AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yawatmal Market: ठोक मार्केटमध्ये थेट ग्राहकांची घुसखोरी, किरकोळ भाजी विक्रेत्यांनी घेतला ‘हा’ निर्णय अन् सर्वकाही ठप्प

शहरातील किरकोळ विक्रेत्यांकडून भाजीपाल्याची खरेदी होते. पण गेल्या काही दिवसांपासून येथील ठोक बाजारात ग्राहकांची घुसखोरी होत असून होलसेल दरात भाजीपाल्याची खरेदी केली जात आहे. त्यामुळे शहरातील किरकोळ विक्रेत्यांचे नुकसान होत असून ही अनोखी पध्दत बंद करावी या मागणीसाठी आता किरकोळ भाजी विक्रेत्यांनी बंद पुकारला आहे. आता यावर जिल्हा प्रशासनाकडून काय तोडगा काढला जातो हे पहावे लागणार आहे.

Yawatmal Market: ठोक मार्केटमध्ये थेट ग्राहकांची घुसखोरी, किरकोळ भाजी विक्रेत्यांनी घेतला 'हा' निर्णय अन् सर्वकाही ठप्प
यवतमाळ येथील भाजीपाल्याचे ठोक विक्री मार्केट
| Edited By: | Updated on: Feb 18, 2022 | 9:37 AM
Share

यवतमाळ : शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या दराचे काहीही असो मात्र, ग्राहक आणि शेतकरी यांच्यातील दुवा असलेल्या भाजीपाला विक्रेत्यांच्या मालाला चांगला दर मिळावा यासाठी किरकोळ विक्रेत्यांची एकजूट काय असते याचा प्रत्यय सध्या यवतमाळ येथे आला आहे. शेतकऱ्यांचा (Vegetable) भाजीपाला येथील ठोक बाजारपेठेत विक्रीसाठी आणला जातो. अवघ्या काही वेळात सौदेही होतात. व्यापाऱ्यांच्या मनानेच हे सौदे होतात आणि काही वेळातच शेतकरी हा काढता पाय घेतो. त्यानंतर मात्र, शहरातील (Retail Vendor) किरकोळ विक्रेत्यांकडून भाजीपाल्याची खरेदी होते. पण गेल्या काही दिवसांपासून येथील (Wholesale Market) ठोक बाजारात ग्राहकांची घुसखोरी होत असून होलसेल दरात भाजीपाल्याची खरेदी केली जात आहे. त्यामुळे शहरातील किरकोळ विक्रेत्यांचे नुकसान होत असून ही अनोखी पध्दत बंद करावी या मागणीसाठी आता किरकोळ भाजी विक्रेत्यांनी बंद पुकारला आहे. आता यावर जिल्हा प्रशासनाकडून काय तोडगा काढला जातो हे पहावे लागणार आहे.

किरकोळ विक्रेत्यांचे नेमके नुकसान काय?

बाजार समितीच्या ठोक बाजारातून थेट ग्राहकांना होलसेल दरामध्ये भाजीपाला मिळत आहे. शिवाय याचे प्रमाण वाढत असल्याने सकाळच्या प्रहरी ठोक बाजारपेठेत किरकोळ विक्रेत्यांपेक्षा सर्वसामान्य ग्राहकांचीच गर्दी होत आहे. त्यामुळे शहरातील गल्ली-बोळात फिरुन भाजीपाला विकूनही पदरी काही पडत नाही. परिणामी किरकोळ विक्रेत्यांचे मोठे नुकसान होत आहे. ही बाब बाजार समितीच्या निदर्शनास येऊनही कोणतेही पाऊल उचलले जात नाही. त्यामुळे सर्व हातगाडे एका ठिकाणी लावून या विक्रेत्यांनी बंद पुकारला आहे.

विक्रेत्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष

ठोक बाजार पेठेत ग्राहकांची गर्दी होत असल्याने किरकोळ विक्रेत्यांच्या भाजीपाला विक्रीवर परिणाम झाला आहे. शिवाय अपेक्षित दरातही ग्राहक भाजीपाला खरेदी करीत नाहीत. त्यामुळे किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी येथील बाजार समितीचे सभापती, जिल्हाधिकारी यांना अशा पध्दतीने भाजीपाला विक्री करु नये असे निवेदन दिले होते पण कोणतिही कारवाई ही झाली नाही. त्यामुळे अखेर विक्रेत्यांनी हा संप सुरु केला आहे. त्यामुळे काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांनी आणलेल्या भाजीपाल्याचे करायचे काय?

किरकोळ विक्रेत्यांनी भाजीपाला विक्रीबाबत संप पुकारला असला तरी शुक्रवारी नियमितपणे शेतकरी हे भाजीपाला घेऊन मार्केटमध्ये दाखल झाले होते. मात्र, किरकोळ विक्रेत्यांनी व्यापाऱ्यांकडून भाजीपाल्याची खरेदीच केली नव्हती. त्यामुळे या भाजीपाल्याचे काय होणार हा प्रश्न आहे. ग्राहकांना आता थेट ठोक बाजारपेठेत जाऊनच खेरदी करावी लागणार आहे. सर्वच ग्राहक हे बाजारपेठेत जाणार नसल्याने भाजीपाला शिल्लक राहणार असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित बातम्या :

4 हेक्टर शेतातून लाखोंचं उत्पादन, युवा शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग; अमरावतीच्या शेतकऱ्याचं कौतुक

मटण म्हणलं की तोंडाला पाणी सुटलंच समजा, पण उस्मानाबादी मटण म्हणजे… आss..हाss..हाss..!

17 हजार शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाच्या योजनेचा लाभ, शेतीच्या जोडव्यवसायाला मिळणार आधार

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.