AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थंडीच्या दिवसांमध्ये ‘अशी’ घ्या फळपिकांची काळजी, शेतकऱ्यांना सल्ला

सध्या पहाटे गारवा आणि दिवसा चटके असेच काहीसे वातावरण झाले आहे. शिवाय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पाच दिवस हे कमी तापमान राहणार असल्याचा अंदाज वर्तवला असून त्यानंतर थंडीचा जोर वाढणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे भाजीपाल्यासह फळपिकांची काळजी घेणे महत्वाचे आहे. या पाच दिवसांमध्ये 17 ते 19 अंश सेल्सिअस तापमान राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

थंडीच्या दिवसांमध्ये 'अशी' घ्या फळपिकांची काळजी, शेतकऱ्यांना सल्ला
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 27, 2021 | 1:49 PM
Share

लातूर : सध्या पहाटे गारवा आणि दिवसा चटके असेच काहीसे वातावरण झाले आहे. शिवाय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पाच दिवस हे कमी तापमान राहणार असल्याचा अंदाज वर्तवला असून त्यानंतर थंडीचा जोर वाढणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे भाजीपाल्यासह फळपिकांची काळजी घेणे महत्वाचे आहे. या पाच दिवसांमध्ये 17 ते 19 अंश सेल्सिअस तापमान राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

त्यामुळे उत्पादन वाढीसाठी या हंगामात शेतकऱ्यांनी पिकांची आणि फळबागांची कशी काळजी घ्यावयाची याची आपण माहीती घेऊ.. प्रत्येक वेगळ्या हंगमातील वातावरणाचा परिणाम हा पिकांवर पडत असतो. मात्र, या गोष्टींकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत असते. याचा परिणाम भविष्यात उत्पादनावर होतो. त्यामुळे योग्य काळजी घेतली तर उत्पादनातही वाढ होणार आहे आणि जमिननीचे आरोग्यही सुधारणार आहे.

* फळबागेचे रक्षण होईल या दृष्टीकोनातून बागेच्या पश्चिम व दक्षिण दिशेला शेवरी, हादगा, पांगरा, मलबेरी, व बांबू या सारख्या प्रतिबंधक वृक्षांची लागवड करावी.

*बागेभोवती चारी बाजूने दोन ओळीत शेवरी, गजराज गवत, एरंड, गिरिपुष्प अथवा सुरुची दाट लागवड करावी. ह्या बागेत झाडांची सतत निगा राखावी व छाटणी करावी.

*मुख्य फळझाडे जर लहान असतील तर रबी हंगामात मोकळ्या व रांगेतील उघड्या जमिनीच्या पट्ट्यावर दाट पसरणारी पोट पिके घ्यावीत.

*केळी, पपई व पानवेलीच्या बागेभोवती दाट शेवरी लावून सजीव कुंपण तयार करावे.

हे आहेत नियंत्रणाचे उपाय

* थंढीच्या दिवसांमध्ये विहिरीच्या पाण्याचे तापमान हे थोडे जास्त असते. त्यामुले थंडीची पूर्वसूचना मिळताच फळबागेमध्ये शक्यतो रात्री अथवा पहाटेच्या वेळेस ठिबक सिंचनाने पाणीपुरवठा करावा त्यामुळे बागेमधील तापमान वाढण्यास मदत होते.

*झाडाच्या खोडापाशी व आळ्यात तण, वाळलेले गवत, पालापाचोळा, उसाचे पाचट, गव्हाचा भुसा अशा सेंद्रिय पदार्थांचे खोडालगत आच्छादन करावे, जेणेकरून कमी तापमानाचा झाडांच्या मुळ्यांवर व वाढीवर परिणाम होणार नाही.

*केळी बागांमध्ये प्रत्येक झाडास खोडालगत एक किलो निंबोळी पेंड द्यावी. यामुळे अन्नद्रव्ये तर मिळतातच परंतु, पेंड कुजतांना त्यापासून उष्णता निर्माण होते आणि बागेतील तापमान सुधारते, याशिवाय सुत्रकृमींचाही बंदोबस्त होतो.

*थंडीचे प्रमाण कमी होईल तोवर फळबागांमध्ये फक्त रोगग्रस्त फांद्याच कापाव्यात. फळबागांची अतिरिक्त छाटणी करू नये. यामुळे फळबागेची थंडीपासून हानी होणार नाही.

*रोपवाटीकेतील रोप, कलमे, बियाण्याचे वाफे यावर तण, वाळलेले गवत, तुराट्याचे खोपट किंवा तट्टे याचे छप्पर उभारावे. असे छप्पर सायंकाळी 6 वाजता घालावे व सकाळी सूर्यप्रकाश पडल्यावर काढून घ्यावे. छप्पर करण्यासाठी शक्यतो काळ्या पॉलिथीनचा वापर करावा.

*नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा, तसेच पालाशयुक्त खते किंवा कोळशाची राख खात म्हणून दिल्यास झाडाची पाणी व अन्नद्रव्ये शोषणाची व वहनाची क्षमता वाढते.

*नवीन लागवडीसाठी फळझाडांच्या थंडीस प्रतिकारक अशा जाती वापराव्यात. वरील नमूद केलेल्या कमी खर्चिक बाबींचा जर आपण आपल्या फळ बागेमध्ये तापमान नियोजानाकरिता वापर केल्यास आपणास दर्जेदार उत्पादनासह फळबागेचे आयुष्य वाढविण्यास नक्कीच मदत होईल. (Production to increase only if orchards are taken care of during winters, farmer advice)

संबंधित बातम्या :

…म्हणून सोयाबीनची आवक कमी, शेतकऱ्यांचा साठवणूकीवर भर

कांदा दराचा लहरीपणा, दर 3 हजारच्या खाली, आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

राज्यातील 150 साखर कारखान्यांना दिलासा, दिल्लीच्या बैठकीत प्राप्तिकरावर तोडगा

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.