AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थंडीच्या दिवसांमध्ये ‘अशी’ घ्या फळपिकांची काळजी, शेतकऱ्यांना सल्ला

सध्या पहाटे गारवा आणि दिवसा चटके असेच काहीसे वातावरण झाले आहे. शिवाय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पाच दिवस हे कमी तापमान राहणार असल्याचा अंदाज वर्तवला असून त्यानंतर थंडीचा जोर वाढणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे भाजीपाल्यासह फळपिकांची काळजी घेणे महत्वाचे आहे. या पाच दिवसांमध्ये 17 ते 19 अंश सेल्सिअस तापमान राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

थंडीच्या दिवसांमध्ये 'अशी' घ्या फळपिकांची काळजी, शेतकऱ्यांना सल्ला
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Oct 27, 2021 | 1:49 PM
Share

लातूर : सध्या पहाटे गारवा आणि दिवसा चटके असेच काहीसे वातावरण झाले आहे. शिवाय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पाच दिवस हे कमी तापमान राहणार असल्याचा अंदाज वर्तवला असून त्यानंतर थंडीचा जोर वाढणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे भाजीपाल्यासह फळपिकांची काळजी घेणे महत्वाचे आहे. या पाच दिवसांमध्ये 17 ते 19 अंश सेल्सिअस तापमान राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

त्यामुळे उत्पादन वाढीसाठी या हंगामात शेतकऱ्यांनी पिकांची आणि फळबागांची कशी काळजी घ्यावयाची याची आपण माहीती घेऊ.. प्रत्येक वेगळ्या हंगमातील वातावरणाचा परिणाम हा पिकांवर पडत असतो. मात्र, या गोष्टींकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत असते. याचा परिणाम भविष्यात उत्पादनावर होतो. त्यामुळे योग्य काळजी घेतली तर उत्पादनातही वाढ होणार आहे आणि जमिननीचे आरोग्यही सुधारणार आहे.

* फळबागेचे रक्षण होईल या दृष्टीकोनातून बागेच्या पश्चिम व दक्षिण दिशेला शेवरी, हादगा, पांगरा, मलबेरी, व बांबू या सारख्या प्रतिबंधक वृक्षांची लागवड करावी.

*बागेभोवती चारी बाजूने दोन ओळीत शेवरी, गजराज गवत, एरंड, गिरिपुष्प अथवा सुरुची दाट लागवड करावी. ह्या बागेत झाडांची सतत निगा राखावी व छाटणी करावी.

*मुख्य फळझाडे जर लहान असतील तर रबी हंगामात मोकळ्या व रांगेतील उघड्या जमिनीच्या पट्ट्यावर दाट पसरणारी पोट पिके घ्यावीत.

*केळी, पपई व पानवेलीच्या बागेभोवती दाट शेवरी लावून सजीव कुंपण तयार करावे.

हे आहेत नियंत्रणाचे उपाय

* थंढीच्या दिवसांमध्ये विहिरीच्या पाण्याचे तापमान हे थोडे जास्त असते. त्यामुले थंडीची पूर्वसूचना मिळताच फळबागेमध्ये शक्यतो रात्री अथवा पहाटेच्या वेळेस ठिबक सिंचनाने पाणीपुरवठा करावा त्यामुळे बागेमधील तापमान वाढण्यास मदत होते.

*झाडाच्या खोडापाशी व आळ्यात तण, वाळलेले गवत, पालापाचोळा, उसाचे पाचट, गव्हाचा भुसा अशा सेंद्रिय पदार्थांचे खोडालगत आच्छादन करावे, जेणेकरून कमी तापमानाचा झाडांच्या मुळ्यांवर व वाढीवर परिणाम होणार नाही.

*केळी बागांमध्ये प्रत्येक झाडास खोडालगत एक किलो निंबोळी पेंड द्यावी. यामुळे अन्नद्रव्ये तर मिळतातच परंतु, पेंड कुजतांना त्यापासून उष्णता निर्माण होते आणि बागेतील तापमान सुधारते, याशिवाय सुत्रकृमींचाही बंदोबस्त होतो.

*थंडीचे प्रमाण कमी होईल तोवर फळबागांमध्ये फक्त रोगग्रस्त फांद्याच कापाव्यात. फळबागांची अतिरिक्त छाटणी करू नये. यामुळे फळबागेची थंडीपासून हानी होणार नाही.

*रोपवाटीकेतील रोप, कलमे, बियाण्याचे वाफे यावर तण, वाळलेले गवत, तुराट्याचे खोपट किंवा तट्टे याचे छप्पर उभारावे. असे छप्पर सायंकाळी 6 वाजता घालावे व सकाळी सूर्यप्रकाश पडल्यावर काढून घ्यावे. छप्पर करण्यासाठी शक्यतो काळ्या पॉलिथीनचा वापर करावा.

*नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा, तसेच पालाशयुक्त खते किंवा कोळशाची राख खात म्हणून दिल्यास झाडाची पाणी व अन्नद्रव्ये शोषणाची व वहनाची क्षमता वाढते.

*नवीन लागवडीसाठी फळझाडांच्या थंडीस प्रतिकारक अशा जाती वापराव्यात. वरील नमूद केलेल्या कमी खर्चिक बाबींचा जर आपण आपल्या फळ बागेमध्ये तापमान नियोजानाकरिता वापर केल्यास आपणास दर्जेदार उत्पादनासह फळबागेचे आयुष्य वाढविण्यास नक्कीच मदत होईल. (Production to increase only if orchards are taken care of during winters, farmer advice)

संबंधित बातम्या :

…म्हणून सोयाबीनची आवक कमी, शेतकऱ्यांचा साठवणूकीवर भर

कांदा दराचा लहरीपणा, दर 3 हजारच्या खाली, आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

राज्यातील 150 साखर कारखान्यांना दिलासा, दिल्लीच्या बैठकीत प्राप्तिकरावर तोडगा

Follow Us
आंदोलनाने सरकार बदलत नाही! ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे प्रत्युत्तर
Gulabrao Patil on Uddhav Thackeray | आंदोलनाने सरकार बदलत नाही! उद्धव ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे थेट प्रत्युत्तर
डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास
Dahanu | डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास, घटना CCTV मध्ये कैद
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3...
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3 तास बैठक
फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; आंदोलनावर अंधारेंची प्रतिक्रिया
Sushma Andhare | फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; दिल्ली आंदोलनावर सुषमा अंधारेंची सडेतोड प्रतिक्रिया
सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
CJP Protest | सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह...
Kalyan Dombivali | कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत लपवला, प्रेयसी फरार
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट...
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट घेणार
आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने...हेमा मालिनी
Hema Malini | आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने... CJP आंदोलनावर हेमा मालिनी यांचं मोठं विधान
मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय;
Big Breaking | मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय; सोनम वांगचुक...
दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
मोठी बातमी! CJP आंदोलनावर दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
CJP Protest Delhi : जंतर-मंतरवरुन अभिजीत दीपके यांची मोठी घोषणा, ‘आता तुम्ही इथे या’.

CJP Protest Delhi : जंतर-मंतरवरुन अभिजीत दीपके यांची मोठी घोषणा, ‘आता तुम्ही इथे या’

जंतर मंतर वर ते बोलू शकत नव्हते, तरी त्यांचा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला.

जंतर मंतर वर ते बोलू शकत नव्हते, तरी त्यांचा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला

आम्ही डायर नाही, पण ‘कायर’ बघितला, दिल्लीतील CJP आंदोलनावर मनसेचे संदीप देशपांडे यांची खरमरीत टीका.

आम्ही डायर नाही, पण ‘कायर’ बघितला, दिल्लीतील CJP आंदोलनावर मनसेचे संदीप देशपांडे यांची खरमरीत टीका

CJP Protest : रात्रभर पाऊस, तरीही सीजेपीचं आंदोलन रात्री पासून पुन्हा सुरू, VIDEO.

CJP Protest : रात्रभर पाऊस, तरीही सीजेपीचं आंदोलन रात्री पासून पुन्हा सुरू, VIDEO

विद्यार्थी रस्त्यावर असताना आता शेतकरीही दिल्लीकडे निघाले, सरकारसमोर दुहेरी संकट, रस्त्यांवर बॅरिगेट्स, पोलिस पुन्हा अलर्ट.

विद्यार्थी रस्त्यावर असताना आता शेतकरीही दिल्लीकडे निघाले, सरकारसमोर दुहेरी संकट, रस्त्यांवर बॅरिगेट्स, पोलिस पुन्हा अलर्ट

बीसीसीआयने तडकाफडकी घेतला मोठा निर्णय, अचानक बदलले एक नाही तर तब्बल आठ नियम बदलले.

बीसीसीआयने तडकाफडकी घेतला मोठा निर्णय, अचानक बदलले एक नाही तर तब्बल आठ नियम बदलले