AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईडी काय आहे हे मनसे प्रमुखांना सांगायला नको; संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना डिवचले

हे सरकार कधीही कोसळेल. कोर्टात जे प्रकरण सुरू आहे. जे आमदार पक्ष सोडून गेले ते निलंबित होतील. त्यातील 16 निलंबित होतील. त्यानंतर सरकार जाईल. त्यामुळे सरकार राहणार नाही आणि फडणवीस राहणार नाही.

ईडी काय आहे हे मनसे प्रमुखांना सांगायला नको; संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना डिवचले
raj thackerayImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 10, 2023 | 10:30 AM
Share

मुंबई : आमच्या वाट्याला गेले, मुख्यमंत्रीपद गेले, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती. राज ठाकरे यांच्या या विधानाचा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. ईडी काय आहे हे मनसे प्रमुखांना चांगलं माहीत आहे, असा चिमटा संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना काढला आहे. तसेच मनसेला पक्षाची वाढ करण्याची अजून गरज आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. सरकार कोसळण्याच्या भीतीनेच बजेट सादर करण्यात आल्याची टीकाही त्यांनी केली.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या टीकेचा समाचार घेतला. त्यांच्या वाटेला जाण्या इतका त्यांचा पक्ष मोठा नाहीये. सरकार का गेलं हे अख्ख्या जगाला माहीत आहे. त्यांना माहीत नसेल तर त्यांच्या पक्षाची वाढ व्यवस्थित होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील सरकार फक्त ईडी, सीबीआय या यंत्रणांचा गैरवापर करून पाडण्यात आलं. आणि जोडीला खोके होतेच. ईडी काय आहे हे मनसे प्रमुखांना मी सांगायला नको. त्यांनी त्याचा चांगला अनुभव घेतला आहे. फक्त ईडीचा अनुभव घेऊनही आमच्या तोफा आणि कार्य सुरू आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

हिंदुत्व सोडलं नाही, सोडणार नाही

शिवसेनेने कधीच हिंदुत्व सोडलं नाही. सोडणार नाही. कोणी काय बोलतो त्यावर शिवसेनेची भूमिका ठरत नाही. तुम्ही तुमचं काम करा. शिवसेनेने नेहमी महाष्ट्राच्या अस्मितेच्या प्रश्नावर लढा दिला. त्याला अंतर दिलं नाही, असंही राऊत यांनी ठणकावलं.

कदाचित सरकारचं शेवटचं बजेट

यावेळी त्यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावरही भाष्य केलं. हे सरकार कधीही कोसळेल. कोर्टात जे प्रकरण सुरू आहे. जे आमदार पक्ष सोडून गेले ते निलंबित होतील. त्यातील 16 निलंबित होतील. त्यानंतर सरकार जाईल. त्यामुळे सरकार राहणार नाही आणि फडणवीस राहणार नाही. या बजेटमध्ये आहेच काय? सर्व खोटं आहे. सरकार कोसळण्याच्या भीतीने बजेट सादर केलं. कदाचित या सरकारचं हे शेवटचं बजेट असेल. घटनेनुसार निर्णय लागला आणि लागेलच आणि 16 आमदार अपात्र ठरेल तर सरकार कोसळेल. सरकार कोसळल्यास लोकांमध्ये जाण्यासाठी थापेबाजीचं बेजट सादर करण्यात आलंय, अशी टीका त्यांनी केली.

त्यांनी जातीचं राजकारण केलं

महाराष्ट्रातील, केंद्रातील सरकारने जात आणि धर्माच्या आधारावर राजकारण केलं. महाराष्ट्राची ही परंपरा नव्हती. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. पण प्रत्येक ठिकाणी जात दाखवण्याचं काम सरकार करत आहे. शेवटी महाराष्ट्रातील बारा कोटीच्या लोकांना त्यांचा धर्म दाखवावा लागेल. महाराष्ट्र धर्म दाखवावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Follow Us
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा....
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा.....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर.....
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?.
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.