AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग; जाणून घ्या बियाणे, खत कधी मिळणार ? राज्य सरकारने दिली माहिती

यावर्षी येत्या 30 मे रोजी बियाणांची विक्री होणार होती. मात्र, 25 मे पासून बियाणे आणि खतांची विक्री केली जाणार आहे. (seed and fertilizer farmers)

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग; जाणून घ्या बियाणे, खत कधी मिळणार ? राज्य सरकारने दिली माहिती
seeds and farmer
| Updated on: May 12, 2021 | 9:55 PM
Share

मुंबई : राज्यात ठिकठिकाणी पूर्वमोसमी पाऊस सुरु झाला असून शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारी सुरु केली आहे. शेतकरी बियाणे, खते ( seed and fertilizer) यांची जोजवणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी मुदतीच्या पाच दिवस आधीच शेतकऱ्यांना बियाणे आणि खते मिळणार आहेत. यावर्षी येत्या 30 मे रोजी बियाणांची विक्री होणार होती. मात्र, आता हीच विक्री पाच दिवस आधी म्हणजेच 25 मे पासून सुरु होणार आहे. कोरोना, मराठा आरक्षण तसेच इतर बाबींवर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारची आज (12 मे) बैठक बोलावण्यात आली होती. याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत सविस्तर  माहिती दिली. (Maharashtra government decided to provide seed and fertilizer to farmers on 25 may for sowing)

राज्य सरकारचा नवा निर्णय काय आहे ?

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी खरीप हंगामाबद्दल चर्चा करण्यात आली. यंदाच्या खरीप हंगामात लागवड करण्यासाठीची तयारी शेतकऱ्यांनी सुरु केली असून त्यासाठी शेतकऱ्यांना खते आणि बियाणे पुरवणे गरजेचे असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले. त्यामुळे सध्याचा कोरोनाकाळ पाहता शेतकऱ्यांना यंदा 5 दिवस आधीच बियाणे खत देण्याचे राज्याने ठरवले. मागील निर्णयानुसार बियाणांची विक्री येत्या 30 मे रोजी सुरू होणार होती. मात्र, आता शेतकऱ्यांना पाच दिवस आधीच म्हणजेच 25 मे पासून बियाणे मिळणार आहेत.

पुरेशा पावसानंतर पेरणी करा

मागील काही वर्षांपासून पावसाचे चक्र बदलले आहे. शेतकऱ्यांनी पेरणी करुन पावसाने कित्येक दिवस दडी मारल्याच्या घटना घडलेल्या आहेत. याच कारणामुळे मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे या वर्षी बियाणे लवकर खरेदी केले तरी पुरेशा पावसानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असे राज्य सरकारने सांगितले आहे.

दरम्यान, राज्यात सध्या कोरोनाविषयक निर्बंध असल्यामुळे कृषीविषयक दुकाने उघडण्यासाठी काही निर्बंध आहेत. त्यामुळे याच गोष्टीचा विचार करुन राज्य सरकारने राज्यातील कृषी दुकाने 10 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील असे सांगितले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना बियाणे तसेच खते खरेदी करण्यासाठी योग्य वेळ मिळेल असे सांगितले जात आहे.

इतर बातम्या :

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, 600 मीटर अंतरावरील कृषी पंपांना जोडणीला प्राधान्य देणार, नितीन राऊत यांची घोषणा

पंतप्रधान कृषी सिंचन योजना : शेतकर्‍यांना कसा मिळतो लाभ व अनुदानबाबत काय आहेत नियम?

चांगल्या कमाईसाठी मशरुमपासून बनवा पापड, चिप्स आणि लोणचे, दीर्घकाळ टिकतील हे पदार्थ

(Maharashtra government decided to provide seed and fertilizer to farmers on 25 may for sowing)

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.