केळी हे बारमाही बाजारपेठेत असलेले पीक असले तरी सध्याच्या वाढत्या उन्हामुळे मागणी वाढली होती. त्यामुळे दरातही वाढ झाली होती. याचा फायदा होईल असे शेतकरी महेश पाटील यांना वाटत होते. मात्र, अवघ्या काही क्षणात त्यांचे स्वप्न तर धुळीस मिळालेच पण यामध्ये त्यांचे 15 लाखाचे नुकसान झाले आहे. सध्या काही केळीच्या खोडाची कापणी झाली होती पण अधिकचे नुकसानच या घटनेत झाले आहे.