ही दृश्य तुम्हाला विचलीत करतील, कशी झाली अन्नदात्याची नासाडी?; डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही

गेल्या चार दिवसांपासून परभणीत अवकाळी पावसाचं थैमान सुरू आहे. ज्वारीचं पीक आडवं झालंय. गारपिटीने टरबूज गळून पडलं.

ही दृश्य तुम्हाला विचलीत करतील, कशी झाली अन्नदात्याची नासाडी?; डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 7:24 PM

परभणी : गेल्या चार दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसानं नुकसान झालं. पण, सर्वाधिक नुकसान परभणी जिल्ह्यात झाल्याचं पाहायला मिळते. नुकसानीचे पंचनामे करताना दिसतात. ज्वारीचं पीक आडवं झालंय. गारपिटीने टरबूज गळून पडलं. गेल्या चार दिवसांपासून परभणीत अवकाळी पावसाचं थैमान सुरू आहे. एक नुकसानग्रस्त शेतकरी म्हणाला, कडगाव येथे अतिरिक्त गारपीट, वारा, पाऊस यामुळे ज्वारी, गहू, टरबूज फळबागा यांचं भरपूर नुकसान झालं.

PARBHANI 2 N

मायबाप सरकार जीवंत करा

सरकार आम्हाला काही देत नाही. सरकार आम्हाला गहू, ज्वारी, रेशन देईल. पण, जनावरांना लागणारा ज्वारीचा कडबा कुठून आणणार, असा सवाल केला. यावेळी शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी होते. आमचं प्रचंड नुकसान झालं. हात जोडून सरकारला विनंती आहे. आम्हाला मायबाप तुम्ही जीवंत करा. कारण आम्ही शेतकरी मेल्यासारखे झाले आहोत. काहीतरी मदत द्यावी, अशी सरकारला विनंती आहे.

हे सुद्धा वाचा

PARBHANI 3 N

पंचनामे करून मदत द्यावी

गोविंद अबदागिरे नावाच्या तरुण शेतकऱ्याने आपली आपबिती सांगितली. तो म्हणाला, माझ्या गव्हाच्या प्लाटचे अतोनात नुकसान झाले. माझी शिंदे साहेबांना विनंती आहे. गव्हाच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.

तलाठी फिल्डवर, कुणालाही सुटका नाही

परभणीच्या जिल्हाधिकारी आँचल गोयल म्हणाल्या, १७ आणि १८ तारखेला गारपीट झाली. भूईमुंग, ज्वारी, गहू यांचं मोठं नुकसान झालं आहे. तलाठी आणि कृषी सहाय्यक हे फिल्डवर आहेत. ते पंचनामे करत आहेत. कुणी संपावर असो की, नसो पंचनाम्याच्या कामातून कुणालाही सुटका नाही.

परभणी जिल्ह्यात गेली चार दिवस अवकाळी पाऊस वादळी वारे आणि गारपीट मुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. परभणी जिल्ह्यात 3275 हेक्टरवर नुकसान झाल्याची प्राथमिक प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलीय. दरम्यान, कालपासून पावसाने उघडी घेतली. आता प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले असून. जिल्हाधिकारी आंचाल गोयल यांनी पांचनाम्यावर संपाचा पंचनामावर कुठलाही परिणाम होणार नसल्याचं सांगितलं.

Non Stop LIVE Update
मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आनंद पण.. दानवेंचा लेटरबॉम्ब
मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आनंद पण.. दानवेंचा लेटरबॉम्ब.
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय.
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत...
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत....
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्..
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्...
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला.
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी.
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप.
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका.
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्.
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला.