AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोयाबीन, उडदाच्या चढ-उताराने धाकधूक, हरभऱ्याने मात्र शेतकऱ्यांना दिलासा

गेल्या दोन दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात मोठ्या प्रमाणात घट झाली तर उडीदाचे दर काही प्रमाणात वाढले होते असे असताना (chickpea) हरभऱ्याचे दर मात्र टिकून आहेत. यंदा हरभऱ्याच्या उत्पादनात घट झाली होती तर आता मागणी वाढत असल्याने दर हे टिकून आहेत. शिवाय भविष्यातही अशाच प्रकारे दर राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सोयाबीन, उडदाच्या चढ-उताराने धाकधूक, हरभऱ्याने मात्र शेतकऱ्यांना दिलासा
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Sep 21, 2021 | 1:09 PM
Share

लातूर : आता खरिपातील पिकांची आवक वाढत आहे. (grain price) त्यामुळे शेती मालाच्या दरात दिवसागणिक बदल हे होत आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात मोठ्या प्रमाणात घट झाली तर उडीदाचे दर काही प्रमाणात वाढले होते असे असताना (chickpea) हरभऱ्याचे दर मात्र टिकून आहेत. यंदा हरभऱ्याच्या उत्पादनात घट झाली होती तर आता मागणी वाढत असल्याने दर हे टिकून आहेत. शिवाय भविष्यातही अशाच प्रकारे दर राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही हरभऱ्याला 5 हजार ते 5 हजार 500 रुपये प्रति क्विंटलचा दर राहिलेला आहे. एकीकडे खरिपातील पिकांची आवक ही सुरु झाली आहे. शिवाय या हंगामातील सर्वच पिकांना हा पावसाचा फटका बसला होता. आता निर्यातीसही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळेच हरभऱ्याचा दर बाजारात टिकून आहे. आयातीबाबत सरकारचे धोरण आणि हरभरा पिकाबद्दल व्यापाऱ्यांनी घेतलेली वायदाबंदीची भुमिका यामुळे हरभऱ्याचे दर हमी भावापेक्षा कमी आले होते. मात्र, सरकारच्या धोरणामुळे हरभऱ्याच्या मागणीत वाढ झाली शिवाय देशात यंदा हरभऱ्याचे उत्पादनही घटलेले आहे.

बाजारात हरभऱ्याचा तुटवडा भासत असल्यानेच आज हमी भावापेक्षा अधिकचा दर हा मिळत आहे. महाराष्ट्रप्रमाणे राज्यस्थान, मध्यप्रदेशमध्येही क्विंटलमागे 50 ते 100 रुपयांनी दर हे सुधारलेले आहेत. त्यामुळे सोयाबीनचे दर घटत असले तरी हरभऱ्याच्या स्थिर दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा आहे.

असे आहेत हरभऱ्याचे दर

हरभऱ्याची आवक ही बाजार पेठेत सुरु झाली असली तरी यामध्ये सातत्य नाही. आवक ही कमी-अधिक प्रमाणात होत आहे. मात्र, मागणी असल्याने हरभऱ्याचे दर काही प्रमाणात का होईना वाढत आहेत. आठवडाभरात 50 ते 100 रुपयांनी दरामध्ये वाढ झालेली आहे. अकोला बाजार समितीमध्ये 5200 ते 5575 रुपये दर तर नागपूरमध्ये 5340 ते 5600 लातूर बाजार समितीमध्ये 5190 ते 5700 असे दर हरभऱ्याला मिळालेले आहेत.

चार पटीने वाढली सोयाबीनची आवक

सोयाबीनची आवक ही झपाट्याने वाढत आहे तर त्याच तुलनेत दरावरही त्याचा परिणाम हा होत आहे. आवक वाढली की दर घटणार हे बाजाराचे सुत्रच आहे. त्यानुसार सोयाबीनची अवस्था झालेली आहे. सोमवारी बाजार समितीमध्ये तब्बल 40 हजार कट्ट्यांची आवक झाली होती. शनिवारी सोयाबीनची आवत ही 10 हजार कट्ट्यांची होती. आता नविन सोयाबीन दाखल होत असून अशीच अवस्था राहीली सोयाबीनचे दर आणखीन घटतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दोन दिवसापूर्वी सोयाबीनचे मार्केटमधील चित्र

सुरवातीच्या काळात 8910 रुपये क्विंटलवर गेलेले सोयाबीन शनिवारी थेट 8375 येऊन ठेपले आहे. एक दिवसाच्या फरकाने 535 रुपये फरक पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ढग आहेत. सोमवारी तर सोयाबीनच्या दरात 2 हजाराने घट झाली आहे. तर उडदाने शेतकऱ्याला दिलासा दिला होता. दोन दिवसापुर्वी 7000 रुपये क्विंटल प्रमाणे विकला जाणारा उडीदाला शनिवारी मात्र, 7200 रुपये असा दर मिळाला आहे. शनिवारी सोयाबीनची 100000 कट्टांची आवक झाली होती. (Soyabean-urad prices fluctuate, chickpea prices stable, market market fluctuations)

संबंधित बातम्या :

मराठवाड्यतील प्रकल्पांनी गाठली सरासरी, शेती सिंचनाचा प्रश्नही मार्गी

पीक पेऱ्याच्या नोंदी वाढवण्यासाठी नांदेड प्रशासनाचा अभिनव उपक्रम, गाव स्तरावर यंत्रणा

‘एफआरपी’ चा साखर कारखानदारांना विसर, राज्यातील कारखान्यांकडे कोट्यावधीची थकबाकी

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली