AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शास्त्रीय नियोजनाला बीज प्रक्रियेची साथ द्या, तज्ज्ञांचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन

राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्रा (एनएचआरडीएफ) च्या वतीने पीकपद्धतीत केलेल्या संशोधनातून खरीप हंगामातील कांदा उत्पादन घेताना रोपवाटिकेचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन करणं महत्वाचं अशल्याचं सांगितलंय. तर, नियोजनाबरोबर बीज प्रक्रिया महत्त्वाची असल्याचं सांगण्यात आलंय.

शास्त्रीय नियोजनाला बीज प्रक्रियेची साथ द्या, तज्ज्ञांचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: Anish Bendre | Updated on: Aug 15, 2021 | 9:08 AM
Share

नाशिक: कांदा म्हटलं की योग्य नियोजन कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी न केल्यास वांदे होण्याची शक्यता अधिक असते. शेतकऱ्यांचं नियोजनाअभावी नुकसान होऊ नये म्हणून महत्वाचा सल्ला देण्यात आलाय. राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्रा (एनएचआरडीएफ) च्या वतीने पीकपद्धतीत केलेल्या संशोधनातून खरीप हंगामातील कांदा उत्पादन घेताना रोपवाटिकेचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन करणं महत्वाचं अशल्याचं सांगितलंय. तर, नियोजनाबरोबर बीज प्रक्रिया महत्त्वाची असून यातून रोगाचा प्रादुर्भाव रोखता येऊन उत्पादन वाढविणे शक्य असल्याने शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करूनच रोपे टाकण्याचे आवाहन करण्यात आलंय.

कांदा हे नगदी पीक

भाजीपाला पिकात कांदा हे पिक शेतकरी दष्ट्या महत्वाचे नगदी व निर्यातयोग्य मसाला पीक आहे. कांदा भारतीय लोकांच्या रोजच्या आहारातील अविभाज्य भाग आहे. जागतिक स्तरावरील भाजीपाला पिकाचा क्षेत्रविस्तार लक्षात घेता कांदा हे दुस-या क्रमांकाचे पीक आहे. कांदा हे मुख्यत थंड (हिवाळी) हंगामातील पिक जरी असले मात्र हे खरीप, रांगडा आणि रब्बी या तीन टप्प्यात कांद्याचे पिक घेतले जाते.

नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावरील निफाड तालुक्यातील चितेगाव फाटा येथील राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्रा (एनएचआरडीएफ) च्या वतीने खरीप हंगामासाठी कांदा पिकाचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन केल्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा होत असल्याचे केलेल्या संशोधन समोर आले आहे

कांदा लागवडीचं नियोजन कसं असावं?

कांदा रोपवाटिकेला जागा निवडताना ती समतोल व पाण्याचा निचरा होणारी असणे गरजेचे आहे. एक हेक्टर कांदा लागवडीसाठी आठ ते दहा किलो बियाणे वापरावे. कांदा लागवडीच्या जागेभोवती मोठे वृक्ष नसले पाहिजे. गादी वाफे तयार करताना ते तीन मीटर लांब एक मीटर रुंद व 15 सेंटिमीटर उंचीचे असावेत. प्रतिवर्ग मीटरमध्ये चार ते पाच ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन मिसळून प्रत्येक गादीवाफ्यात 15 ते 20 किलो ग्रॅम शेणखत किंवा आठ ते दहा किलो ग्रॅम गांडूळखत टाकावे. कांदा वाफ्यात 5 ते 7 सेंटीमीटर अंतरावर एक सेमी खोलीच्या ओळी पाडून त्यात बियाणे टाकावे. बियाण्यास प्रति किलो दोन ग्रॅम कॅप्टन अथवा थायरम चोळल्यास रोपे कोलमडत नाही. रोपे पंधरा दिवसांची झाल्यानंतर मररोग होण्याची अथवा ते कोलमडून जाण्याची शक्यता असल्याने एक लिटर पाण्यात तीन ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईडची फवारणी रोपांच्या मुळाजवळ केल्यास फायदा होतो.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने कांदा लागवडी अगोदर कांदा रोपे तयार करतांना नियोजन केले पाहिजे. यामुळे कांदा रोपांवरील रोगाचा प्रादुर्भाव रोखता येऊन उत्पादन वाढणे शक्य असल्याचे सांगण्यात आले. एकदा तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी चितेगाव फाटा येथील राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्रा (एनएचआरडीएफ) ला भेट देण्याचे आवाहन सहाय्यक संचालक डॉ आर. सी. गुप्ता यांनी केलं आहे.

इतर बातम्या:

वाशिममध्ये ‘या’मुळे सोयाबीनचं 90 टक्के उत्पादन घटणार, तर केंद्राच्या आयातीनं दरातही मोठी घसरण

सोयाबीनवर चक्रीभुंगा, खोडमाशी, उंटअळीच्या प्रादुर्भावाची शक्यता, कृषीतज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना ‘हा’ सल्ला

NHRDF appeal to farmers done onion seed processing before cultivation for better income and crop

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....