AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agricultural Department : … म्हणून वाढले उन्हाळी सोयाबीन अन् सुर्यफूलाचे क्षेत्र, काय आहे कृषी विभागाची भूमिका?

पीक पध्दतीमध्ये बदल होत नाही. उत्पादनात वाढ होऊ अथवा घट शेतकऱ्यांचा कायम परंपारिक पिकांवरच भर राहिलेला आहे. यामध्ये मराठवाड्यातील शेतकरी असतील तर हा बदल शक्यच नाही. मात्र, कृषी विभागाने ठरवले तर काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण सध्या मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, जालना तसचे इतर जिल्ह्यांमध्ये पाहवयास मिळत आहे.

Agricultural Department : ... म्हणून वाढले उन्हाळी सोयाबीन अन् सुर्यफूलाचे क्षेत्र, काय आहे कृषी विभागाची भूमिका?
यंदा उन्हाळी हंगामात सुर्यफूलाचे क्षेत्र वाढले आहे.
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Feb 05, 2022 | 4:00 AM
Share

औरंगाबाद : (Crop Change) पीक पध्दतीमध्ये बदल होत नाही. उत्पादनात वाढ होऊ अथवा घट शेतकऱ्यांचा कायम परंपारिक पिकांवरच भर राहिलेला आहे. यामध्ये मराठवाड्यातील शेतकरी असतील तर हा बदल शक्यच नाही. मात्र, कृषी विभागाने ठरवले तर काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण सध्या (Marathwada) मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, जालना तसचे इतर जिल्ह्यांमध्ये पाहवयास मिळत आहे. दरवर्षी कापूस हंगाम संपला असतानाही शेतकरी फरदडचे उत्पादन घेऊन चार पैसे कमावण्याचे धाडस करीत असतो. यंदाही अशीच काहीशी अवस्था शिवाय कापसाला अधिकचा दर यामुळे फरदडचे उत्पादन हे घेतले जाणारच असेच वातावरण निर्माण झाले होते. मात्र, (Agricultural Department) कृषी विभागाने केलेली जनजागृती आणि शेतकऱ्यांची बदललेली मानसिकता यामुळे शेतकऱ्यांनी फरदडचे उत्पादन न घेता याला पर्याय शोधत उन्हाळी सोयाबीन आणि सुर्यफूलाचा पेरा केला आहे. त्यामुळे होणारे नुकसान टळलेले आहे.

यंदा कापसाला विक्रमी दर

खरिपातील कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले होते. उत्पादन घटल्यामुळे हंगामाच्या सुरवातीपासून कापसाच्या मागणीत वाढ झाली होती. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने यंदा कधी नव्हे तो कापासाचे दर हे 10 हजार रुपये क्विंटलपेक्षा अधिक झाले होते. कापसाचे दर वाढल्याने पुन्हा फरदडचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल होता. मात्र, फरदडमुळे शेत जमिनीचे आणि पर्यायाने आगामी हंगामातील पिकांचे कसे नुकसान होते हे पटवून देण्यात कृषी विभागाला यश आले आहे. त्यामुळेच फरदडला पर्याय म्हणून सुर्यफूल, भुईमूग, उन्हाळी सोयाबीन, टरबूज यासारखे पीके घेण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले होते.

फरदड कापूस म्हणजे नेमके काय?

खरीप हंगामातील कापसाची वेचणी तशी दिवाळी किंवा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंतच केली जाते. वेळेत तोडणी केली तर कापसावरील बोंडअळीचा प्रादुर्भाव इतर पिकांवर होत नाही शिवाय शेतीचा दर्जाही टिकून राहतो. मात्र, जो कापूस उन्हाळ्यापर्यंत कायम ठेऊन त्याची जोपासना केली जाते त्यास फरदड असे म्हणतात. फरदडचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना नविन असे काहीच करावे लागत नाही. आहे त्या क्षेत्रावरील कापसाची जोपासना करायची आणि उत्पादन घ्यावयाचे एवढेच काही ते कष्ट.

फरदड कापसामुळे काय होते?

सध्या वातावरणातील बदलामुळे कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच कापूस शेतामध्ये कायम ठेवला तर अळीचा प्रादुर्भाव हा वाढणारच आहे. बोंडअळीचे जीवनचक्र संपवण्यासाठी किमान 6 ते 7 महिने कापूस पीक वावरामध्ये नसणे गरजेचे आहे. एवढेच नाही तर फरदड कापसाचा शेत जमिनीवरही परिणाम होत असतो. आगामी हंगामातील पिकांच्या उगवण क्षमतेवर त्याचा परिणाम होतो.  त्यामुळे तात्पूरत्या फायद्यासाठी शेतकऱ्यांनी आगामी हंगामातील आणि शेतजमिनीचे नुकसान करुन घेऊ नये असा सल्ला कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या :

Onion: बाजार समितीच्या एका निर्णयाने कांदा उत्पादकांचा प्रश्न मिटला, आवक सुरुच उलट दरात सुधारणा

Crop Insurance : पीकविम्यासाठी राज्याची स्वतंत्र योजना, कृषिमंत्र्यांनीही दिले संकेत, कशामुळे निर्माण झाली परस्थिती?

Drone farming | जमलंच गड्या! इकडं अर्थमंत्र्यांनी सांगितलं अन् भंडाऱ्याच्या बहाद्दरानं ड्रोन शेतीचा प्रयोगही केला!

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?