AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देर आए दुरुस्त आए..! सोयाबीन बाबतचा शेतकऱ्यांचा ‘तो’ एकच निर्णय ठरला ‘टर्निंग पॉईंट’

वाढीव उत्पादनापेक्षा आता महत्व आहे ते शेतीमालाला बाजारपेठेत काय दर आहे त्याला. यावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. यंदा तर निसर्गाच्या लहरीपणामुळे सर्वकाही बेभरवश्याचे झाले आहे. त्यामुळे खरिपातील सोयाबीनच्या उत्पादनात तर मोठी घट झाली असून शेतकऱ्यांना अपेक्षा आहे ती वाढीव दराची. मात्र, हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनला कवडीमोल दर मिळाला होता.

देर आए दुरुस्त आए..! सोयाबीन बाबतचा शेतकऱ्यांचा 'तो' एकच निर्णय ठरला 'टर्निंग पॉईंट'
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Feb 11, 2022 | 9:35 AM
Share

वाशिम : वाढीव उत्पादनापेक्षा आता महत्व आहे ते (Agricultural Price) शेतीमालाला बाजारपेठेत काय दर आहे त्याला. यावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. यंदा तर निसर्गाच्या लहरीपणामुळे सर्वकाही बेभरवश्याचे झाले आहे. त्यामुळे खरिपातील सोयाबीनच्या (Decrease in production) उत्पादनात तर मोठी घट झाली असून शेतकऱ्यांना अपेक्षा आहे ती वाढीव दराची. मात्र, हंगामाच्या सुरवातीला (Soybean) सोयाबीनला कवडीमोल दर मिळाला होता. उत्पादन घटूनही ही परस्थिती ओढावल्याने शेतकऱ्यांनी वाढीव दर मिळाला तरच विक्री हा निर्धार केला होता. त्यामुळेच सातत्याने दरात चढ-उतार पाहवयास मिळाले आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने अखेर सोयाबीनच्या दरात वाढ होत गेली. दिवाळी नंतर 4 हजार 500 असलेले सोयाबीन थेट 6 हजारावरच येऊन ठेपले असे असतानाही सोयाबीन विकण्याची घाई न करता टप्प्याटप्प्याने विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. याच निर्णयामुळे हंगामाच्या अंतिम टप्प्यापर्यंत सोयाबीनला मागणी कायम आहे. जानेवारी महिन्यात स्थिरावलेल्या दरात आता पुन्हा वाढ होत आहे. हंगामाच्या सुरवातीला नाही पण अंतिम टप्प्यात का होईना शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

काय आहे बाजारपेठेतले चित्र?

कृषी उत्पन्न बाजारपेठेत सध्या खरीप हंगामातील सोयाबीन आणि तुरीची आवक वाढत आहे. असे असले तरी शेतीमालाच्या किमती पाहूनच शेतकरी आवक सुरु ठेवत आहे. जानेवरी महिन्यामध्ये सोयाबीनचे दर हे 5 हजार 800 वरच स्थिरावले होते. त्यामुळे सोयाबीन विक्री की साठवणूक या संभ्रम अवस्थेमध्ये शेतकरी होते. मात्र, त्या दरम्यान घेतलेला निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्याचा ठरत आहे. आता सोयाबीन 6 हजारावर गेले आहे तर नव्याने दाखल होत असलेली तूर 6 हजार 200 रुपयांवर आहे.

शेतकऱ्यांना वाढीव दराची अपेक्षा कायम

यंदाच्या हंगामात 4 हजार 500 रुपयांवर असलेले सोयाबीन आता 6 हजारावर येऊन ठेपले आहे. असे असतानाही 7 हजारावर दर हाच योग्य राहणार असल्याची भूमिका शेतकरी घेत आहे. किमान 7 हजार रुपये क्विंटलला दर मिळावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मध्यंतरी दर स्थिर झाल्यानंतर अनेकांनी आहे त्याच दराचा आधार घेतला पण आता वाढ होताच शेतकऱ्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत.

शेतकऱ्यांना सल्ला..!

हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही सोयाबीनची अपेक्षित आवक झालेली नाही. शेतकऱ्यांनी अजूनही सोयाबीनची साठवणूकच केलेली आहे. शिवाय यंदा उन्हाळी हंगामात सोयाबीनचा पेरा वाढलेला आहे. अशा परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केली तरच फायद्याचे राहणार आहे. सध्याचा दर हा सरासरी प्रमाणे आहे. भविष्यात साठवणूक केलेले आणि उन्हाळी हंगामातल्या सोयाबीनची आवक एकदाच वाढली तर दर घटण्याचा धोका आहे. त्यामुळे साठवूकीपेक्षा विक्रीवर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला व्यापारी अशोक अग्रवाल यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या :

सरकारला दूधापेक्षा दारू महत्वाची, मद्य निर्णयाबद्दल काय आहे दूध संघाचे धोरण?

Untimely Rain : धोका कायम, भंडाऱ्यात पुन्हा अवकाळीची शक्यता! पिकांची घ्यावी लागणार काळजी

Chilly : भंडाऱ्याच्या सेवकरामांना कळाले बाजारपेठेचे महत्व, भंडाऱ्याची मिरची थेट दिल्ली दरबारी

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली