AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup: अभिषेक शर्माने अंतिम फेरीत धावा करण्यासाठी वापरला असा टोटका, उधार घेतलं नशिब!

India vs New Zealand, Final: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर अखेर टीम इंडियाने नाव कोरलं आहे. भारताच्या जर्सीवर आता तीन स्टार लागणार आहेत. भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात अभिषेक शर्माची बॅट तळपली. पण या मागे त्याने एक टोटका वापरला होता.

T20 World Cup: अभिषेक शर्माने अंतिम फेरीत धावा करण्यासाठी वापरला असा टोटका, उधार घेतलं नशिब!
T20 World Cup: अभिषेक शर्माने अंतिम फेरीत धावा करण्यासाठी वापरला असा टोटका, उधार घेतलं नशिब!Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Mar 09, 2026 | 3:56 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा शेवट अखेर गोड झाला आहे. भारताने अंतिम फेरीत न्यूझीलंडला पराभूत केलं नाही जेतेपदावर नाव कोरलं. अंतिम फेरीत अभिषेक शर्माची बॅट चांगलीच चालली. त्यामुळे भारताला 255 धावांपर्यंत मजल मारता आली. खरं तर या संपूर्ण स्पर्धेत अभिषेक शर्माची कामगिरी हवी झाली नव्हती. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुरूवातीच्या तीन सामन्यात त्याला खातंही खोलता आलं नव्हतं. दक्षिण अफ्रिकेविरूद्धही फक्त 15 धावाचं खेळी केली. झिम्बाब्वेविरूद्ध 55 धावा केल्या, पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा रूळावरून गाडी घसरली आणि 10 धावांवर बाद झाला. उपांत्य फेरीत इंग्लंडविरूद्ध अभिषेक शर्मा 9 धावा करून तंबूत परतला. त्यामुळे अंतिम फेरीत त्याला संघात जागा देऊ नका अशी ओरड होऊ लागली. पण कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने त्याच्यावर विश्वास टाकला. अखेर अंतिम फेरीत त्याची बॅट तळपली.

अभिषेक शर्माने 21 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 52 धावांची खेळी केली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 247.62 चा होता. खरं तर या स्पर्धेत अभिषेक शर्माचा मनोबल ढासळलं होतं. सलग तीन वेळा शून्यावर बाद झाल्याने संघातील स्थान डळमळीत झालं होतं. पण इतर खेळाडू त्याला आत्मविश्वास देत होते. अंतिम सामन्यातील विजयानंतर अभिषेक शर्माने एक मोठा खुलासा केला आहे. अभिषेक शर्माने सांगितलं की अंतिम फेरीत दुसऱ्याच्या बॅटने फलंदाजी केली. म्हणजेच दुसऱ्या खेळाडूकडून बॅट उधार घेऊन फलंदाजी केली होती. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून शिवम दुबे होता. शिवम दुबेच्या बॅटने त्याने अंतिम फेरीत फटकेबाजी केली.

अभिषेक शर्माने सांगितलं की, ‘आज मी शिवम दुबेच्या बॅटने फलंदाजी केली. सकाळी मला वाटलं की काहीतरी वेगळं केलं पाहीजे. गिल सोबत नव्हता म्हणून मी दुबेकडे गेलो आणि त्याची बॅट घेतली. धन्यवाद दुबे.’ अभिषेक शर्मा जेव्हा वाईट काळ सुरू असतो तेव्हा कोणाकडून काही ना काही घेतो. याच स्पर्धेत अभिषेक शर्मा मोहम्मद सिराजची जर्सी परिधान करून उतरला होता. पण त्यावेळी लक काही चाललं नाही. अंतिम सामन्यात दुबेची बॅट लाभली असं म्हणायला हरकत नाही.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.