AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळीच्या नुकसान खुणा, 1 एकरावरील कांद्याचाही प्रयोग फसला, शेतकऱ्याने थेट रोटावेटरच फिरवला

अवकाळी पावसाने उघडीप देऊन 15 दिवसांचा कालावधी लोटला असला तरी यामुळे निर्माण झालेली संकटे शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाहीत. नाशिक जिल्ह्यात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. शिवाय बाजारपेठही जवळच असल्याने शेतकरी हे नगदी पिक म्हणून कांद्यावर भर देतात. असाच प्रयोग येवला तालुक्यातील बल्हेगावच्या भाऊसाहेब सोमासे यांनी केला मात्र, अवकाळीनंतर बदललेल्या वातावरणामुळे कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता.

अवकाळीच्या नुकसान खुणा, 1 एकरावरील कांद्याचाही प्रयोग फसला, शेतकऱ्याने थेट रोटावेटरच फिरवला
करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने येवला तालुक्यातील शेतकऱ्याने रोटावेटरच्या सहायाने कांदा पिक काढून बांधावर फेकले आहे.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Dec 15, 2021 | 12:38 PM
Share

लासलगाव : (untimely rains) अवकाळी पावसाने उघडीप देऊन 15 दिवसांचा कालावधी लोटला असला तरी यामुळे निर्माण झालेली संकटे शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाहीत. (Nashik) नाशिक जिल्ह्यात (Onion crop) कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. शिवाय बाजारपेठही जवळच असल्याने शेतकरी हे नगदी पिक म्हणून कांद्यावर भर देतात. असाच प्रयोग येवला तालुक्यातील बल्हेगावच्या भाऊसाहेब सोमासे यांनी केला मात्र, अवकाळीनंतर (change in environment) बदललेल्या वातावरणामुळे कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होऊ लागल्याने सोमासे यांनी थेट कांदा पिकावर रोटरच फिरवला. त्यामुळे भविष्यातील नुकसान तरी टळेल आणि रब्बी हंगामातील इतर पिक घेता येईल म्हणून हा टोकाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे.

कांदा पिकावर करपा अन् मावा रोगाचा प्रादुर्भाव

अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागायत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता पावसाने उघडीप दिली असली तरी वातावरणातील बदलामुळे कांदा पिकावर करपा आणि मावा रोग वाढलेला आहे. याच्यावर नियंत्रण केले जात आहे. पण लागवडीपासून 60 हजाराचा खर्च आणि भविष्यातही औषध फवारणी, देखरेख यावर खर्च होणारच त्यामुळे अधिकचा खर्च न करता थेट कांदा पिकच वावरातून बाहेर काढण्याचा निर्णय सोमासे यांनी घेतला. सध्या रब्बी हंगामातील कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. पण बदलत्या वातावरणामुळे रोगराईचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यामुळे कांदा जोपासायचे मोठे अवाहन शेतकऱ्यांसमोर आहे.

एकरी 60 हजाराचा खर्च पुन्हा काढणीची भर…

शेती मशागतीपासून ते रोपांची खरेदी आणि लागण या दरम्यान, भाऊसाहेब सोमासे यांना 60 हजार रुपये मोजावे लागले होते. मात्र, कांदा हे नगदी पिक असून त्याची जोपासना योग्य केली तर त्यापासून चार पैसे मिळतील ही अपेक्षा सोमासे यांना होती. मात्र, निसर्गाचा लहरीपणा यंदा सर्वच पिकांवर बेतत आहे. त्यामधून कांद्याची तरी कशी सुटका होईल. त्यामुळेच त्यांनी उभ्या पिकात थेट रोटर फिरवून हे क्षेत्र रब्बी हंगामातील पिकासाठी रिकामे केले आहे. येवला तालुक्यातील कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

कांद्यावर फवारणी गरजेची

ढगाळ वातावरणाचा सर्वाधिक परिणाम हा कांदा पीकावर होत आहे. रब्बी हंगामातील कांदा लागवड करुन काही दिवसाचाच कालावधी लोटलेला आहे. मात्र, वातावरणातील बदलामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव होताच मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल 10 मिली या बुरशीनाशकांची फवारणी जांभळा, तपकिरी आणि काळा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे आवश्यक आहे. शिवाय धुईचे प्रमाणही वाढत असल्याने कांद्याचे दुहेरी नुकसान होत आहे. त्यामुळे ही फवारणी त्वरीत करण्याचा सल्ला कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे.

संबंधित बातम्या :

Sugar Factory : ऊसगाळप वेगाने, ‘एफआरपी’ चे वाटप मात्र, धिम्या गतीने, कारखान्यांचा मधला मार्ग आला ‘कामी’

जिनिंग उद्योगावरही ओमिक्रॅानचा परिणाम, राज्यात निम्म्याच क्षमतेने कापूस गाठींचे उत्पादन

जातीवंत देशी गोवंशसाठी कृषी विद्यापीठाचा अनोखा प्रयोग ? कशी होते भ्रुण प्रात्यारोपण प्रक्रिया

Follow Us
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...