AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता पीक नुकसानीपुर्वीच निघणार तोडगा, ‘ड्रोन’ शेतीचा पहिला मान कोकणातील शेतकऱ्यांना

सलग तीन वर्षांपासून कोकणातील शेतकऱ्यांना कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे उत्पादनात घट तर होत आहेच शिवाय फळबागाच्या क्षेत्रावरही याचा परिणाम होत आहे. त्यामुळे आता अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, कीडीचा प्रादुर्भाव यावर त्वरीत तोडगा काढण्यासाठी तसेच शेती पिकाचा आराखडा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आता ड्रोनचा वापर केला जाणार आहे.

आता पीक नुकसानीपुर्वीच निघणार तोडगा, 'ड्रोन' शेतीचा पहिला मान कोकणातील शेतकऱ्यांना
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Dec 30, 2021 | 7:15 AM
Share

रत्नागिरी : सलग तीन वर्षांपासून (Kokan Farmer) कोकणातील शेतकऱ्यांना कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे उत्पादनात घट तर होत आहेच शिवाय फळबागाच्या क्षेत्रावरही याचा परिणाम होत आहे. त्यामुळे आता (Untimely Rain) अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, कीडीचा प्रादुर्भाव यावर त्वरीत तोडगा काढण्यासाठी तसेच शेती पिकाचा आराखडा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आता ड्रोनचा वापर केला जाणार आहे. कोकणातील परस्थिती पाहता या अत्याधुनिक पध्दती वापरण्याचा पहिला मान येथील शेतकऱ्यांना मिळणार आहे. जानेवारी महिन्यापासून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे या अत्याधुनिक प्रणालीचा काय उपयोग होणार आणि वापरताना काय काळजी घ्यावी लागणार याचे धडे प्रशिक्षणात दिले जाणार आहेत.

वेळेत होणार कीडीचे व्यवस्थापन

ड्रोनच्या माध्यमातून कमी खर्चात आणि कमी वेळेत कीडीवर नियंत्रण मिळवता येणार आहे. खरिपातील पीक पाहणी, कीड-रोगाचा बंदोबस्त तसेच किडीचे व्यवस्थापन सहज होणार आहे. कोकणात फळबागाचे क्षेत्र अधिक आहे. पावसानंतर कोणत्या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे व त्याचे नियंत्रण करायचे कसे हे लागलीच निदर्शनास येणार आहे. त्यामुळे ही अत्याधुनिक प्रणाली हंगामातील पिकांबरोबर फळबागांच्या संरक्षणासाठी महत्वाची ठरणार आहे. यातील सुविधांमुळे कोणत्या पिकावर कोणच्या कीडीचा प्रादुर्भाव झाला आहे हे देखील लक्षात येणार आहे. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना ही प्रणाली उपयोगाची ठरणार आहे.

या दोन ठिकाणी होणार प्रशिक्षण

ड्रोनच्या माध्यमातून फवारणी किंवा अन्य काही बाबी करायच्या म्हटल्यावर शेतकऱ्यांना आवश्यकता आहे ती योग्य प्रशिक्षणाची. त्यामुळेच जानेवारी महिन्यात रत्नागिरी तालुक्यातील भाट्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील कृषी केंद्रामध्ये शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण कसे द्यायचे यासाठी शिवाय तंत्राची माहिती देण्यासाठी केंद्राची उपलब्धता असणार आहे. आता शेतीसाठी ड्रोन किती महत्वाचे आहे याची देखील माहिती प्रशिक्षणा दरम्यान देण्यात येणार आहे.

काय आहेत कृषी मंत्रालयाचे निर्देश?

ड्रोनच्या माध्यमातून किटनाशकांवर औषध फवारणी करण्याची मोठी क्षमता आहे. असे असले तरी यामध्ये पिकांचे संगोपन आणि काही दुष्परिणाम होणार नाहीत त्याअनुशंगाने कृषी मंत्रालय हे काळजी घेत आहे. यामध्ये पिक फवारणी क्षेत्र, फ्लाय क्लिअरन्स, वजनाची मर्यादा, नोंदणी, सुरक्षा विमा तसेच हंगामी परस्थितीचा उल्लेख याचा समावेश नियमावली तयार करताना करण्यात आला आहे. एवढेच नाही तर ड्रोन उडवण्यापूर्वी आणि खाली उतरवतानाही काय काळजी घ्यावयची याची नियमावली ठरवून देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

दुष्काळात तेरावा : डाळिंबाचे उत्पादन निम्म्याने घटले तरीही दर गडगडले, काय आहेत नेमकी कारणं?

आता खासगी बाजार समित्यांच्या उभारणीवरुन शेतकरी संघटना आक्रमक, काय आहे केंद्र सरकारला लिहलेल्या पत्रात?

Positive News | आवक वाढूनही सोयाबीनचे दर स्थिरावले, तरीही शेतकऱ्यांनी…

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?