भात पीक जोमात, दीड महिन्यात खिशात पैसा खुळखुळणार; बळीराजाचा चेहरा खुलला

पुण्यातलं भाताचं आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोर तालुक्यात भातं पीक जोमात आलंय. मधला काही काळ पावसाने उघडीप घेतल्यान भात उत्पादक शेतकरी चिंतेत होता. मात्र आता हा पाऊस भात पिकाला फायदेशीर ठरतोय.

भात पीक जोमात, दीड महिन्यात खिशात पैसा खुळखुळणार; बळीराजाचा चेहरा खुलला
rice crop Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 04, 2023 | 11:37 AM

विनय जगताप, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 4 ऑक्टोबर 2023 : मध्यंतरी पावसाने ओढ दिल्यामुळे बळीराजा प्रचंड तणावाखाली होता. पिकं वाया जातील की काय अशी भीती त्यांना सतावत होती. तर दुसरीकडे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचं कसं होईल? असा प्रश्नही सतावत होता. मात्र, वरुणराजाने कृपादृष्टी दाखवली. गणपतीच्या आगमनासह वरुणराजाचंही दमदार आगमन झालं. त्यामुळे शेतातील पिके तरारली. अन् बळीराजाचा चेहराही आनंदाने खुलून गेला. भात पिकाला पोषक वातवारण निर्माण झाल्याने भात पीकही मोठ्या जोमात आलं आहे. त्यामुळे बळीराजा सुखावून गेला आहे.

मावळात भात पिकासाठी पोषक वातावरण असल्याने भात पीक जोमात आलं आहे. पावसाच्या पुनरागमनानंतर गेल्या 5-6 दिवसांपासून पडणारा पाऊस भात पिकाला पोषक ठरत आहे. त्यामुळे भाताची हिरवीगार रोपं तरारून आली आहेत. ही रोपं वाऱ्यावर डोलू लागली आहेत. पवनमावळ हे मावळमधील भाताचे आगार आहे. मावळमध्ये इंद्रायणी तांदूळाची 95% लागवड केली जाते. इंद्रायणी भाताची चव, चिकटपणा, उत्त्पन्न यामुळे शेतकरी या वाणाला पसंती देतात. हेच इंद्रायणी वाण आता काही ठिकाणी निसवले आहे. त्यामुळे शेतकरी सुखवला आहे.

दीड महिन्यात पैसाच पैसा

आता पुढील दीड महिन्यात भात तयार होणार असून बळीराजाच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे अवघ्या दीड महिन्यातच बळीराजाच्या खिशात पैसा खुळखुळणार आहे. ह्यावर्षी भात ही जोमदार आले असल्याने भाताच्या उत्पादनात वाढ होईल, असे कृषी विभागाने सांगितले आहे.

सांगलीत भात पिकांचं नुकसान

सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात ढगफुटीसदृश्य पावसाने धरणातून इतिहासातील सर्वाधिक विसर्ग करण्याची वेळ रविवारी संध्याकाळी आली. धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्याने वारणा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

शिराळा तालुक्यातील पश्चिम भागात चांदोली धरण परिसरात मुसळधार पावसाने सुरुवात केल्यानंतर मणदूर, सोनवडे, आरळा तसेच परिसरातील वाड्यांना अक्षरशः पावसाने झोडपून काढले. मुसळधार पावसाने नाल्यांमध्ये पाणीच पाणी झाले. शेती शिवारे तुडुंब झाली आहेत. या पावसाने भात पिकाचे शेकडो एकरातील नुकसान केलं आहे. मणदूरमधील येथील ओढ्याचे पाणी भात शेतीत शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.