AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोयाबीनच्या दरात घट तरीही आवक वाढलेलीच, शेतकऱ्यांच्या मनात भीती कशाची?

पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले होते. त्यामुळे उत्पादनात तर घट ही ठरलेलीच होती. यामुळे हंगामाच्या सुरवातीला जरी सोयाबीनच्या दरात वाढ झाली नाही तरी भविष्यात दरवाढ होणार हे शेतकऱ्यांना माहिती होते. त्यामुळे दर कमी असताना साठवणूक आणि दरात वाढ झाली की टप्प्याटप्प्याने विक्री हे गणितच शेतकऱ्यांनी ठरवून घेतले होते.

सोयाबीनच्या दरात घट तरीही आवक वाढलेलीच, शेतकऱ्यांच्या मनात भीती कशाची?
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात वाढ झाली असल्याने आवकही वाढली आहे.
| Updated on: Jan 28, 2022 | 2:02 PM
Share

लातूर : सोयाबीन हंगामाच्या अंतिम टप्प्यात बाजारपेठेतले चित्र बदलताना पाहवयास मिळत आहे. गेल्या तीन महिन्यापासून सुरु झालेली  (Soybean) सोयाबीनची आवक आता कुठे अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, हंगाम सुरु होताना शेतकऱ्यांची भूमिका ही निराळीच होती. पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले होते. त्यामुळे (Production Down) उत्पादनात तर घट ही ठरलेलीच होती. यामुळे हंगामाच्या सुरवातीला जरी सोयाबीनच्या दरात वाढ झाली नाही तरी भविष्यात दरवाढ होणार हे शेतकऱ्यांना माहिती होते. त्यामुळे दर कमी असताना साठवणूक आणि दरात वाढ झाली की टप्प्याटप्प्याने विक्री हे गणितच (Farmer) शेतकऱ्यांनी ठरवून घेतले होते. पण आता अंतिम टप्प्यात दर घसरत असतानाही सोयाबीनची विक्री ही केली जात आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत असलेल्या आवक मधून हे निदर्शनास येत आहे.

उन्हाळी सोयाबीनचा विक्रमी पेरा

यंदा खरीप हंगामात अधिकचा काळ पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील पेरण्याही लांबणीवर पडलेल्या होत्या. शिवाय ज्वारी या पिकासाठी पोषक वातावरण न राहिल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा उन्हाळी हंगामावर भर दिला होता. यंदा उन्हाळी हंगामात विक्रमी क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. शिवाय सध्या हे सोयाबीन शेंग लागवडीच्या अवस्थेत आहे. असे असताना खरिपातील सोयाबीनची साठवणूक ही नुकासनीची ठरु शकते. उन्हाळी हंगामातील सोयाबीनची आवक सुरु झाली तर पुन्हा साठवलेल्या सोयाबीनचे करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे सध्याच्या सरासरी दरात सोयाबीन विक्रीवर शेतकऱ्यांचा भर आहे.

लातूरात 22 हजार पोत्यांची आवक

गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात घसरण होत आहे. जानेवारी महिन्याच्या सुरवातीला 6 हजार 600 वर गेलेले दर सध्या 6 हजार 100 वर येऊन ठेपले आहेत. आतापर्यंत दरात घसरण झाली की, सोयाबीनची साठवणूक केली जात होती पण आता शेतकऱ्यांच्या मानसिकतेमध्ये बदल झाला आहे. उद्या मागणी घटली आणि उन्हाळी सोयाबीनची आवक सुरु झाली तर अधिकचे नुकसान होण्यापेक्षा सध्याच्या दरात विक्री करणे योग्य ठरणार आहे. असा विचार होत असल्याने संध्या दरात घट होऊन देखील आवक ही वाढलेली आहे. शुक्रवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 22 हजार पोत्यांची आवक झाली होती.

संबंधित बातम्या :

Seed Production: आता बिजोत्पादनावरही ‘संक्रात’, कशामुळे होतेय कांद्याचे रोप नष्ट ?

भांडगावच्या गाजराची चवच न्यारी, शेतकऱ्यांना कळाले ‘झिरो बजेट’ शेतीचे महत्व

आठवडी बाजार बंद, भाजीपाल्याला मागणीच नसल्याने शेतकऱ्याने मेथीच्या जुड्या हवेतच भिरकावल्या

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.