AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gondia : धान खरेदी केंद्रातून सुविधांपेक्षा अडचणी अधिक..! काय आहेत नेमक्या शेतकऱ्यांच्या समस्या ?

यंदा रब्बी हंगामात पोषक वातावरणामुळे धान पिकाचे उत्पन्न वाढले. शेतकऱ्यांनाही अपेक्षित नाही असा उतारा धान पिकाला पडला. वाढत्या उत्पादकतेबरोबर खरेदीची क्षमताही वाढवणे गरजेचे होते पण आदिवासी महामंडळाने केवळ 9 क्विंटल ऐवजी 14 क्विटंल अशी खरेदी केली आहे. मात्र, यापेक्षा वाढ करण्याची शेतकऱ्यांची मागणी होती.

Gondia : धान खरेदी केंद्रातून सुविधांपेक्षा अडचणी अधिक..! काय आहेत नेमक्या शेतकऱ्यांच्या समस्या ?
यंदा धान पिकाची उत्पादकता वाढूनही खरेदी केंद्रावर मर्यादितच खरेदी केली जात आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jun 06, 2022 | 11:23 AM
Share

गोंदिया : राज्यातील 9 जिल्ह्यामध्ये (Rabbi Season) रब्बी हंगामातील धान खरेदीला सुरवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर राज्यात (Paddy Procurement Centre) धान खरेदी केंद्र सुरु झाली असली तरी शेतकऱ्यांच्या मागण्या मात्र पूर्ण झालेल्या नाहीत. खरेदी केंद्रावर एकरी 14 क्विंटल धानाची खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी वाढत्या (Paddy Production) उत्पादकतेमुळे हेक्टरी 43 क्विंटल धानाची खरेदी केंद्रावर करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. एकरी 9 क्विंटलहून आता 14 क्विंटल खरेदी करण्याची मुभा दिली असली तरी संपूर्ण धानाची खरेदी होते की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे राज्यातील 9 जिल्ह्यामध्ये खरेदी केंद्र सुरु होऊन देखील शेतरऱ्यांच्या अडचणी ह्या कायम आहेत.

उत्पादकता वाढल्याने शेतकऱ्यांची अडचण

यंदा रब्बी हंगामात पोषक वातावरणामुळे धान पिकाचे उत्पन्न वाढले. शेतकऱ्यांनाही अपेक्षित नाही असा उतारा धान पिकाला पडला. वाढत्या उत्पादकतेबरोबर खरेदीची क्षमताही वाढवणे गरजेचे होते पण आदिवासी महामंडळाने केवळ 9 क्विंटल ऐवजी 14 क्विटंल अशी खरेदी केली आहे. मात्र, यापेक्षा वाढ करण्याची शेतकऱ्यांची मागणी होती. त्यामुळे खरेदी केंद्र बंद झाली तरी धान खरेदीविना पडून राहाणार असल्यची भिती आहे.वाढत्या उत्पादकतेबरोबर खरेदीची क्षमताही वाढणे गरजेचे होते. पण सरकारने तस निर्णय घेतला नाही.

अन्यथा हमीभावापेक्षा कमी दराने विक्री

केंद्र शासनाने यंदा राज्याला रब्बी हंगामात धान खरेदीसाठी 11 लाख क्विंटलची मर्यादा ठरून दिली होती, पण प्रत्यक्ष उत्पादनात वाढ झाली आणि ही मर्यादा फारच अल्प होती. त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी आणि विरोधकांची भूमिका पाहून केंद्र सरकारने राज्यातील 9 धान उत्पादक जिल्ह्यांसाठी 9 लाख 50 हजार क्विंटलने मर्यादा वाढवून दिली आहे. मात्र, मर्यादेत मोजकीच वाढ केल्याने 20 लाख क्विंटल धान खासगी व्यापाऱ्यांना कमी दराने विकावा लागणार असल्याचे आता स्पष्ट झाला आहे. त्यामुळे पुन्हा केंद्राचे धोरण अन् शेतकऱ्यांचे मरण असेच चित्र आहे.

खासगी व्यापाऱ्यांची चांदी

उत्पादनात झालेली वाढ अन् खरेदी केंद्रावरील परस्थिती यामुळे संपूर्णच शेकामाल विकला जाईल असे नाही. अधिक प्रमाणात धान पीक शिल्लक राहिल्याने ते पुन्हा खुल्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनाच विकले जाणार आहे. खरेदी केंद्र बंद आणि आवक वाढल्यास त्याचा परिणाम थेट दरावर होणार आहे. त्यामुळे खरेदी केंद्रानंतर व्यापारी म्हणतेल तोच दर धान पिकाला मिळण्याचा धोका आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची चांदी होत असली शेतकऱ्यांचे नुकसान अटळ आहे.

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश