AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gondia : धान खरेदी केंद्रातून सुविधांपेक्षा अडचणी अधिक..! काय आहेत नेमक्या शेतकऱ्यांच्या समस्या ?

यंदा रब्बी हंगामात पोषक वातावरणामुळे धान पिकाचे उत्पन्न वाढले. शेतकऱ्यांनाही अपेक्षित नाही असा उतारा धान पिकाला पडला. वाढत्या उत्पादकतेबरोबर खरेदीची क्षमताही वाढवणे गरजेचे होते पण आदिवासी महामंडळाने केवळ 9 क्विंटल ऐवजी 14 क्विटंल अशी खरेदी केली आहे. मात्र, यापेक्षा वाढ करण्याची शेतकऱ्यांची मागणी होती.

Gondia : धान खरेदी केंद्रातून सुविधांपेक्षा अडचणी अधिक..! काय आहेत नेमक्या शेतकऱ्यांच्या समस्या ?
यंदा धान पिकाची उत्पादकता वाढूनही खरेदी केंद्रावर मर्यादितच खरेदी केली जात आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jun 06, 2022 | 11:23 AM
Share

गोंदिया : राज्यातील 9 जिल्ह्यामध्ये (Rabbi Season) रब्बी हंगामातील धान खरेदीला सुरवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर राज्यात (Paddy Procurement Centre) धान खरेदी केंद्र सुरु झाली असली तरी शेतकऱ्यांच्या मागण्या मात्र पूर्ण झालेल्या नाहीत. खरेदी केंद्रावर एकरी 14 क्विंटल धानाची खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी वाढत्या (Paddy Production) उत्पादकतेमुळे हेक्टरी 43 क्विंटल धानाची खरेदी केंद्रावर करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. एकरी 9 क्विंटलहून आता 14 क्विंटल खरेदी करण्याची मुभा दिली असली तरी संपूर्ण धानाची खरेदी होते की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे राज्यातील 9 जिल्ह्यामध्ये खरेदी केंद्र सुरु होऊन देखील शेतरऱ्यांच्या अडचणी ह्या कायम आहेत.

उत्पादकता वाढल्याने शेतकऱ्यांची अडचण

यंदा रब्बी हंगामात पोषक वातावरणामुळे धान पिकाचे उत्पन्न वाढले. शेतकऱ्यांनाही अपेक्षित नाही असा उतारा धान पिकाला पडला. वाढत्या उत्पादकतेबरोबर खरेदीची क्षमताही वाढवणे गरजेचे होते पण आदिवासी महामंडळाने केवळ 9 क्विंटल ऐवजी 14 क्विटंल अशी खरेदी केली आहे. मात्र, यापेक्षा वाढ करण्याची शेतकऱ्यांची मागणी होती. त्यामुळे खरेदी केंद्र बंद झाली तरी धान खरेदीविना पडून राहाणार असल्यची भिती आहे.वाढत्या उत्पादकतेबरोबर खरेदीची क्षमताही वाढणे गरजेचे होते. पण सरकारने तस निर्णय घेतला नाही.

अन्यथा हमीभावापेक्षा कमी दराने विक्री

केंद्र शासनाने यंदा राज्याला रब्बी हंगामात धान खरेदीसाठी 11 लाख क्विंटलची मर्यादा ठरून दिली होती, पण प्रत्यक्ष उत्पादनात वाढ झाली आणि ही मर्यादा फारच अल्प होती. त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी आणि विरोधकांची भूमिका पाहून केंद्र सरकारने राज्यातील 9 धान उत्पादक जिल्ह्यांसाठी 9 लाख 50 हजार क्विंटलने मर्यादा वाढवून दिली आहे. मात्र, मर्यादेत मोजकीच वाढ केल्याने 20 लाख क्विंटल धान खासगी व्यापाऱ्यांना कमी दराने विकावा लागणार असल्याचे आता स्पष्ट झाला आहे. त्यामुळे पुन्हा केंद्राचे धोरण अन् शेतकऱ्यांचे मरण असेच चित्र आहे.

खासगी व्यापाऱ्यांची चांदी

उत्पादनात झालेली वाढ अन् खरेदी केंद्रावरील परस्थिती यामुळे संपूर्णच शेकामाल विकला जाईल असे नाही. अधिक प्रमाणात धान पीक शिल्लक राहिल्याने ते पुन्हा खुल्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनाच विकले जाणार आहे. खरेदी केंद्र बंद आणि आवक वाढल्यास त्याचा परिणाम थेट दरावर होणार आहे. त्यामुळे खरेदी केंद्रानंतर व्यापारी म्हणतेल तोच दर धान पिकाला मिळण्याचा धोका आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची चांदी होत असली शेतकऱ्यांचे नुकसान अटळ आहे.

Follow Us
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
Sachin Ahir | सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; शिंदे गटात जाताच सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
Eknath Shinde | पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला हशा... सचिन अहिरदेखील... पहा व्हिडीओ