AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur : माढ्याच्या मानेगावात जोरदार वादळीवारे, एकरातील द्राक्षांची बाग भुईसपाट

अचानक झालेल्या दुर्घटनेमुळे शेतकरीवर्ग मोठा टेन्शनमध्ये आला आहे. त्याचबरोबर आता सरकारच्या मदतीकडे शेतकऱ्याचे डोळे लागले आहेत. काढणीला आलेल्या द्राक्षांची बाग भुईसपाट झाल्याने परिसरात बघ्यांची सुद्धा अधिक गर्दी आहे.

Solapur : माढ्याच्या मानेगावात जोरदार वादळीवारे, एकरातील द्राक्षांची बाग भुईसपाट
grapsImage Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 04, 2023 | 12:43 PM
Share

सोलापूर : माढा (Madha) तालुक्यात काल जोरदार वादळीवारे (stormy wind) झाल्यामुळे शेतकऱ्यांना (farmer) मोठा फटका सहन करावा लागला आहे. जोरदार वादळी वाऱ्याचा द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. माढ्याच्या मानेगावातील प्रकाश जाधव या शेतकऱ्यांची १ एकर द्राक्ष बाग वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाली आहे. शेतकरी जाधव यांचे जवळपास २५ लाखांचे आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. माढा तालुक्यात इतर शेतकऱ्यांच्या शेतीचं सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

द्राक्षांची बाग भुईसपाट झाल्याने परिसरात बघ्यांची..

अचानक झालेल्या दुर्घटनेमुळे शेतकरीवर्ग मोठा टेन्शनमध्ये आला आहे. त्याचबरोबर आता सरकारच्या मदतीकडे शेतकऱ्याचे डोळे लागले आहेत. काढणीला आलेल्या द्राक्षांची बाग भुईसपाट झाल्याने परिसरात बघ्यांची सुद्धा अधिक गर्दी आहे. महाराष्ट्रात सध्या काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी पावसाची सुद्धा शक्यता आहे.

भाजीपाल्याची आवक घटत असल्याचे चित्र वाशिम बाजारपेठेत दिसून येत आहे

उन्हाळ्यात दरवेळेस भाजीपाल्याची आवक घटते. त्याचप्रमाणे आता भाजीपाल्याची आवक घटत असल्याचे चित्र वाशिम बाजारपेठेत दिसून येत आहे. रविवार वगळता इतर दिवशी आवक कमी होत आहे. तर गुरुवार बाजारात भाजीपाला उत्पादक शेतकरी विक्रीसाठी येत असल्याने या दिवशी मोठ्या प्रमाणात आवक असते. इतर दिवसांत मात्र, कमी आवक होत असल्याचे चित्र आहे. परिणामी भाजीपाल्याचे दर वाढत आहेत.

उन्हाचा फटका केळी पिकालाही बसत आहे

आठवड्याभरापासून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. उन्हाचा फटका सर्वसाधारण नागरिकांसह केळी पिकालाही बसत आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी केळी वाचवण्यासाठी धडपड करत असल्याचे दिसून येत आहे. केळी पिकाला या उन्हाचा फटका बसू नये, यासाठी शेतकरीआपल्या केळी पिकाच्या आजूबाजूने नेट तसेच घरातील टाकाऊ कपड्यांचा वापर करून आपल्या शेताच्या आजूबाजूने लावून आपल्या शेतातील केळी उष्णतेपासून वाचवताना जिल्ह्यातील केळी उत्पादक दिसत आहे.

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....