शेतकऱ्यांच्या खिशात पैसे आले आणि चेहऱ्यावर आनंद; वाचा, काय आहे डीबीटी योजना?

या विशेष योजनेचा लाभ शेतकर्‍यांव्यतिरिक्त अनेकांना मिळत आहे. ही योजना काही राज्यांमध्ये लागू आहे, ज्याचा बरेच लोक लाभ घेत आहेत. (Money came into the pockets of the peasants and joy on the face; Read on, what is a DBT plan)

शेतकऱ्यांच्या खिशात पैसे आले आणि चेहऱ्यावर आनंद; वाचा, काय आहे डीबीटी योजना?
या तारखेनंतर येणार किसान सन्मान निधीचा आठवा हप्ता
Follow us
| Updated on: Apr 24, 2021 | 7:06 AM

नवी दिल्ली : शेतकर्‍यांच्या हितासाठी केंद्र सरकारकडे अनेक योजना राबविल्या जात आहेत. तसेच, शेतकऱ्यांसाठी बरीच पावले उचलली गेली आहेत, ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. त्यात डीबीटी योजनेचाही समावेश आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. यामुळे, शेतकऱ्यांना त्यांचे योग्य पैसे थेट त्यांच्या खात्यात येत आहेत आणि त्यांना कोणतीही अडचण न येता पैसे मिळत आहेत. या विशेष योजनेमुळे शेतकरी आनंदीत आहेत. या विशेष योजनेचा लाभ शेतकर्‍यांव्यतिरिक्त अनेकांना मिळत आहे. ही योजना काही राज्यांमध्ये लागू आहे, ज्याचा बरेच लोक लाभ घेत आहेत. (Money came into the pockets of the peasants and joy on the face; Read on, what is a DBT plan)

डीबीटी योजना म्हणजे काय?

डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर(Direct Benefit Transfer) असे या योजनेचे नाव आहे. आपल्याला नावावरुन समजले असेल की, ही योजना कशासाठी आहे. वास्तविक या योजनेच्या माध्यमातून कोणताही सरकारी लाभ थेट त्या व्यक्तीच्या खात्यात दिला जात आहे. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे केंद्र सरकारकडून मिळणारी मदत आता थेट खात्यात जमा केली जाते, यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. तसेच, यासाठी मध्यस्थ आणि दलालांची आवश्यकता नसते आणि आपला संपर्क थेट सरकारकडे होतो.

सरकारकडून अनेक अनुदान दिले जात आहेत. त्याद्वारे ती अनुदान थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात वर्ग केली जाते. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनाही थेट खात्यात पैसे मिळत आहेत, जे डीबीटीमुळे शक्य आहे. या पर्यायामध्ये केंद्र सरकार लाभार्थ्यांच्या हातात पैसे न देता त्यांच्या वतीने या लाभार्थ्यांना कमी किंमतीत उत्पादन किंवा सेवा देणारी एजन्सी किंवा संस्था या पैशाचे हस्तांतरण करते.

शेतकऱ्यांना मिळताहेत एमएसपीचे पैसे

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एमएसपीवर विकल्या जाणाऱ्या उत्पादनांचे पैसे बँक खात्यात दिले जात आहेत. या निर्णयाचा फायदा लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना होईल, विशेषत: जे शेतकरी सावकार आणि आडतांच्या जाळ्यामध्ये अडकले आहेत. उत्पन्नाचे पैसे थेट बँक खात्यात जाण्याचा फायदा जे भाड्याच्या जमिनीवर शेती करतात त्या शेतकऱ्यांनाही मिळेल. या योजनेंतर्गत, यंत्रणेतील पारदर्शकतेमुळे, यापुढे कोणाकडूनही शेतकऱ्यांची दिशाभूल होणार नाही आणि उत्पादनांना योग्य दर मिळू शकेल. थेट लाभ हस्तांतरणाअंतर्गत बर्‍याच प्रकारच्या प्रक्रिया आहेत, ज्या केंद्र सरकार आपल्या पातळीवर सांभाळते.

अलिकडेच पंजाब आणि राजस्थानसारख्या राज्यात, एमएसपीप्रमाणे विकल्या गेलेल्या पिकाचे पैसे थेट खात्यात जमा होत आहेत. डीबीटीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यात कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीची संधी नाही. जेव्हा सरकार थेट लाभार्थ्याच्या खात्यात पैसे हस्तांतरीत करते तेव्हा मध्यस्थांची यात कोणतीही भूमिका नसते.

डीबीटी प्रक्रिया म्हणजे काय?

डीबीटी अंतर्गत योजनेच्या फायद्यापूर्वी सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली(PFMS) नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. यानंतर लाभार्थ्यांचा डेटाबेस तयार केला जातो. यानंतर याची पडताळणी केली जाते आणि नंतर डीबीटी अंतर्गत अनेक मार्गांनी लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे वर्ग केले जातात. (Money came into the pockets of the peasants and joy on the face; Read on, what is a DBT plan)

इतर बातम्या

विरार दुर्घटनेप्रकरणी विजय वल्लभ रुग्णालय व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल

महाराष्ट्रासाठी गुडन्यूज, ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ नागपुरात दाखल, उद्या नाशिकला पोहोचणार

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.