AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Summer Crop : उन्हाळी सोयाबीनचा शेवटचा महिना, योग्य व्यवस्थापनामुळे उत्पादनात होईल वाढ

कृषी विभागाच्या आवाहनानंतर पीक पध्दतीमध्ये झाला पण शेतकऱ्यांनी तो यशस्वीही करुन दाखविला आहे. कधी नव्हे ते उन्हाळी हंगामात शेतशिवार हा हिरवागार दिसत आहे. आतापर्यंत तर सर्वकाही सुरळीत असून शेतकऱ्यांना उत्पादनवाढीची अपेक्षा आहे. सोयाबीनला शेंगा लगडल्या असून शेंगाचे वजन पेलत नाहीय त्यामुळे त्यांनी आपले वजन धरणी मातेवर टाकले आहे.

Summer Crop : उन्हाळी सोयाबीनचा शेवटचा महिना, योग्य व्यवस्थापनामुळे उत्पादनात होईल वाढ
पाणी पातळी घटल्याने उन्हाळी हंगमातील पीके धोक्यात आहेतImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 13, 2022 | 5:15 AM
Share

लातूर : (Agricultural Department) कृषी विभागाच्या आवाहनानंतर पीक पध्दतीमध्ये झाला पण शेतकऱ्यांनी तो यशस्वीही करुन दाखविला आहे. कधी नव्हे ते (Summer Season) उन्हाळी हंगामात शेतशिवार सोयाबीनमुळे हा हिरवागार दिसत आहे. आतापर्यंत तर सर्वकाही सुरळीत असून शेतकऱ्यांना उत्पादनवाढीची अपेक्षा आहे. (Soybean Crop) सोयाबीनला शेंगा लगडल्या असून शेंगाचे वजन पेलत नाहीय त्यामुळे त्यांनी आपले वजन धरणी मातेवर टाकले आहे. काही भागात तर शेवटचं पाणी देण्याची तयारी सुरु आहे. असे असतानाच पाट पाण्यातून एकरी 10 किलो म्युरेट ऑफ पोटॅश(पांढरे पोटॅश)चा वापर करावा. म्युरेट ऑफ पोटॅशचा वापरामुळे दाणे चांगले भरतात. पोटॅश ह्या अन्नद्रव्यांवर आपल्या नियोजनात महत्त्व गरजेचे आहे.

दाणे भरण्याच्या अवस्थेत सोयाबीन

अजूनही झाडांची मुळी चालू असल्यामुळे पालाशचे शोषण होऊन उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. सुष्मअन्नद्रव्याची फवारणी घेत असतो त्यामुळे आपणास ह्या फवारणीचा फायदा हा दाणे भरण्याची अवस्थेत होणार आहे. काही क्षेत्रावर सोयाबीनची पाने झाडं वाळू लागतात. आशा वेळी झाडांची मुळी बंद झाली आहे. त्यामुळे अशा वेळी म्युरेट ऑफ पोटॅश(पालाश) एक किलो प्रति एकर ह्या प्रमाणात फवारणी केल्यास जमिनीतून पालाश ह्या अन्नद्रव्यांची अपव्यय होत नाही. शिवाय वरून फवारणी केल्यास त्याचा चांगला परिणाम आपणास मिळतो.

मळणी करताना घ्यावयाची काळजी

सोयाबीनच्या झाडाची पाने वाळू लागताच सोयाबीन मळणीचे नियोजन करणे गरजेचे आहे. शिवाय मळणी सुरु करण्यापूर्वी आपल्या भागात हवामान कसे राहिल याचा अंदाजही घेणे महत्वाचे ठरणार आहे. त्या अनुशंगानेच सोयाबीन काढणीचा कार्यक्रम करावा लागणार आहे. शिवाय आता मजुरांची टंचाई लक्षात घेता योग्यवेळी काढणी आणि मळणी याचे नियोजन करावे लागणार आहे. वातावरणात सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे मळणीपूर्वीच ताडपत्री, बारदान आणि इतर सर्व सामग्री तयार ठेवावी लागणार आहे.

वातावरणातील बदलामुळे वाढला खर्च

एकीकडे उत्पादनात वाढ होत आहे तर दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे फवारणीचा आणि निगराणीचा खर्च देखील वाढला आहे.सोयाबीन हे पावसाळी पीक आहे पण यंदा उन्हाळी हंगामात त्याचा प्रयोग करण्यात आला आहे. मुबलक पाण्यामुळे हे शक्य झाले असले तरी आता उर्वरीत महिन्याभराचे नियोजन महत्वाचे ठरणार आहे. चार वेळच्या फवारण्या यंदाच्या हंगामात 10 वर गेल्या आहेत. असे असाताना मराठवाडा आणि विदर्भात सोयाबीन हे कापले जाते. शिवाय सर्व कापणी होईपर्यंत त्याचा एकाच ठिकाणी ढिगारा घातला जातो. पण सध्या वातावरणात बदल सुरु झाला आहे. त्यामुळे काढलेले सोयाबीन हे पावसाने भिजणार नाही याची काळजी शेतऱ्यांना घ्यावी लागणार आहे. अशा प्रकारे काळजी घेतल्यावर शेतकऱ्यांचे नुकसान तर टळणार आहेच पण उत्पादनात देखील वाढ होणार आहे.

संबंधित बातम्या :

Sindhudurg : वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर नव्या प्रजातीचे कासव, नावावरुन एकवटले कासवप्रेमी!

Onion Rate : कांदा दराचा वांदा मिटणार! कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची काय आहे रणनिती?

Prices of Pulses : डाळींचे दर शंभरीपार, उत्पादनात घट त्यात महागाईचा तडका

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.