AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई एपीएमसीत 4 वर्षातील विक्रमी भाजीपाल्याची आवक, दरामध्ये मोठी घसरण

श्रावण महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात नवी मुंबई येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला घाऊक बाजारात वर्षातील उच्चांकी आवक झाली आहे. आज भाजीपाला मार्केटमध्ये 840 गाड्यांची आवक झाली आहे.

मुंबई एपीएमसीत 4 वर्षातील विक्रमी भाजीपाल्याची आवक, दरामध्ये मोठी घसरण
बाजार समिती
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Aug 16, 2021 | 3:40 PM
Share

नवी मुंबई: श्रावण महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात नवी मुंबई येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला घाऊक बाजारात वर्षातील उच्चांकी आवक झाली आहे. आज भाजीपाला मार्केटमध्ये 840 गाड्यांची आवक झाली आहे. मोठ्या प्रमाणात आवक झाल्यानं भाजीपाला दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. तर जवळपास 4 वर्षांनंतर एवढी मोठी आवक बाजारात झाली असल्याचे व्यापारी सांगत आहेत. यापूर्वी गेल्यावर्षीच्या मकरसंक्रांतीला 813 गाड्यांची आवकर होती. मात्र, चार वर्षांनंतर 840 एवढी आवक झाली आहे. परिणामी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली शिवाय 150 ते 200 भाजीपाला गाड्या बाजार आवारात पडून आहे.

श्रावणात दरवर्षीच भाज्यांना चांगली मागणी असते. भेंडी, हिरवी मिरची, पापडी, वांगी, घेवडा, सिमला मिरची, भुईमूग शेंग, वाटाणा आणि इतर भाज्यांच्या भावात घसरण झाली आहे. तर जवळपास सर्व भाज्यांचे दर 10 रुपये किलोच्या खाली आले आहेत. दरवर्षी श्रावणात भाज्यांना मागणी वाढून दर सुद्धा चांगले मिळतात. मात्र, यावर्षी बाजारभावात घसरणच सुरु असल्याने व्यापारी देखील आवाक झाले आहेत. तर यावर्षीच्या श्रावण मासत भाज्यांच्या आणखी किती दर खाली येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे, असं व्यापारी बबन झेंडे यांनी सांगितलंय.

एपीएमसी भाजीपाला मार्केटमधील सध्यस्थितीत भाजीपाला दर

टोमॅटो 8 रुपये, काकडी 8 ते 10 रुपये , भेंडी 4 ते 8 रुपये, दुधी 8 ते 10 रुपये, वांगी 10 रुपये, फ्लॉवर 6 रुपये, कोबी 6 रुपये, कारली 10 रुपये, मेथी जुडी10 रुपये, कोथांबीर जुडी 8 रुपये असा दर भाज्यांचा राहिला.

श्रावणाच्या पहिल्या शनिवारीही घसरण

श्रावण महिन्याच्या पाहिल्याच शनिवारी मुंबई एपीएमसी भाजीपाला बाजारात भाज्यां दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. याबाबत व्यापाऱ्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे. तर गेल्या अनेक वर्षांमधील हा पहिला श्रावण मास आहे, ज्यात भाज्यांच्या दरात प्रचंड घसरण झाली असल्याचे व्यापारी सांगत आहेत. या श्रावणात काही वेगळीच स्थिती पाहायला मिळत आहे. श्रावण मासात मोठ्या प्रमाणात शाकाहार घेतला जातो. त्यामुळे भाजीपाला आणि फळांना मागणी वाढून भाज्यांत दरात वाढ होत असते, मात्र यावेळी तसं घडलेलं नाही.

मुंबई एपीएमसी भाजीपाला बाजारात शनिवारी 620 गाड्यांची आवक झाली होती. आठवड्याचा शेवटचा दिवस असताना पुरेसे ग्राहक बाजारात न आल्याने कवडीमोल भावाने आज भाजीपाला विकावा लागला. जवळपास सर्वच भाज्यांचे दर 10 रुपये प्रतीकिलोच्या खाली आले होते.

इतर बातम्या:

भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण, मुंबई बाजार समितीकडे ग्राहकांची पाठ, हे पहिल्यांदाचं घडतंय, व्यापाऱ्यांचं मत

मुंबई एपीएमसी परिसरात कारमध्ये अचानक स्पार्क, काही सेकंदात जळून खाक

Vegetables rates down in Mumbai Apmc on second Monday of Shravana Month

Follow Us
रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय
भरत गोगावले यांची घोषणा: रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय
"लोकशाही अमान्य असलेले पळपुटे"
देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल:
शिंदे गटाची धाकधूक वाढली; कपिल सिब्बल यांच्या जोरदार युक्तीवादाला...
शिंदे गटाची धाकधूक वाढली! कपिल सिब्बल यांच्या जोरदार युक्तीवादाला सुरुवात, कोर्टात काय काय घडतंय?
पुन्हा चर्चा रंगल्या! सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीने...
पुन्हा चर्चा रंगल्या! सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीने प्रवास, भाजप नेता म्हणाला...
शिंदेंच्या अनुपस्थितीमुळे एमएमआरडीएच्या कार्यक्रमावर चर्चांना उधाण
मुंबईतील एमएमआरडीएच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित
आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
सिंधुदुर्गातील दोडामार्ग आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?