AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smart Farmer: नांदेडच्या शेतकऱ्यांना कळाले योजनेचे महत्व, एका महिन्यात कोट्यावधींचा विजबिल भरणा, जाणून घ्या काय आहे योजना?

'ई-पीक पाहणी' मोहिमेत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पहिला क्रमांक पटकाविला होता. शिवाय पिक विमा योजनेतही नांदेड जिल्ह्यातील शेतकरीच आघाडीवर होते आता महावितण कंपनीकडून सुरु असलेल्या महाकृषी ऊर्जा योजनेचे महत्व या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच पटले असून 1 महिन्याच्या कालावधीमध्ये 4 कोटी 50 लाखाचे विजबिल शेतकऱ्यांनी अदा केले आहे. त्यामुळे महावितणचा वसुलीचा उद्देशही साध्य झाला असून शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळाला आहे.

Smart Farmer: नांदेडच्या शेतकऱ्यांना कळाले योजनेचे महत्व, एका महिन्यात कोट्यावधींचा विजबिल भरणा, जाणून घ्या काय आहे योजना?
संग्रहीत छायाचित्र
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Dec 04, 2021 | 9:08 AM
Share

नांदेड : सरकारी योजनेची लाभ घेण्यात मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रात नांदेड जिल्हा हा आघाडीवर राहिलेला आहे. यापूर्वी ‘ई-पीक पाहणी’ मोहिमेत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पहिला क्रमांक पटकाविला होता. शिवाय पिक विमा योजनेतही नांदेड जिल्ह्यातील शेतकरीच आघाडीवर होते आता महावितण कंपनीकडून सुरु असलेल्या महाकृषी ऊर्जा योजनेचे महत्व या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच पटले असून 1 महिन्याच्या कालावधीमध्ये 4 कोटी 50 लाखाचे विजबिल शेतकऱ्यांनी अदा केले आहे. त्यामुळे महावितणचा वसुलीचा उद्देशही साध्य झाला असून शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळाला आहे.

काय आहे महाकृषी ऊर्जा अभियान?

कृषी वीज बिलातून शेतकऱ्यांना थकबाकी मुक्त करण्यासाठी महावितरणकडून राबवण्यात येणाऱ्या महाकृषी ऊर्जा अभियानास संपूर्ण राज्यभरातून चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार थकबाकी मुक्त योजनेत आठ लाख सहा हजार 104 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. शेतकऱ्यांनी मूळ थकबाकी पैकी 50 टक्के रकमेचा भरणा करून शंभर टक्के थकबाकी मुक्ती व्हायचे आहे. एवढेच नाही तर पुन्हा थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना चालू बिलामध्येही सवलत मिळणार आहे.

वसुलीसाठी महावितरण कंपनीचे अभियान

विज ही अत्यावश्यक असली तरी आजही विजबील भरणाबाबत कमालीची उदासिनता आहे. कारण सर्वात जास्त थकबाकी ही कृषीपंप धारकांकडे आहे. त्यामुळे वेगवेगळ्या योजना राबवून ही थकबाकी कमी करण्याचा प्रयत्न हा महावितरण कंपनीकडून केला जातो. ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावरच असे उपक्रम राबविले जातात. कारण रब्बी हंगामातील पिकांच्या भरण्याकरिता शेतकऱ्यांना विजेची आवश्यकता असते. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत होई या धास्तीने विजबील अदा केले जातात.

नांदेड परीमंडळात तीन जिल्ह्यांचा समावेश

नांदेड परीमंडळात लगतच्या हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे. या अभियाना दरम्यान जिल्ह्यात जनजागृती मेळावे घेण्यात आले. त्यात जवळपास 81 हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये 390 कोटी रुपयांची माफी मिळालीय. तर थकबाकी आणि चालू विजबिलापोटी 44 कोटी 72 लाख रुपयांचे विजबिल शेतकऱ्यांनी भरलेत. या योजनेअंतर्गत 3 हजार शेतकरी शंभर टक्के थकबाकी मुक्त झालेत तर एक हजाराहून अधिक शेतकऱ्यांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या :

अवकाळी पावसात 2 हजार जनावरे दगावली, राज्य सरकारकडून पशूपालकांना मिळणार आर्थिक मदत

रोपवाटिका शेतीला पूरक व्यवसाय, अन् उत्पन्न वाढीचा नवा पर्याय

काय सांगता ? मजुरांच्या भूमिकेत अवतरले पोलीस ; 2 एकरातील कापूस वेचणी करुन बळीराजाला मदतीचा हात

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक