Smart Farmer: नांदेडच्या शेतकऱ्यांना कळाले योजनेचे महत्व, एका महिन्यात कोट्यावधींचा विजबिल भरणा, जाणून घ्या काय आहे योजना?

'ई-पीक पाहणी' मोहिमेत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पहिला क्रमांक पटकाविला होता. शिवाय पिक विमा योजनेतही नांदेड जिल्ह्यातील शेतकरीच आघाडीवर होते आता महावितण कंपनीकडून सुरु असलेल्या महाकृषी ऊर्जा योजनेचे महत्व या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच पटले असून 1 महिन्याच्या कालावधीमध्ये 4 कोटी 50 लाखाचे विजबिल शेतकऱ्यांनी अदा केले आहे. त्यामुळे महावितणचा वसुलीचा उद्देशही साध्य झाला असून शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळाला आहे.

Smart Farmer: नांदेडच्या शेतकऱ्यांना कळाले योजनेचे महत्व, एका महिन्यात कोट्यावधींचा विजबिल भरणा, जाणून घ्या काय आहे योजना?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 9:08 AM

नांदेड : सरकारी योजनेची लाभ घेण्यात मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रात नांदेड जिल्हा हा आघाडीवर राहिलेला आहे. यापूर्वी ‘ई-पीक पाहणी’ मोहिमेत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पहिला क्रमांक पटकाविला होता. शिवाय पिक विमा योजनेतही नांदेड जिल्ह्यातील शेतकरीच आघाडीवर होते आता महावितण कंपनीकडून सुरु असलेल्या महाकृषी ऊर्जा योजनेचे महत्व या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच पटले असून 1 महिन्याच्या कालावधीमध्ये 4 कोटी 50 लाखाचे विजबिल शेतकऱ्यांनी अदा केले आहे. त्यामुळे महावितणचा वसुलीचा उद्देशही साध्य झाला असून शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळाला आहे.

काय आहे महाकृषी ऊर्जा अभियान?

कृषी वीज बिलातून शेतकऱ्यांना थकबाकी मुक्त करण्यासाठी महावितरणकडून राबवण्यात येणाऱ्या महाकृषी ऊर्जा अभियानास संपूर्ण राज्यभरातून चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार थकबाकी मुक्त योजनेत आठ लाख सहा हजार 104 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. शेतकऱ्यांनी मूळ थकबाकी पैकी 50 टक्के रकमेचा भरणा करून शंभर टक्के थकबाकी मुक्ती व्हायचे आहे. एवढेच नाही तर पुन्हा थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना चालू बिलामध्येही सवलत मिळणार आहे.

वसुलीसाठी महावितरण कंपनीचे अभियान

विज ही अत्यावश्यक असली तरी आजही विजबील भरणाबाबत कमालीची उदासिनता आहे. कारण सर्वात जास्त थकबाकी ही कृषीपंप धारकांकडे आहे. त्यामुळे वेगवेगळ्या योजना राबवून ही थकबाकी कमी करण्याचा प्रयत्न हा महावितरण कंपनीकडून केला जातो. ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावरच असे उपक्रम राबविले जातात. कारण रब्बी हंगामातील पिकांच्या भरण्याकरिता शेतकऱ्यांना विजेची आवश्यकता असते. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत होई या धास्तीने विजबील अदा केले जातात.

नांदेड परीमंडळात तीन जिल्ह्यांचा समावेश

नांदेड परीमंडळात लगतच्या हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे. या अभियाना दरम्यान जिल्ह्यात जनजागृती मेळावे घेण्यात आले. त्यात जवळपास 81 हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये 390 कोटी रुपयांची माफी मिळालीय. तर थकबाकी आणि चालू विजबिलापोटी 44 कोटी 72 लाख रुपयांचे विजबिल शेतकऱ्यांनी भरलेत. या योजनेअंतर्गत 3 हजार शेतकरी शंभर टक्के थकबाकी मुक्त झालेत तर एक हजाराहून अधिक शेतकऱ्यांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या :

अवकाळी पावसात 2 हजार जनावरे दगावली, राज्य सरकारकडून पशूपालकांना मिळणार आर्थिक मदत

रोपवाटिका शेतीला पूरक व्यवसाय, अन् उत्पन्न वाढीचा नवा पर्याय

काय सांगता ? मजुरांच्या भूमिकेत अवतरले पोलीस ; 2 एकरातील कापूस वेचणी करुन बळीराजाला मदतीचा हात

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.