AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gondia : पावसाने बदलले खरिपाचे चित्र, कृषी विभागाचा सल्ला वाचा अन् कामाला लागा..!

आतापर्यंत पुरेशी जमिनीत ओल नसल्याने भात रोवणी झाली तरी धोका कायम अशी स्थिती होती. पण आता विदर्भात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. शिवाय गेल्या दोन दिवसांपासून यामध्ये वाढ झाल्याने भात लागवडीसाठी पोषक वातावरण झाले आहे. जमिनीत पुरेशा ओलावा असल्याने हीच पेरणीची योग्य वेळ असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Gondia : पावसाने बदलले खरिपाचे चित्र, कृषी विभागाचा सल्ला वाचा अन् कामाला लागा..!
गोंदिया जिल्ह्यामध्ये भात रोवणीच्या कामाला गती आली आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jul 05, 2022 | 12:33 PM
Share

गोंदिया : पावसाने मनात आणले तर काय होऊ शकते याचा प्रत्यय सबंध महाराष्ट्र घेत आहे. जुलै महिना उजाडेपर्यंत यंदा (Kharif Sowing) खरिपाच्या पेरण्या होतात की नाही अशी स्थिती ओढावली होती. राज्यात केवळ 60 लाख हेक्टरावर पेरण्या झाल्या होत्या. त्यामुळे गतवर्षी अधिकच्या पावसाने नुकसान तर यंदा (Monsoon) पावसाने दडी मारल्याने नुकसान होते की काय अशी स्थिती होती. पण जुलै महिन्यात पाऊस आपले रुपडे बदलेन असा अंदाज (Met Department) हवामान विभागाने वर्तवला होता. अखेर गेल्या दोन दिवसांमध्ये चित्र बदलले आहे. 75 ते 100 मिमी पाऊस जिल्ह्यात झाला असून शेतकऱ्यांनी आता भात लागवड केली तरी हरकत नाही. शिवाय ज्या चारसूत्री कार्यक्रमामुळे उत्पादनात वाढ होणार आहे त्याचाच अवलंब करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

दमदार पावसाने शेतजमिनीत ओलावा

आतापर्यंत पुरेशी जमिनीत ओल नसल्याने भात रोवणी झाली तरी धोका कायम अशी स्थिती होती. पण आता विदर्भात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. शिवाय गेल्या दोन दिवसांपासून यामध्ये वाढ झाल्याने भात लागवडीसाठी पोषक वातावरण झाले आहे. जमिनीत पुरेशा ओलावा असल्याने हीच पेरणीची योग्य वेळ असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. विदर्भात पावसामध्ये सातत्य होते पण दोन दिवसांपासून वाढलेला जोर अधिक फायदेशीर ठरणार आहे. आता भात लागवडीला वेग येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.

रोवण्या आटोपून घ्या अन् उत्पादन वाढवा

आतापर्यंत पावसाअभावी रोवण्या रखडल्या होत्या तर आता मुसळधार पाऊस होण्यापूर्वी ही शेती कामे आटोपून घ्या असे आवाहन कृषी विभागाला करावे लागत आहे. कारण आगामी पाच दिवसांमध्ये विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पावसाने अधिक प्रमाणात हजेरी लावली तर रोवणीची कामेही खोळंबली जातील. आगोदरच रोवणी कामाला उशीर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोवणी कामे उरकून उत्पादन कसे वाढेल यावर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

पाच दिवस पावसाचेच

कोकण मुंबईसह विदर्भात अधिकचा पाऊस पडेल असा अंदाज आहे. आगामी 5 दिवस विदर्भात पावसाचे सातत्य राहिले तर मात्र, शेती कामे तर खोळंबतीलच पण जिल्ह्यातील 96 गावांना पूराचा विळखा पडेल असे चित्र आहे. त्यामुळे भात रोवण्या झाल्या की या पिकाला कोणताच धोका राहत नाही. मात्र, शेतकऱ्यांनी रोवणीचे टायमिंग साधणे गरजेचे आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.