AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: जळगावात समाजकंटकांचा उच्छाद, 2 एकर कपाशी उपटून टाकली, शेतकरी महिलेचा टाहो

जळगावमधील कजगावच्या (तालुका - भडगाव) जवळच असलेल्या तांदुळवाडी शिवारात एका शेतकऱ्याचं तब्बल दीड ते दोन एकर शेतातील कपाशी पीक अज्ञान समाजकंटकांनी उपटून टाकलं.

VIDEO: जळगावात समाजकंटकांचा उच्छाद, 2 एकर कपाशी उपटून टाकली, शेतकरी महिलेचा टाहो
| Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 9:21 AM
Share

जळगाव : बेभरवशी निसर्ग, बाजारातील लहरीपणा आणि त्यात कोरोना-लॉकडाऊनने कंबरडं मोडलेल्या शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतोय. जळगावमधील कजगावच्या (तालुका – भडगाव) जवळच असलेल्या तांदुळवाडी शिवारात एका शेतकऱ्यालाही अशाच संकटांच्या मालिकेला तोंड द्यावं लागतंय. या शेतकऱ्याची तब्बल दीड ते दोन एकर शेतातील कपाशी पीक अज्ञान समाजकंटकांनी उपटून टाकलं. त्यामुळे या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेल्या आपल्या पिकाचं नुकसान पाहून शेतकरी महिलेने टाहो फोडला. या घटनेने कजगाव परिसरात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

आधीच ग्रामीण भागातील शेतकरी कोरोना साथीरोगाच्या प्रादुर्भावामधून जात आहेत, त्यात शेतकऱ्यांवर येणारे विविध संकटाना तोंड देताना शेतकरी हवालदिल होत आहे. दिवसरात्र मेहनत करून देखील त्याला पुरेसा मोबदला मिळत नाही. त्यातच मळगाव येथील रहिवासी मीराबाई उत्तम गायकवाड व सचिन गायकवाड यांना मोठं नुकसान झालं. ते आईच्या मालकीचं तांदुळवाडी शिवारातील शेत करतात. तेथील साधारणतः दीड ते दोन एकर जमिनीतील कपाशी पीक उपटून अज्ञान माथेफिरुने नुकसान केलं.

शेतातील नुकसान पाहून शेतकरी महिलेचा आक्रोश

हे शेतकरी आदिवासी समाजातील असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. घटनास्थळी झालेले नुकसान पाहून मीराबाई गायकवाड यांचा आक्रोश पाहायला मिळाला. त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांचे हे ओक्साबोक्सी रडणे पाहून उपस्थित ग्रामस्थही भावूक झाल्याचे दिसून आले. घटनास्थळी सरपंच गुलाब पाटील पोलीस पाटील रेश्मा मरसाळे, तंटामुक्ती अध्यक्ष जयंत पाटील, दीपक पाटील, दादाभाऊ पाटील, स्वप्नील पाटील, प्रताप परदेशी, रतन बैरागी यांच्यासह मळगाव तांदुळवाडी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. नुकसानग्रस्त शेतकरी सचिन गायकवाड स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहेत.

माथेफिरूंना त्वरीत अटक करण्याची मागणी

आदिवासी भिल्ल समाजातील मीराबाई गायकवाड यांना न्याय मिळून त्या अज्ञात माथेफिरू व्यक्तीला त्वरीत अटक करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. शेतकऱ्याला प्रशासनाकडून त्वरित मदत मिळावी. दरम्यान, घडलेल्या या दुर्दैवी घटनेचे सर्वच स्तरावरून निषेध व्यक्त केला जात आहे. एखाद्या शेतकऱ्याचे एवढे मोठे नुकसान होत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

राजकीय द्वेषापोटी शेतकऱ्याचं नुकसान?

शेतकरी दिवसभर काबाडकष्ट करून पिकांना आपल्या मुलाबाळाप्रमाणे जतन करून वाढीस नेत असतो. एवढी मेहनत करुनही माथेफिरूंकडून होणाऱ्या या नुकसानीमुळे शेतकऱ्याने काय करावे असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा प्रकार राजकीय द्वेषापोटी घडली असल्याचीही चर्चा दिवसभर गावात रंगली होती. त्यामुळे घटनेचा सखोल तपास करून त्वरित जेरबंद करावे, अशी मागणी जोरदार होत आहे.

हेही वाचा :

सिंधुदुर्गात गवारेड्यांचा धुमाकुळ, हातातोंडाशी आलेल्या उभ्या पिकाचं मोठं नुकसान

औरंगाबादमध्ये शेतात विजेची तार कोसळली, शेतकऱ्याच्या 7-8 गाईंचा हकनाक मृत्यू

आजपासून नवा सातबारा, जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाही : बाळासाहेब थोरात

व्हिडीओ पाहा :

Unknown person destroy 2 acre cotton crop of Jalgaon farmer

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.