AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भात पीक जोमात, दीड महिन्यात खिशात पैसा खुळखुळणार; बळीराजाचा चेहरा खुलला

पुण्यातलं भाताचं आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोर तालुक्यात भातं पीक जोमात आलंय. मधला काही काळ पावसाने उघडीप घेतल्यान भात उत्पादक शेतकरी चिंतेत होता. मात्र आता हा पाऊस भात पिकाला फायदेशीर ठरतोय.

भात पीक जोमात, दीड महिन्यात खिशात पैसा खुळखुळणार; बळीराजाचा चेहरा खुलला
rice crop Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 04, 2023 | 11:37 AM
Share

विनय जगताप, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 4 ऑक्टोबर 2023 : मध्यंतरी पावसाने ओढ दिल्यामुळे बळीराजा प्रचंड तणावाखाली होता. पिकं वाया जातील की काय अशी भीती त्यांना सतावत होती. तर दुसरीकडे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचं कसं होईल? असा प्रश्नही सतावत होता. मात्र, वरुणराजाने कृपादृष्टी दाखवली. गणपतीच्या आगमनासह वरुणराजाचंही दमदार आगमन झालं. त्यामुळे शेतातील पिके तरारली. अन् बळीराजाचा चेहराही आनंदाने खुलून गेला. भात पिकाला पोषक वातवारण निर्माण झाल्याने भात पीकही मोठ्या जोमात आलं आहे. त्यामुळे बळीराजा सुखावून गेला आहे.

मावळात भात पिकासाठी पोषक वातावरण असल्याने भात पीक जोमात आलं आहे. पावसाच्या पुनरागमनानंतर गेल्या 5-6 दिवसांपासून पडणारा पाऊस भात पिकाला पोषक ठरत आहे. त्यामुळे भाताची हिरवीगार रोपं तरारून आली आहेत. ही रोपं वाऱ्यावर डोलू लागली आहेत. पवनमावळ हे मावळमधील भाताचे आगार आहे. मावळमध्ये इंद्रायणी तांदूळाची 95% लागवड केली जाते. इंद्रायणी भाताची चव, चिकटपणा, उत्त्पन्न यामुळे शेतकरी या वाणाला पसंती देतात. हेच इंद्रायणी वाण आता काही ठिकाणी निसवले आहे. त्यामुळे शेतकरी सुखवला आहे.

दीड महिन्यात पैसाच पैसा

आता पुढील दीड महिन्यात भात तयार होणार असून बळीराजाच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे अवघ्या दीड महिन्यातच बळीराजाच्या खिशात पैसा खुळखुळणार आहे. ह्यावर्षी भात ही जोमदार आले असल्याने भाताच्या उत्पादनात वाढ होईल, असे कृषी विभागाने सांगितले आहे.

सांगलीत भात पिकांचं नुकसान

सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात ढगफुटीसदृश्य पावसाने धरणातून इतिहासातील सर्वाधिक विसर्ग करण्याची वेळ रविवारी संध्याकाळी आली. धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्याने वारणा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

शिराळा तालुक्यातील पश्चिम भागात चांदोली धरण परिसरात मुसळधार पावसाने सुरुवात केल्यानंतर मणदूर, सोनवडे, आरळा तसेच परिसरातील वाड्यांना अक्षरशः पावसाने झोडपून काढले. मुसळधार पावसाने नाल्यांमध्ये पाणीच पाणी झाले. शेती शिवारे तुडुंब झाली आहेत. या पावसाने भात पिकाचे शेकडो एकरातील नुकसान केलं आहे. मणदूरमधील येथील ओढ्याचे पाणी भात शेतीत शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.