AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Unseasonal Rain : गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान, रब्बी पिकांना बसणार फटका, विटभट्टी व्यावसायिकांचे मोठे नुकसान

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. तर अनेक जिल्ह्यात वीज पडल्यामुळे दुर्घटना सुद्धा घडल्या आहेत. अजून काही दिवस हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

Unseasonal Rain : गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान, रब्बी पिकांना बसणार फटका, विटभट्टी व्यावसायिकांचे  मोठे नुकसान
rain Image Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Mar 18, 2023 | 11:29 AM
Share

गोंदिया : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज सकाळच्या सुमारास गोंदिया (Gondia) जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अचानकपणे अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) हजेरी लावल्यान बळीराजा धास्तावलेला असून या पावसाचा फटका रब्बी पिकांना बसणार आहे. अवकाळी पावसाने झोडपल्याने पोपट, जवस, मूंग, गहू, आदी पिकांसह पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोबतच विटभट्टी व्यावसायिकांचेसुद्धा मोठे नुकसान झाले आहे. मागच्या आठदिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे. शेतीसह (Farmer) अनेक व्यवसायिकाचं नुकसान झालं आहे.

लातूर जिल्ह्याला पावसाने झोडपले

लातुर जिल्ह्यातल्या अनेक भागात पाऊस कोसळला आहे. विजांच्या कडकडाट आणि वाऱ्यासह पाऊस झाला आहे. लातुर शहरात काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. जिल्ह्यातल्या उदगीर, जळकोट, रेणापूर, चाकूर, औसा, निलंगा तालुक्यात पाऊस झाला. चाकूर तालुक्यातल्या हटकरवाडी शिवारात वीज पडून म्हैस दगावली आहे. तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. आंबा फळांचेही नुकसान झाले आहे. दिवसभर ढगाळ वातावरण होते, सायंकाळी पाऊस झाल्याने वातावरणात गारठा पसरला आहे.

अमरावतीच्या मेळघाट मधील हरिसाल भागात गारपीट

हवामान विभागाने राज्यात अवकाळी पाऊस व गारपीटीचा इशारा दिला आहे. त्यानुसार मागील दोन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. काल सायंकाळी अमरावती जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या मेळघाट मधील हरिसाल भागात काल गारपीट व अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. या पावसामुळे हरभरा, गहू आदि पिकांच नुकसान झालं आहे.

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. तर अनेक जिल्ह्यात वीज पडल्यामुळे दुर्घटना सुद्धा घडल्या आहेत. अजून काही दिवस हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे पावसाच्यावेळी गरज असल्यास घरातून बाहेर पडा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.

Follow Us
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती
ठाकरेंना अखेर कळलं, या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान
ठाकरेंना अखेर कळलं... या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान, म्हणाल्या...
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य, काय म्हणाल्या?
मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव- पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan | 'मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव...चव्हाणांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपकेंचं मोठं विधान
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपके यांचं सर्वात मोठं विधान
CJP जखमी विद्यार्थ्यासाठी राहुल गांधींचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या...
CJP च्या जखमी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधींचा संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; जोपर्यंत...
राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार...
एकच खळबळ! राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार... व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये नेमकं काय?