AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO ! व्यथा शेतकऱ्याची : जेव्हा डोळ्यासमोर स्वप्नांचा चुराडा होतो तेव्हा…!

पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरुयं. पण हे देखील नियतीला मान्य नाही. अकोला जिल्ह्यातील पातूर नांदपूर येथील शेतकऱ्याने उघडपीच्या काळात सोयाबीनची काढणी-मळणी केली. आता केलेले सोयाबीन साठवणूकीसाठी घेऊन जात असतानाच धो-धो पावसाला सुरवात झाली.

VIDEO ! व्यथा शेतकऱ्याची : जेव्हा डोळ्यासमोर स्वप्नांचा चुराडा होतो तेव्हा...!
पावसामुळे सोयाबीनची झालेली अवस्था, अकोला जिल्ह्यातील स्थिती
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Oct 19, 2021 | 12:57 PM
Share

अकोला :  (The Reality of Agriculture) स्वप्नांचा चुराडा कसा होतो ? याचे वास्तव (Akola) अकोल्यात समोर आलं आहे.. अथकचे परीश्रम, निसर्गाशी दोन हात करुनही शेतकऱ्यांचे स्वप्न मातीमोल कसे होते याचा प्रत्यय सांगण्यासाठी हे बोलके चित्र पुरसे आहे. आगोदरच अतिवृष्टीने आणि सततच्या पावसाने खरीपातील पीके ही पाण्यात होती. (Rain damages soyabean) त्यामुळे उत्पादनात घट तर आहेच शिवाय वावरात असलेले पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरुयं. पण हे देखील नियतीला मान्य नाही. अकोला जिल्ह्यातील पातूर नांदपूर येथील शेतकऱ्याने उघडपीच्या काळात सोयाबीनची काढणी-मळणी केली. आता केलेले सोयाबीन साठवणूकीसाठी घेऊन जात असतानाच धो-धो पावसाला सुरवात झाली.

पावसाचे पाणी सोयाबीनमधून जिरपत होते आणि प्रकाश पुंडे यांचे स्वप्न त्या पाण्यातच वाहून जात होते. नियतीने एवढीपण चेष्टा करु नये. हजारो रुपयांचा खर्च आणि गुडघ्याभर चिखलात शिरुन काढलेले सोयाबीन अक्षरश: डोळ्यादेखत वाहून गेले आहे. त्याप्रसंगीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. पण गेलेले सोयाबीन पुन्हा येणार नाही हे ही तेवढंच खरं आहे…

खरीपातून उत्पादन नाही, नुकसानच

राज्यात खरीप आणि रब्बी हे दोन हंगाम शेतकऱ्यांसाठी महत्वाचे आहेत. यातच खरीपातून अधिकचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळत असते. शिवाय या हंगामातील सोयाबीन पीकाचा कालावधी हा कमी असून अधिकचे उत्पादन. यामुळे दरवर्षी सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये वाढ होत आहे तर कापसाच्या क्षेत्रात घट. यंदाही राज्यात 52 लाख हेक्टरावर सोयाबीनचा पेरा झाला होता. सर्वकाही सुरळीत होते. पण पावसाची अशी काय अवकृपा झाली की सोयाबीन हे पाण्यातच आहे. अतिवृष्टीतून जीवदान मिळालेले सोयाबीन अखेर परतीच्या पावसात मातीमोल झाले आहे. शिवाय दरही 5 हजाराच्या खाली असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच बिघडले आहे.

शेतकरी पुंडेच्या बाबतीत नेमके काय झाले?

अकोला जिल्ह्यातील पातूर नांदपूरचे प्रकाश पुंडे हे शेतकरी. मध्यंतरी अतिवृष्टीमुळे सोयाबानची काढणी-मळणी कामे रखडली होती. म्हणून पावसाने उघडीप देताच त्यांनी सोयाबीनची काढणी केली आणि सोयाबीन गोळा करुन एकत्र साठवले होते. शिवाय यंत्राच्या सहाय्याने त्यांनी दोन दिवसांपूर्वी त्याची मळणी केली. मळणीचे काम आटोपून ट्रक्टर निघूनही गेला. आता केलेल्या सोयाबीन निवाऱ्याला ठेवण्यासाठी प्रकाशराव यांच्यातह सर्व कुटुंबातील सदस्य हे प्रयत्न करीत होते. अचानक पावसाला सुरवात झाली आणि काय करावे असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला. सोयाबीनचा ढीग, पोत्यामध्ये साठवलेले सोयाबीन सर्वकाही पावसाने भिजलेले आहे. हताश झालेले प्रकाशराव मात्र, ओंजळीने सोयाबीन गोळा करीत व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. (Rain damages soyabean, distress of helpless farmer in Akola)

संबंधित बातम्या :

हमीभाव केंद्रकाडे कोण फिरकणार ? बाजारात ‘पांढऱ्या सोनाल्या’ला अधिकचा दर

शेतकऱ्यांचे तर्क-वितर्क ; मात्र, अद्यापही विमा नुकसान भरपाईचे घोडे अडलेलेच ; काय आहे वास्तव ?

Formula ! एकरी 16 क्विंटल हरभरा, नियोजन अन् योग्य पध्दतीने पेरणीने सहज शक्य

Follow Us
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न.

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल