिका अमेरिकेसाठी धक्का मानला जात आहे. भारतानं आपल्या कृतीतून ट्रम्प यांना धक्का दिला आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल