AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नाम’चे काम : नांदेडमधील 121 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मदतीचा हात, जिल्हा प्रशासनही राबवणार आत्मसन्मान योजना

'नाम' फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. विशेषत: मराठवाड्यात हे उपक्रम अधिक प्रमाणात आहेत. या भागातील दुष्काळी परस्थिती आणि होत असलेल्या शेतकरी आत्महत्या पाहता जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.तर वर्षभरात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली जात आहे.

'नाम'चे काम : नांदेडमधील 121 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मदतीचा हात, जिल्हा प्रशासनही राबवणार आत्मसन्मान योजना
'नाम' फाउंडेशनच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील 121 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक मदत केली जाणार आहे.
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Mar 09, 2022 | 3:55 PM
Share

नांदेड : (NAM Foundation) ‘नाम’ फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. विशेषत: (Marathwada) मराठवाड्यात हे उपक्रम अधिक प्रमाणात आहेत. या भागातील दुष्काळी परस्थिती आणि होत असलेल्या (Farmer Suicide) शेतकरी आत्महत्या पाहता जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.तर वर्षभरात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली जात आहे. यंदाही नांदेड जिल्ह्यातील तब्बल 121 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना प्रत्येकी 25 हजार याप्रमाणे आर्थिक मदत करण्यात आली आहे. घरचा कर्ता पुरुष गेल्यानंतर किमान लहान-मोठा व्यवसाय किंवा कठीण प्रसंगी त्यांना या रकमेचा उपयोग व्हावा या उद्देशाने हा मदतीचा हात देण्याचा उपक्रम गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. बुधवारी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व नाम फाऊंडेशनचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या रकमेचे चेक देण्यात आले आहे.

मदतीमुळे संसारात हातभार

घरचा कर्ता पुरुष गेल्यावर अनंत संकटाला सामोरे जावे लागते. शिवाय सध्या हाताला काम नाही आणि वाढत्या महागाईमुळे संसाराचा गाडा हाकताना तारेवरची कसरत करावी लागते. मात्र, नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून थेट आर्थिक स्वरुपात मदत मिळत असल्याने एखादा व्यवसाय सुरु करता येणार आहे. गावस्तरावर शिलाई मशीन, पीठाची गिरणी यामाध्यमातून व्यवसाय उभारणीसाठी या रकमेचा उपयोग होईल असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीने सांगितले आहे.

आत्मसन्मानासाठी उपक्रम

नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून होत असलेल्या मदतीचा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना तर लाभ होणारच आहे पण जिल्हा प्रशासनाच्यावतीनेही आता आत्महत्याग्रस्त कुटुंबियांचा आत्मसन्मान करण्यासाठी उपक्रम हाती घेतले जाणार आहे. यामध्ये बचतगटाच्या माध्यमातून शिलाई मशीन, पिठाची गिरणी देण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. मध्यंतरी कोरोनामुळे या उपक्रमाला अडसर निर्माण झाला होता. पण आता पुन्हा उपक्रमाला सुरवात केली जाणार आहे. गेल्या तीन-चार वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचा मानस असल्याचे जिल्हाधिकारी इटनकर यांनी सांगितले आहे.

नांदेडातील 121 आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मदत

गेल्या वर्षभरात जिल्ह्यात तब्बल 121 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नयेत म्हणून नामच्या वतीने जलसंधारणाची कामे केली जात आहेत. असे असूनही जर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तरी त्याच्या कुटुंबियांना सावरण्यासाठी अशाप्रकारे मदतीचा हात पुढे केला जात आहे. यावेळी जिल्ह्यातील 121 शेतकरी कुटुंबियांना मदत केली जाणार असून बुधावारपासून रकमेच्या वाटपाला सुरवातही झाल्याचे नाम फाउंडेशन केशव घोणसे पाटील यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market : शेतीमालाची आवक वाढली, हमीभाव केंद्रापेक्षा खुल्या बाजारातच हरभऱ्याची विक्री

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : योजनेचा लाभ घ्या अन् कृषीपंपाचे वीजबिल कोरे करा, आता उरले 22 दिवस

पुनर्वसनातील राखीव जमिनीचे सोडा हक्काच्या शेतजमिनीवरही पीक घेणे मुश्किल, नांदेडचे शेतकरी रब्बीला मुकले

Follow Us
संध्याकाळी 6 वाजता... पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर..
संध्याकाळी 6 वाजता... पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची पंतप्रधान मोदींना थेट विनंती
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान