AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan : या शेतकर्‍यांच्या खात्यात येणार नाहीत 2 हजार रुपये, योजनेत बसत नसल्यास त्वरीत काढा नाव, अन्यथा होईल कारवाई

पंतप्रधान किसान योजनेंतर्गत देशातील सर्व 14.5 कोटी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे. आतापर्यंत त्याअंतर्गत 11.71 कोटी लोकांची नोंद झाली आहे. (Rs 2,000 will not come in the account of these farmers, if it does not fit in the plan, remove the name immediately)

PM Kisan : या शेतकर्‍यांच्या खात्यात येणार नाहीत 2 हजार रुपये, योजनेत बसत नसल्यास त्वरीत काढा नाव, अन्यथा होईल कारवाई
या शेतकर्‍यांच्या खात्यात येणार नाहीत 2 हजार रुपये
| Updated on: Apr 12, 2021 | 3:52 PM
Share

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना आठवा हप्ता एप्रिलच्या अखेरीस जारी केला जाऊ शकतो. आतापर्यंत ही योजना सुरू झाल्यापासून असे बरेच शेतकरी आहेत जे या योजनेत बसत नाहीत, परंतु त्यांच्या खात्यावर पैशाचा हप्ता पोहोचत आहे. अशा शेतकऱ्यांना सरकारने कडक कारवाईचा इशारा दिला आहे. अशा शेतकर्‍यांवर सरकार कारवाई करीत असून खात्यात पोहोचलेली रक्कमदेखील वसुल करीत आहे. आपणही या योजनेत बसत नसल्यास ताबडतोब आपले नाव सूचीमधून काढून टाका. पंतप्रधान किसान योजनेंतर्गत देशातील सर्व 14.5 कोटी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे. आतापर्यंत त्याअंतर्गत 11.71 कोटी लोकांची नोंद झाली आहे. (Rs 2,000 will not come in the account of these farmers, if it does not fit in the plan, remove the name immediately)

शासकीय मार्गदर्शक सूचना

मोदी सरकारने असे म्हटले आहे की ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेत असेल केवळ अशाच शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपये पाठवले जातील. केंद्रीय कृषी मंत्रालयाने पंतप्रधान किसान योजनेसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे की सरकारी अधिकाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही, परंतु केंद्र व राज्य सरकार मल्टी टास्किंग स्टाफ / चतुर्थ श्रेणी / गट डी कर्मचारी यासाठी पात्र मानले जातील.

या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा लाभ

– पूर्वीचे किंवा विद्यमान घटनापाल असलेले शेतकरी सध्याचे किंवा माजी मंत्री आहेत. – नगराध्यक्ष किंवा जिल्हा पंचायत अध्यक्ष, आमदार, एमएलसी, लोकसभा आणि राज्यसभा खासदार. – केंद्र किंवा राज्य सरकारचे अधिकारी पात्र असणार नाहीत. – गेल्या आर्थिक वर्षात प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळणार नाही. – ज्या शेतकऱ्यांना 10 हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळते त्यांनाही लाभ मिळणार नाही. – व्यावसायिक, डॉक्टर, अभियंते, सीए, वकिल आणि आर्किटेक्ट या योजनेत येणार नाहीत

सरकार करतंय पैशांची वसुली

ज्या लोकांनी या योजनेसाठी पात्र नसतानाही पैसे घेतले आहेत, अशा 33 लाख लाभार्थ्यांकडून पैसे काढले जात आहेत. सरकार त्यांच्याकडून 2326 कोटी रुपये वसूल करीत आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत केंद्र सरकार नोंदणीकृत शेतकर्‍यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. 2-2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचते. मोदी सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी 24 फेब्रुवारी 2019 रोजी ही योजना औपचारिकपणे सुरू केली. तथापि, 1 डिसेंबर 2018 रोजी ही अनौपचारिकरित्या सुरू झाली. (Rs 2,000 will not come in the account of these farmers, if it does not fit in the plan, remove the name immediately)

इतर बातम्या

टाळ्या-थाळ्या खूप झालं, आता व्हॅक्सिन द्या; राहुल गांधींची खोचक टीका

Pensioners ना मोठा दिलासा, आता आधारशिवाय बनणार हयातीचा दाखला

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.