AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona : कल्याण एपीएमसी चा मोठा निर्णय, अगोदर नियमावली आता थेट बाजारच बंद

बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांना दोन डोस हे बंधनकारक करण्यात आले होते तर परजिल्ह्यातून येणाऱ्या व्यापारी आणि शेतकऱ्यांना डोसची व्यवस्थाही करण्याचे आदेश देण्यात आले होते. असे असले तरी कल्याण - डोंबवली मनपा हद्दीतील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी किरकोळ बाजार बंद करण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

Corona : कल्याण एपीएमसी चा मोठा निर्णय, अगोदर नियमावली आता थेट बाजारच बंद
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jan 10, 2022 | 4:46 PM
Share

कल्याण : वाढत्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाहता बाजार समित्यांमध्ये नवीन नियमावली जारी करण्यात आली होती. त्यानुसार बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांना दोन डोस हे बंधनकारक करण्यात आले होते तर परजिल्ह्यातून येणाऱ्या व्यापारी आणि शेतकऱ्यांना डोसची व्यवस्थाही करण्याचे आदेश देण्यात आले होते. असे असले तरी कल्याण – डोंबवली मनपा हद्दीतील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी किरकोळ बाजार बंद करण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

नियम डावल्यास दंडात्मक कारवाई

बाजार समितीमधील किरकोळ बाजार हे बंद करण्यात आले आहेत शिवाय, कल्याण शहरातील आठवडी बाजारही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असतानाही आठवडी बाजार भरल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. गर्दी टाळण्यासाठी केवळ व्यापाऱ्यांना बाजार समितीमध्ये घाऊक बाजारास परवानगी ती देखील नियम अटींसह देण्यात आली आहे. कामगार, हमाल यांना दोन्ही डोस घेणे बंधनकारक राहणार आहे.

‘एपीएमसी’ ची जबाबदारी देखील महत्वाचीच

वाढत्या कोरोना बाधित रुग्णांवर नियंत्रण मिळवणे ही सर्वाचीच जबाबदारी आहे. त्यामुळे बाजार समितीनेही घालून दिलेल्या अटी-नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने व्यापारी- वाहने ही बाजार समितीमध्ये येत असतात. त्यांच्यावर नियंत्रण आणणे आणि त्यांना योग्य त्या सुचना देणे हे काम बाजार समिती प्रशासनाचे आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेमध्ये शेतीमाल वाहतूक करणाऱ्या केवळ 50 वाहनांनाच बाजार समितीमध्ये प्रवेश दिला होता. योग्य खबरदारी घेतली तरच रुग्णसंख्या ही कमी होणार असल्याचे आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.

इतर बाजार समित्यांमध्येही नियमावली जारी

सबंध राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे बाजार समिती मधील व्यवहार सुरु राहणे हे शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहे. मात्र, रुग्णसंख्या वाढीचे कारण बाजार समित्या ठरत असतील त्यावरही निर्बंध आणावे लागतील अशा सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लसीकरणाची सोय, गर्दीवर नियंत्रण, दोन डोस घेतले आहेत का? याची पडताळणी कृऊबा प्रशासनाला करावी लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market : हमीभाव केंद्र सुरु होताच तुरीच्या बाजारभावात मोठे बदल, सोयाबीन दर मात्र, स्थिरच

Onion : सोलापूरच्या बाजारपेठेत कांद्याची विक्रमी आवक अन् दरात घसरण, नेमके कशामुळे बिघडले भावाचे गणित?

Success Story : 10 एकरातील ‘पिंक’ पेरुच्या लागवडीने उजाडली 25 लाखाच्या उत्पन्नाची ‘गुलाबी’ पहाट ; लॉकडाऊनचा असा हा सदउपयोग

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली