AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही दृश्य तुम्हाला विचलीत करतील, कशी झाली अन्नदात्याची नासाडी?; डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही

गेल्या चार दिवसांपासून परभणीत अवकाळी पावसाचं थैमान सुरू आहे. ज्वारीचं पीक आडवं झालंय. गारपिटीने टरबूज गळून पडलं.

ही दृश्य तुम्हाला विचलीत करतील, कशी झाली अन्नदात्याची नासाडी?; डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही
| Edited By: | Updated on: Mar 20, 2023 | 7:24 PM
Share

परभणी : गेल्या चार दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसानं नुकसान झालं. पण, सर्वाधिक नुकसान परभणी जिल्ह्यात झाल्याचं पाहायला मिळते. नुकसानीचे पंचनामे करताना दिसतात. ज्वारीचं पीक आडवं झालंय. गारपिटीने टरबूज गळून पडलं. गेल्या चार दिवसांपासून परभणीत अवकाळी पावसाचं थैमान सुरू आहे. एक नुकसानग्रस्त शेतकरी म्हणाला, कडगाव येथे अतिरिक्त गारपीट, वारा, पाऊस यामुळे ज्वारी, गहू, टरबूज फळबागा यांचं भरपूर नुकसान झालं.

PARBHANI 2 N

मायबाप सरकार जीवंत करा

सरकार आम्हाला काही देत नाही. सरकार आम्हाला गहू, ज्वारी, रेशन देईल. पण, जनावरांना लागणारा ज्वारीचा कडबा कुठून आणणार, असा सवाल केला. यावेळी शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी होते. आमचं प्रचंड नुकसान झालं. हात जोडून सरकारला विनंती आहे. आम्हाला मायबाप तुम्ही जीवंत करा. कारण आम्ही शेतकरी मेल्यासारखे झाले आहोत. काहीतरी मदत द्यावी, अशी सरकारला विनंती आहे.

PARBHANI 3 N

पंचनामे करून मदत द्यावी

गोविंद अबदागिरे नावाच्या तरुण शेतकऱ्याने आपली आपबिती सांगितली. तो म्हणाला, माझ्या गव्हाच्या प्लाटचे अतोनात नुकसान झाले. माझी शिंदे साहेबांना विनंती आहे. गव्हाच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.

तलाठी फिल्डवर, कुणालाही सुटका नाही

परभणीच्या जिल्हाधिकारी आँचल गोयल म्हणाल्या, १७ आणि १८ तारखेला गारपीट झाली. भूईमुंग, ज्वारी, गहू यांचं मोठं नुकसान झालं आहे. तलाठी आणि कृषी सहाय्यक हे फिल्डवर आहेत. ते पंचनामे करत आहेत. कुणी संपावर असो की, नसो पंचनाम्याच्या कामातून कुणालाही सुटका नाही.

परभणी जिल्ह्यात गेली चार दिवस अवकाळी पाऊस वादळी वारे आणि गारपीट मुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. परभणी जिल्ह्यात 3275 हेक्टरवर नुकसान झाल्याची प्राथमिक प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलीय. दरम्यान, कालपासून पावसाने उघडी घेतली. आता प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले असून. जिल्हाधिकारी आंचाल गोयल यांनी पांचनाम्यावर संपाचा पंचनामावर कुठलाही परिणाम होणार नसल्याचं सांगितलं.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.