AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पांढरं सोनं दिसतंय पण काढता येईना, खानदेशातील शेतकऱ्यांची अवस्था

खानदेशात पावसामुळे कपाशीचे अतोनात नुकसान झाले आहे. (Cotton) कापसाचे पीक काढणीला आहे पण पावसामुळे शेतकऱ्यांना बोंडाची तोडणीही शक्य होत नाही. त्यामुळे डोळ्यासमोर कापूसाची बोंडं ही चिखलात गळून पडत आहेत. निसर्गाने निर्माण केलेल्या परस्थितीसमोर बळीराजा हताश झाला आहे. खरिपातील इतर पिकांना योग्य दर नाही तर कापसाची ही अवस्था झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

पांढरं सोनं दिसतंय पण काढता येईना, खानदेशातील शेतकऱ्यांची अवस्था
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Sep 23, 2021 | 1:30 PM
Share

जळगाव : मराठवाड्यात होत असलेल्या पावसामुळे खरीपातील सोयाबीन, उडीद या पिकाचे नुकसान झाले आहे तर (Khandesh) खानदेशात पावसामुळे कपाशीचे अतोनात नुकसान झाले आहे. (Cotton) कापसाचे पीक काढणीला आहे पण पावसामुळे शेतकऱ्यांना बोंडाची तोडणीही शक्य होत नाही. त्यामुळे डोळ्यासमोर कापसाची बोंडं ही चिखलात गळून पडत आहेत. निसर्गाने निर्माण केलेल्या परस्थितीसमोर बळीराजा हताश झाला आहे. खरिपातील इतर पिकांना योग्य दर नाही तर कापसाची ही अवस्था झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

पावसाने केवळ मराठवाड्यातच नाही तर विदर्भातही थैमान घातले आहे. त्यामुळे शेतीची कामेही करणे मुश्किल झाले आहे. हंगामाच्या सुरवातीलाच लागवड केलेला कापूस आता वेचणीला आला आहे. पण चार दिवस विश्रांती दिलेल्या पावसाने पुनारागमन केले आहे. त्यामुले वेचणी करावी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. गेल्या तीन दिवसापासून पाऊस होत असल्याने वेचणीसाठी शेतामध्ये जाणेही शक्य होत नाही.

शिवाय मजुर लावून कापूस वेटणीची कामे करावी लागतात. मात्र, कामाला सुरवात केली की पावसाचे आगमन होत आहे. कामे तर रखडत आहेतच शिवाय मजूरांवर शेतकऱ्यांचा खर्चही होत आहे. सध्याच्या वातादरणामुळे एकरी एक ते दीड क्विंटल कापसाचे नुकसान होत आहे. त्यामुळे पहिल्या वेचनीत तर शेतकऱ्यांचे नुकसान हे अटळ आहे. मात्र, भविष्यात तरी पावसाने उघडीप द्यावी अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहे.

कापसाची तीच सोयाबीनची अवस्था

पहिल्या पेऱ्यातील सोयाबीनची काढणी ही झाली असली तरी उशीराने पेरणी झालेले सोयाबीन अजूनही वावरातच आहे. खानदेशासह मराठवाड्यात हीच अवस्था आहे. कापसाची बोंड ही परीपक्व झाल्याने थेट पावसाच्या पाण्यात गळून पडत आहेत तर सोयाबीनच्या शेंगाही आता पोसलेल्या अनस्थेत आहेत. मात्र, पावसाने शेत हे चिभडल्याने काढणीही मुश्किल होत आहे. खरीपातील ही दोन्ही महत्वाची पीके ही पाण्यातच आहेत.

एकरी दोन क्विंटल कापसाला फटका

हंगामपुर्व कापूस हा काढणीला आला आहे. मध्यंतरी चार दिवस पावसाने उघडीप दिल्याने वेचणी कामाला वेग आला होता. पण गेल्या तीन दिवसापासून पुन्हा पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे कापसाच्या झाडाची बोंड ही पावसाच्या पाण्यातच गळून पडत आहेत. त्यामुळे एकरी दीड ते दोन क्विंटलचे नुकसान हे शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. अशीच परस्थिती राहिली तर पहिली वेचणीचे उत्पादन पाण्यातच जाणार असल्याचे चित्र आहे. (Rain also stalled cotton harvesting, farmers in Khandesh in trouble)

इतर बातम्या :

मुलाला सोन्याची अंगठी न केल्याने रुसवा, सुनेने सासूच्या अंगावर ओतलं उकळतं पाणी

नाशिकः राज ठाकरेंच्या जंगी स्वागताने पोलीस आयुक्त तापले; कायद्याचे उल्लंघन केल्यास निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार

प्रवीण दरेकर म्हणाले, राष्ट्रवादीचे घोटाळे बाहेर काढणार, अजितदादांचं जशास तसं प्रत्युत्तर

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.