AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जात’ सांगायची आणि रासायनिक खत घ्यायचं, या जिल्ह्यातील शेतकरी वर्ग नाराज

याबाबत खत विक्रेत्याला विचारणा केली असता. मशिनला नवीन अपडेट आलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या सगळ्या प्रकरणामुळं शेतकरी वर्ग प्रचंड निराश झाल्याची जिल्ह्यात चर्चा आहे.

'जात' सांगायची आणि रासायनिक खत घ्यायचं, या जिल्ह्यातील शेतकरी वर्ग नाराज
government machineImage Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 10, 2023 | 11:33 AM
Share

शंकर देवकुळे, सांगली : रासायनिक खत (Chemical fertilizers) खरेदी करताना आता शेतकर्‍यांना (Farmer) पॉस मशिनवर आपली जात सांगावी लागत आहे. गेल्या काही दिवसापासून ई-पॉस मशिन या सॉप्टवेअर यंत्रणेमध्ये अशा पध्दतीचे अपडेटस आले आहेत. खत खरेदी करताना दुकानदारांकडून (Chemical fertilizers shopkiper) आपल्या जाती बद्दलची विचारणा होत असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत. रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकर्‍यांना आपली जात सांगावी लागत असल्यामुळे बळीराजांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणी नेमका जाब कुणाला विचारायचा अशा संकटात शेतकरी पडला आहे. त्याचबरोबर खत खरेदी करताना इतकी माहिती कशासाठी हवी असंही शेतकरी म्हणत आहेत.

शेतकरी वर्ग प्रचंड निराश झाल्याची जिल्ह्यात चर्चा

शेतकर्‍यांना दुकानात खत खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर त्यांचं नाव, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक, पोत्यांची संख्या याची माहिती द्यावी लागते. त्यानंतर पॉस मशिनवर शेतकर्‍यांना अंगठा घेऊन खत दिले जाते. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपूर्वी ई-पॉस मशिन या सॉप्टवेअर यंत्रणेमध्ये अपडेटस् आले आहेत. यासाठी शेतकर्‍यांना त्यांची जात विचारण्यात येत आहे. याबाबत खत विक्रेत्याला विचारणा केली असता. मशिनला नवीन अपडेट आलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या सगळ्या प्रकरणामुळं शेतकरी वर्ग प्रचंड निराश झाल्याची जिल्ह्यात चर्चा आहे.

या प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटण्याची शक्यता शक्यता अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यावेळी मोठा गोंधळ देखील होईल असंही काही शेतकरी म्हणतात.

संजय राऊतांची जोरदार टीका

संजय राऊत यांनी या महाराष्ट्रातील आणि केंद्र सरकारवरती जोरदार टीका केली आहे. सरकारने जात आणि धर्माच्या नावावर राज्यात मोठं राजकारण केलं आहे. महाराष्ट्रात यापुर्वी हे कधीचं पाहायला मिळतं नव्हतं. महाराष्ट्र हे एक पुरोगामी राज्य आहे. प्रत्येक ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकार जात दाखवण्याचं काम करीत आहे. शेवटी महाराष्ट्रातील बारा कोटीच्या लोकांना त्यांचा धर्म दाखवावा लागेल असं राऊत म्हणाले.

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....