AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cotton Crop: इतिहासात पहिल्यांदाच पांढऱ्या सोन्यानं कात टाकली, व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा, शेतकऱ्याला आनंदाचं भरतं!

शेतीमालाचे केवळ उत्पादन घ्यायचे आणि दराचे सर्व गणिते व्यापाऱ्यांच्या स्वाधीन करुन माल बाजारात घेऊन जायचं असंच असतं दरवर्षीचे शेतकऱ्याचं. गेल्या अनेक वर्षापासून हीच परंपरा कायम आहे. पण यंदाचे चित्र काही वेगळेच आहे. कापूस बाजारपेठेची सुत्रच जणू शेतकऱ्यांनेच हाती घेतली आहेत. योग्य दर मिळाला तरच विक्री अन्यथा साठवणूक हा निर्णय घेतल्यामुळे कापसाला गेल्या 50 वर्षात जो दर मिळाला नाही त्यापेक्षा अधिकचा दर यंदा मिळाला आहे.

Cotton Crop: इतिहासात पहिल्यांदाच पांढऱ्या सोन्यानं कात टाकली, व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा, शेतकऱ्याला आनंदाचं भरतं!
यंदा कापसाला विक्रमी दर मिळाला आहे.Image Credit source: TV9 Marathi
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Feb 22, 2022 | 10:57 AM
Share

औरंगाबाद : शेतीमालाचे केवळ उत्पादन घ्यायचे आणि दराचे सर्व गणिते व्यापाऱ्यांच्या स्वाधीन करुन माल बाजारात घेऊन जायचं असंच असतं दरवर्षीचे शेतकऱ्याचं. गेल्या अनेक वर्षापासून हीच परंपरा कायम आहे. पण यंदाचे चित्र काही वेगळेच आहे. (Cotton Market) कापूस बाजारपेठेची सुत्रच जणू शेतकऱ्यांनेच हाती घेतली आहेत. योग्य दर मिळाला तरच विक्री अन्यथा (Cotton Stock) साठवणूक हा निर्णय घेतल्यामुळे कापसाला गेल्या 50 वर्षात जो दर मिळाला नाही त्यापेक्षा अधिकचा दर यंदा मिळाला आहे. शिवाय दिवसेंदिवस मागणीत वाढ ही ठरलेलीच आहे. (Cotton Sale) कापूस खरेदीसाठी व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा लागत असून त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कापूस हा 10 हजार 500 रुपयांवर स्थिरावलेला आहे. त्यामुळे उत्पादनात झालेली घट ही वाढीव दरातून शेतकऱ्यांच्या पदरात पडत आहे. खरीपातील केवळ कापसाने शेतकऱ्यांना यंदा तारलेले आहे. असे असूनही भविष्यात वाढीव दर मिळेल या आशेने साठवणूक ही सुरुच आहे.

यामुळे वाढत आहेत कापसाचे दर

केवळ घटलेले उत्पादन हेच एकमेव दरवाढीमागचे कारण आहे. त्यामुळेच हंगामाच्या सुरवातीपासून हमीभावापेक्षा अधिकचा दर कापसाला राहिलेला आहे. शिवाय दुसरीकडे सरकीचे दर वाढले की कापसाची मागणीत वाढ होत आहे. घटलेले उत्पादन, प्रक्रिया उद्योगासाठी वाढत असलेली मागणी यामुळे स्थानिक पातळीवर व्यापाऱ्यांमध्ये कापसू खरेदीसाठी स्पर्धा होत असून त्याचा लाभ शेतकऱ्यांना होत आहे.

कापूस वेचणी संपली, फरदडही वावराबाहेर

शेतकऱ्यांना जेवढी पिकाची काळजी नाही त्यापेक्षा अधिक व्यापारी हे तत्पर राहत आहेत. खरेदी आवक होताच वाढीव दराने कापसाची खरेदी केली जात आहे. राष्ट्रीय पातळीवर मागणी वाढत असल्यानेच व्यापारी हे अधिकच्या दराने खरेदी करीत आहे. सध्या कापसू वेचणी संपलेली आहे एवढेच नाही तर फरदडचेही उत्पादन घेऊन संपले असतानाही खरेदी केंद्रावर कमी प्रमाणातच आवक सुरु झाली आहे. यंदा प्रथमच व्यापाऱ्यांनी गावोगावी जाऊन कापसाची खरेदी केली आहे. तर दुसरीकडे खरिपात मोठे नुकसान झाले आहे. ते भरुन काढण्यासाठी केवळ कापूस हे एकच पीक हाती असून वाढीव दराची अपेक्षा असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

वाढत्या दरातही कापूस महामंडळाचा हस्तक्षेप नाही

कापूस गाठींचा तुटवडा भासत असतानाही यंदा कापूस महामंडळाने दराबाबत कोणताही हस्कक्षेप केलेला नाही. सरकारनेही यामध्ये हस्तक्षेप करुन वाढत्या दराला ब्रेक लावण्याचे काम केलेले नाही. उलट 17 हजार कोटी हे हमीभावाने कापूस खरेदी केलेला तोटा भरुन काढण्यासाठी दिले होते. त्यामुळे वाढत्या दराला कायम सरकारचाही पाठिंबा राहिल्यामुळे आज विक्रमी दर मिळत आहे. वाढत्या मागणीमुळे यंदा कापसाने 10 हजाराचा टप्पा पार केलेला आहे.

संबंधित बातम्या :

देर आए… दुरुस्त आए..: ज्वारी पिकाला मिळणार गतवैभव, स्थानिक पातळीवर काय होणार प्रयत्न ? वाचा सविस्तर

FRP : ज्याची धास्ती शेतकऱ्यांना ‘तोच’ निर्णय राज्य सरकारचा, ‘एफआरपी’ बाबत नेमके काय झाले?

बुडत्याला काडीचा आधार, आठ फळपिकांसाठी विमा योजना, राज्य सरकारचे एक पाऊल पुढे..!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली