AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आस्मानी संकट त्यात चोरट्यांचा धुमाकूळ, हताश 65 वर्षीय शेतकऱ्याची कहाणीच निराळी

संकट आली की ती चोहीबाजूने येतात म्हणूनच 5 एकरातील बागच काढून टाकली, हे बोल आहेत यवतमाळ जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील 65 वर्षीय शेतकऱ्याचे. शेतकरी परस्थितीसमोर हताश झाला की काय करु शकतो याचे वास्तव चित्र या शेतकऱ्याच्या नैराश्यातून समोर येतंय...

आस्मानी संकट त्यात चोरट्यांचा धुमाकूळ, हताश 65 वर्षीय शेतकऱ्याची कहाणीच निराळी
संग्रबीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Oct 30, 2021 | 5:06 PM
Share

यवतमाळ : आख्खं आयुष्य शेतामध्ये घातलं पण कधी एवढे वाईट दिवस पाहयला मिळाले नाहीत. (Yavatmal)बहरात असलेल्या ( orange orchards) संत्री बागेचं पावसामुळं न भरुन निघणारं नुकसान झालंय त्यात वय अधिकचं असल्याने बाग जोपासताना अनंत अडचणी येत होत्या हे कमी म्हणून की काय यंदा तर (theft of fruits) बागेतील संत्र्याचीही चोरी होऊ लागली होती. संकट आली की ती चोहीबाजूने येतात म्हणूनच 5 एकरातील बागच काढून टाकली, हे बोल आहेत यवतमाळ जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील 65 वर्षीय शेतकऱ्याचे. शेतकरी परस्थितीसमोर हताश झाला की काय करु शकतो याचे वास्तव चित्र या शेतकऱ्याच्या नैराश्यातून समोर येतंय…

यवतमाळ जिल्ह्यात फळबागायत क्षेत्र अधिकचे आहे. काळाच्या ओघाच या क्षेत्रमाध्ये वाढ होत असताना आपणच कशाला मागे राहयचे म्हणून 65 वर्षीय रघुनाथ मेश्राम यांनीही भाजीपाल्याच्या जोडीला 5 एकरावर संत्री बाग लावली होती. भाजीपाल्यावर कुटूंबाचा उदरनिर्वाह आणि बागेतून चार पैशाचे उत्पादन असा त्यांचा हिशोब होता. पण वयोवृध्द शेतकऱ्यांचे कष्ट आणि पैसा या दोन्हीही बाबी फोल ठरल्या आहेत. बाग ऐन बहरात असतानाच पावसाने धुमाकूळ घातला आणि पीक पोसायच्या आतच फळगळती झाली. सर्वकाही होत्याचे नव्हते झाले होते. हे कमी म्हणून की काय झाडाला असलेल्या संत्र्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. त्यामुळे हताश रघुनाथ यांनी थेट फळबागेवरच आरी चालवली आहे. तब्बल 5 एकरात तळहातावरील फोडाप्रमाणे जोपासलेली बागेवर आरी चालवताना रघुनाथ मेश्राम यांना अश्रू अनावर झाले होते.

पावसाने फळबागेचे नुकसान

पावसाने झालेल्या नुकसानीच्या खुना आता प्रकर्षाने जाणवू लागल्या आहेत. प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाल्याने रघुनाथ मेश्राम यांच्या संत्र्याची फळगळती मोठ्या प्रमाणात झाली होती. उमरी तालुक्यात मोठ्या संत्रा लागवड मोठ्या प्रमाणात आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी बागेची जोपासना केली मात्र, रघुनाथ यांना वाढत्या वयामुळे शक्य झाले नाही. 5 एकरातील बागेचे नुकसान झालेले आहे. बागक्षेत्रात संत्र्याचा अक्षरश: सडा झाल्याचे हताश रघुनाथ यांनी सांगितले आहे.

चोरट्यांचा डल्ला अन् हताश शेतकरी

पावसाचे संकट कमी म्हणून की काय, पुन्हा संत्र्याची चोरीचे प्रमाण वाढले होत. दरवर्षी फळबागा बहरात असल्या की या भागात चोरी हे ठरलेलेच आहे. त्यामुळे शेतकरी राखण्यासाठी शेतातच राहतात पण रघुनाथ यांना हे शक्य झाले नाही. पावसाने झालेले नुकसान त्यामध्ये पुन्हा राहिलेल्या फळांची अशाप्रकारे चोरी होत असल्याने या 5 एकरातील बाग मोडून इतर पीक घेण्याचा विचार केला. मात्र, नैसर्गिक आपत्तीबरोबर चोरट्यांच्या धुमाकाळामुळे या परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे.

शासन दरबारीही मिळाला नाही न्याय

पावसाने फळबागेचे नुकसान झाल्यानंतर किमान नुकसानभरपाई मिळावी या आशेने मेश्राम यांनी कृषी कार्यालयात अनेक वेळा खेटेही मारले मात्र, अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. अखेर नुकसानीचे पंचनामे हे झालेच नाहीत. फळबागेची लागवड करुन उत्पादन वाढवण्याचा प्रयत्नात असेलल्या मेश्राम यांच्या नुकसानीला जेवढा जबाबदार निसर्ग आहे त्याहूनही अधिक येथील प्रशासन असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. अखेर रघुनाथ यांना भाजीपाल्यावरच आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्याची नामुष्की ओढावली आहे. (Rain damages orange orchards, thieves dump edifying fruits, farmers remove orchards)

संबंधित बातम्या :

खरीपातील विमा परताव्यानंतर रब्बीच्या पीकविमा योजनेसाठी ‘अशी’ आहे प्रक्रिया

मत्स्यपालनाच्या सर्वोत्तम 5 टीप्स अन् जाणून घ्या सापळा लावण्याचे महत्वही

…यामुळे वाढली लातूरच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक, काय आहेत कारण?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली